शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सगळे संपते असे नाही;वेळीच निदान, उपचाराने कॅन्सर होतो पूर्ण बरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 18:49 IST

जागतिक कर्करोग दिन: वृद्धच नवे, तर खेळण्या- बागडण्याच्या वयातही गाठतोय कॅन्सर

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : आम्ही तर कधी गुटखा, तंबाखू खाल्ली नाही, मग आम्हाला का कॅन्सर झाला, असा प्रश्न काही चिमुकल्यांकडून कुटुंबीयांना विचारला जातो, तर कधी डाॅक्टरांना. वृद्धच नवे, तर खेळण्या - बागडण्याच्या वयातही काहींना कॅन्सर होत आहे. अगदी तीन महिन्यांचे चिमुकलेही शासकीय कर्करोग रुग्णालयात दाखल होतात. मात्र, कॅन्सर झाला म्हणे सगळे संपले नाही, वेळीच निदानाने कॅन्सर बरा होतो, असे तज्ज्ञांनी ‘लोकमत’ला सांगितले.

दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळण्यात येतो. ‘क्लोज द केअर गॅप’ ही २०२२ ते २०२४ ची संकल्पना आहे. प्रत्येकालाच कॅन्सरच्या निदानापासून ते उपचाराची आरोग्यसेवा, सुविधांची माहिती असायला हवी, याने अकाली मृत्यू थांबविणे शक्य आहे. औरंगाबादेतील शासकीय कर्करोग रुग्णालय आता संपूर्ण राज्यातील रुग्णांसाठी आधारवड ठरतेय. रुग्णालयाला राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत आहे.

सर्वोत्कृष्ट रुग्णसेवेसाठी प्रयत्नविविध प्रकारच्या कर्करोगांचे रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. विस्तारीकरणामुळे सोयी-सुविधांत वाढ होईल.- डाॅ. अरविंद गायकवाड, विशेष कार्य अधिकारी, शासकीय कर्करोग रुग्णालय

काय म्हणतात तज्ज्ञ....? 

जनरल प्रॅक्टिशनरची जबाबदारी महत्त्वाची३० वर्षांवरील महिलांनी दरवर्षी स्त्रीरोगतज्ज्ञांकडे तपासणी केल्यास गर्भाशयमुखाच्या कॅन्सरचे निदान प्रारंभिक स्थितीत होऊ शकते. ग्रामीण भागातील जनरल प्रॅक्टिशनरनाही कॅन्सरबद्दल माहिती असावी. जेणेकरून ते वेळेवर रुग्णांना मार्गदर्शन करू शकतील. कारण ग्रामीण भागात रुग्ण सर्वप्रथम त्यांच्याकडेच जातात.- डाॅ. अर्चना राठोड, सहयोगी प्राध्यापक, स्त्री कर्करोग विभाग

कॅन्सरमध्ये ४ टक्क्यांनी वाढगेल्या २० वर्षांत कॅन्सर ४ टक्क्यांनी वाढला. ३० टक्के रुग्णांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी आहे, ही बाब चिंताजनक आहे. २०१० मध्ये वर्षभरात २५० शस्त्रक्रिया होत. आता १२०० ते १५०० शस्त्रक्रिया होतात. तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे.- डाॅ. अजय बोराळकर, सहयोगी प्राध्यापक, कर्करोग शल्यचिकित्सा विभाग

आधुनिक उपचारतरुणांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी व्यसन प्रमुख कारण आहे. शेतात रासायनिक खतांचा होणारा वापरही कारणीभूत ठरत आहे. परंतु, कॅन्सरवर आधुनिक उपचार उपलब्ध आहेत.- डाॅ. बालाजी शेवाळकर, किरणोपचारशास्त्र विभागप्रमुख

पूर्वी बालरुग्ण दुर्मीळ, आता वाढबालकांमध्ये कॅन्सर आढळणे, हे पूर्वी दुर्मीळ होते. परंतु, आता हे प्रमाण वाढत आहे. बालकांत रक्ताच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. त्याबरोबर हाडाचे, किडनी, लिव्हरचे कर्करोग मुलांमध्ये आढळतात. वेळीच निदान झाले तर त्यावर मात करता येते.- डाॅ. आदिती लिंगायत, बालकर्करोग विभागप्रमुख

गेल्या वर्षभरातील कर्करोग रुग्णांची स्थिती (शासकीय कर्करोग रुग्णालय)-बाह्यरुग्ण विभाग- ६२५९- आंतररुग्ण विभाग- ३९४८- मोठ्या शस्त्रक्रिया- ८४२- छोट्या शस्त्रक्रिया- ८४९- डे केअर- १२,७८५- आयसीयू- ६०७- मृत्यू- १८०

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcancerकर्करोगdoctorडॉक्टर