रॉयल्टीचा भरणा नाही

By Admin | Updated: May 29, 2015 01:04 IST2015-05-29T00:54:47+5:302015-05-29T01:04:05+5:30

औरंगाबाद : शहरालगतच्या हर्सूल तलावातून रोज चारशेपेक्षा जास्त ट्रक गाळ आणि माती उकरून नेली जात आहे. त्यासाठी मनपाकडे कोणतीही रॉयल्टी भरली जात नाही

No royalty payment | रॉयल्टीचा भरणा नाही

रॉयल्टीचा भरणा नाही


औरंगाबाद : शहरालगतच्या हर्सूल तलावातून रोज चारशेपेक्षा जास्त ट्रक गाळ आणि माती उकरून नेली जात आहे. त्यासाठी मनपाकडे कोणतीही रॉयल्टी भरली जात नाही. गाळ आणि माती नेणाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांपेक्षा वीटभट्टीचालकांचीच संख्या अधिक आहे.
मनपाच्या मालकीच्या असलेल्या हर्सूल तलावातून शहरातील अकरा वॉर्डांना पाणीपुरवठा होतो. यंदा हा तलाव डिसेंबरअखेरीसच कोरडा पडला आहे. त्याचा फायदा तलावालगतच्या वीटभट्टीचालकांकडून घेतला जात आहे. हे वीटभट्टीचालक जेसीबी लावून दररोज शेकडो ट्रक गाळ आणि माती उकरून नेत आहेत. शेतकऱ्यांच्या नावाखाली हा गाळ नेला जात आहे. पण त्यासाठी या लोकांनी पालिकेकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही. तसेच पालिकेकडे रॉयल्टीही भरली जात नाही.
शेतकरी, भट्टीचालकांमध्ये संघर्ष
तलाव कोरडा पडल्यानंतर अनेक शेतकरी त्यात टरबूजाची लागवड करतात. यंदाही शेतकऱ्यांनी तलावाच्या समोरच्या भागात अशी लागवड केलेली आहे. गाळ आणि माती काढताना टरबूजाचे नुकसान होते. त्यामुळे या कारणावरून वीट्टभट्टीचालक आणि शेतकरी यांच्यात सातत्याने खटके उडत आहेत. वीट्टभट्ट्यांसाठी गाळ आणि मातीची मोठ्या प्रमाणावर गरज असते.
तलाव कोरडा पडल्याचा फायदा घेत अनेक भट्टीचालक वर्षभराचा साठा करून ठेवत आहेत. त्यासाठी त्यांनी मोठ्या संख्येने ट्रक, ट्रॅक्टर भाड्याने लावले आहेत.

Web Title: No royalty payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.