शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

एमआयएमबरोबर आघाडी करण्याचा कुठलाच प्रस्ताव नाही : अंजली आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 19:41 IST

रिपब्लिकन पक्षांनी भूमिका स्पष्ट केल्यास चर्चा 

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचीऔरंगाबादेत मोठी ताकद आहे. त्यामुळे पक्षाला मनपा निवडणुकीत चांगले यश मिळण्याची अपेक्षा आहे; पण एमआयएमबरोबर आघाडी करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, तसेच सीएए, एनआरसी व एनपीआरच्या मुद्यांवर रिपब्लिकन पक्षाच्या गटांनी जर भूमिका स्पष्ट केल्या, तर त्यांनाही सोबत घेता येऊ शकेल, असे आज येथे पत्रकारांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांनी जाहीर केले.

मनपा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडी व एमआयएम एकत्रित येण्यावरून सध्या उलटसुलट चर्चा आहे. त्याअनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अंजली आंबेडकर व वंबआच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सांगितले की, सर्वच्या सर्व जागा लढण्यासंबंधी व आघाडी करण्यासंबंधी कुठलाच निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. मात्र, निरीक्षकांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, त्या माध्यमातून मुलाखती वगैरे प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. 

खैरलांजी प्रकरण घडले. त्यावेळीही राष्ट्रवादीचे आर.आर. पाटील गृहमंत्री होते. आताही गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे आणि सध्याच्या गृहमंत्र्यांनी सिल्लोड- अंधारी प्रकरण घडल्यानंतर जे वक्तव्य केले, त्यावरून पीडितेला न्याय मिळेल, असे वाटत नसल्याचे ठाकूर यांनी सांगितले. एमआयएमबरोबर आघाडी होईल की नाही; परंतु रिपब्लिकन गटांबरोबर आघाडी होऊ शकणार नाही, काल असे विचारता अंजली आंबेडकर उद्गारल्या, कुठल्या गटाबरोबर. सीएए, एनआरसी व एनपीआर या मुद्यांवर या गटांनी आपली भूमिका जाहीर केली पाहिजे. 

रिपाइं एचे रामदास आठवले हे भाजपबरोबर केंद्रात सत्तेवर आहेत.  त्यामुळे अंजली आंबेडकर यांनी कुठल्या गटाबरोबर, असे विचारून आठवले यांनाच टोला मारला. यावेळी वंबआ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. लता बामणे, प्रा. प्रज्ञा साळवे, देवशाला गवांदे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका