शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
2
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
3
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्म-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
4
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
5
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
6
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
7
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
8
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
9
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
10
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
11
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
12
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
13
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
14
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
15
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
16
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
17
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
18
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
19
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
20
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी

एमआयएमबरोबर आघाडी करण्याचा कुठलाच प्रस्ताव नाही : अंजली आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 19:41 IST

रिपब्लिकन पक्षांनी भूमिका स्पष्ट केल्यास चर्चा 

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचीऔरंगाबादेत मोठी ताकद आहे. त्यामुळे पक्षाला मनपा निवडणुकीत चांगले यश मिळण्याची अपेक्षा आहे; पण एमआयएमबरोबर आघाडी करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, तसेच सीएए, एनआरसी व एनपीआरच्या मुद्यांवर रिपब्लिकन पक्षाच्या गटांनी जर भूमिका स्पष्ट केल्या, तर त्यांनाही सोबत घेता येऊ शकेल, असे आज येथे पत्रकारांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांनी जाहीर केले.

मनपा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडी व एमआयएम एकत्रित येण्यावरून सध्या उलटसुलट चर्चा आहे. त्याअनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अंजली आंबेडकर व वंबआच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सांगितले की, सर्वच्या सर्व जागा लढण्यासंबंधी व आघाडी करण्यासंबंधी कुठलाच निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. मात्र, निरीक्षकांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, त्या माध्यमातून मुलाखती वगैरे प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. 

खैरलांजी प्रकरण घडले. त्यावेळीही राष्ट्रवादीचे आर.आर. पाटील गृहमंत्री होते. आताही गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे आणि सध्याच्या गृहमंत्र्यांनी सिल्लोड- अंधारी प्रकरण घडल्यानंतर जे वक्तव्य केले, त्यावरून पीडितेला न्याय मिळेल, असे वाटत नसल्याचे ठाकूर यांनी सांगितले. एमआयएमबरोबर आघाडी होईल की नाही; परंतु रिपब्लिकन गटांबरोबर आघाडी होऊ शकणार नाही, काल असे विचारता अंजली आंबेडकर उद्गारल्या, कुठल्या गटाबरोबर. सीएए, एनआरसी व एनपीआर या मुद्यांवर या गटांनी आपली भूमिका जाहीर केली पाहिजे. 

रिपाइं एचे रामदास आठवले हे भाजपबरोबर केंद्रात सत्तेवर आहेत.  त्यामुळे अंजली आंबेडकर यांनी कुठल्या गटाबरोबर, असे विचारून आठवले यांनाच टोला मारला. यावेळी वंबआ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. लता बामणे, प्रा. प्रज्ञा साळवे, देवशाला गवांदे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका