शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

एमआयएमबरोबर आघाडी करण्याचा कुठलाच प्रस्ताव नाही : अंजली आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 19:41 IST

रिपब्लिकन पक्षांनी भूमिका स्पष्ट केल्यास चर्चा 

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचीऔरंगाबादेत मोठी ताकद आहे. त्यामुळे पक्षाला मनपा निवडणुकीत चांगले यश मिळण्याची अपेक्षा आहे; पण एमआयएमबरोबर आघाडी करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, तसेच सीएए, एनआरसी व एनपीआरच्या मुद्यांवर रिपब्लिकन पक्षाच्या गटांनी जर भूमिका स्पष्ट केल्या, तर त्यांनाही सोबत घेता येऊ शकेल, असे आज येथे पत्रकारांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांनी जाहीर केले.

मनपा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडी व एमआयएम एकत्रित येण्यावरून सध्या उलटसुलट चर्चा आहे. त्याअनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अंजली आंबेडकर व वंबआच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सांगितले की, सर्वच्या सर्व जागा लढण्यासंबंधी व आघाडी करण्यासंबंधी कुठलाच निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. मात्र, निरीक्षकांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, त्या माध्यमातून मुलाखती वगैरे प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. 

खैरलांजी प्रकरण घडले. त्यावेळीही राष्ट्रवादीचे आर.आर. पाटील गृहमंत्री होते. आताही गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे आणि सध्याच्या गृहमंत्र्यांनी सिल्लोड- अंधारी प्रकरण घडल्यानंतर जे वक्तव्य केले, त्यावरून पीडितेला न्याय मिळेल, असे वाटत नसल्याचे ठाकूर यांनी सांगितले. एमआयएमबरोबर आघाडी होईल की नाही; परंतु रिपब्लिकन गटांबरोबर आघाडी होऊ शकणार नाही, काल असे विचारता अंजली आंबेडकर उद्गारल्या, कुठल्या गटाबरोबर. सीएए, एनआरसी व एनपीआर या मुद्यांवर या गटांनी आपली भूमिका जाहीर केली पाहिजे. 

रिपाइं एचे रामदास आठवले हे भाजपबरोबर केंद्रात सत्तेवर आहेत.  त्यामुळे अंजली आंबेडकर यांनी कुठल्या गटाबरोबर, असे विचारून आठवले यांनाच टोला मारला. यावेळी वंबआ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. लता बामणे, प्रा. प्रज्ञा साळवे, देवशाला गवांदे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका