शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

केवळ दारू मुळेच नव्हे तर तब्बल ३०० कारणांनी यकृत होते खराब  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 5:53 PM

केवळ दारूमुळे यकृत खराब होते, असा नागरिकांमध्ये गैरसमज आहे; परंतु एक नव्हे तब्बल ३०० कारणांनी यकृत खराब होते.

ठळक मुद्दे८० टक्के यकृत खराब झाल्यानंतर लक्षणे दिसतात.आधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे उपचार शक्य

औरंगाबाद : केवळ दारूमुळे यकृत खराब होते, असा नागरिकांमध्ये गैरसमज आहे; परंतु एक नव्हे तब्बल ३०० कारणांनी यकृत खराब होते. विशेष म्हणजे ८० टक्के यकृत खराब झाल्यानंतर लक्षणे दिसतात. त्यानंतरही आधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे उपचार शक्य आहे. यकृत प्रत्यारोपणाचाही पर्याय आहे; परंतु अवयवदानाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे यकृत मिळण्याच्या प्रतीक्षेतच अनेकांचा मृत्यू ओढावतो, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

फिजिशियन्स असोसिएशन आॅफ औरंगाबाद आणि कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे रविवारी (दि.२०) यकृताचे आजार, निदान आणि उपचारासंबंधी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुंबई येथील डॉ. समीर शाह, डॉ. आकाश शुक्ला, डॉ. वैशाली सोलाव, डॉ. अनुराग श्रीमाल, डॉ. सचिन पळणीटकर, फिजिशियन्स असोसिएशन आॅफ औरंगाबादचे अध्यक्ष डॉ. संजय पाटणे, सचिव डॉ. अनंत कुलकर्णी,  आयोजन सचिव डॉ. वैभव गंजेवार आदी उपस्थित होते. 

डॉ. आकाश शुक्ला म्हणाले, हिपेटायटिस बी, हिपेटायटिस सी, आनुवंशिक आजार अशा अनेक कारणांनी यकृत खराब होते; परंतु वेळीच निदान आणि उपचाराने यकृत चांगले राहू शकते. अन्यथा यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसतो. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादला यकृत प्रत्यारोपण शक्य झाले असून, वर्षाला जवळपास तीनशे प्रत्यारोपण होतात. वर्षाला सातशेपेक्षा अधिक लोकांना यकृत प्रत्यारोपणाची गरज असते. गरजूंची संख्या अधिक ५५ वर्षे वयापर्यंतचा व्यक्ती गरजूला यकृतदान करू शकतो. यामध्ये यकृताचा काही भाग दिला जातो. दात्याचे यकृत काही दिवसांनंतर पूर्वीप्रमाणे होते, तर गरजूला जीवदान मिळते, असे ते म्हणाले.

डॉ. समीर शाह म्हणाले, कावीळच्या विषाणूंमुळे यकृत खराब होऊ शकते. यकृतास सूज आली तर त्याचे कारण शोधले पाहिजे. आरोग्यदायी आयुष्य, मद्यपान टाळणे, मधुमेह, रक्तदाब कमी करणे हे यकृत सुदृढ राहण्यासाठी महत्त्वाचे आहे. डॉ. अनुराग श्रीमाल म्हणाले, यकृत खराब झालेल्यांसाठी अवयवदान जीवनदान ठरते; परंतु गरजंूची संख्या अधिक आहे. त्यामुळे यकृताच्या प्रतीक्षेतच अनेकांचा मृत्यू होतो. अवयवदान वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. परिसंवादास मराठवाड्यातून मोठ्या संख्येने तज्ज्ञांची उपस्थिती होती. 

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर