शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

'कोणी गुलालही लावणार नाही,अन्...'; भुजबळांच्या गोळी मारणार विधानाचा जरांगेंकडून समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 18:33 IST

आम्ही कोणत्याही समाजाबद्दल बोललो नाही पण तुम्हाला आता सुट्टी नाही.

- अमेय पाठक 

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्यातील वाद वाढतच जात आहेत. दरम्यान, मंत्री भुजबळ यांनी मला गोळी मारणार असल्याची शक्यता वर्तवली. या विधानाचा जरांगे यांनी समाचार घेतला असून, ' तुम्हाला कोणी गुलालही लावणार नाही, अन् तुम्ही गोळी मारण्याचे बोलता.' अशी टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना जरांगे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.   जरांगे पुढे म्हणाले, मराठ्याबद्दल राग, विषारी भाषा बोलू नका, तुमच्या विरोधात आयुष्यभर बोलत राहणार. आम्ही कोणत्याही समाजाबद्दल बोललो नाही पण तुम्हाला आता सुट्टी नाही. हे विनाकारण धमकावत आहेत, असा आरोपही जरांगे यांनी यावेळी केला.  सरकारने जेव्हा स्टेटमेंट बदलायला सुरुवात केली. तेव्हा एका व्यक्तीसाठी हे आम्हाला फसवायला लागले हे आमच्या लक्षात आले आहे. जर आरक्षण दिलं नाही तर ६ कोटी जनतेच्या दारात उभं राहायचं नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.

तसेच समाजाला १७ डिसेंबरला आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बोलवलेलं असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. या बैठकीला साहित्यिक, अभ्यासक, मराठा समाजाची उपस्थिती असेल. सकाळी ९ ते संध्याकाळी ६पर्यत ही बैठक होईल. यात पुढील आंदोलन कसं करायचं हे ठरवू, असेही जरांगे यांनी जाहीर केले. जी दिशा यात ठरेल ती फायनल असेल.पण शांततेत आंदोलन होईल. फक्त सरकारने आमच्या मागणीवर गंभीरपणे विचार करावा, अन्यथा त्यांना हे आंदोलन अवघड जाईल, असा इशारा जरांगे यांनी दिला.

भुजबळ यांना बळ देऊ नका छगन भुजबळ हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. ते बोलत असल्यानेच गावांगावांत जातीय तणाव निर्माण होत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. बीडची दंगल यांनीच घडवून आणली असून त्यांना बळ देऊ नका, असे सरकारला आवाहनही जरांगे यांनी केले. भुजबळ यांचे ऐकून मराठ्यांच वाटोळं करू नका. यांनी महाराष्ट्र्र सदन खाल्लं तरी याची केस तुम्ही मागे घ्यायला लागलेत. सगळा महाराष्ट्र याने खाल्ला, तरीही फडणवीस साहेब याला बळ द्यायला लागले असं दिसतं आहे, असा आरोपही जरांगे यांनी केला. आम्ही शांततेच आवाहन करतो आणि हे लोकांना भडकवतात. तुम्ही जर असंच करत राहिले तर आम्हाला मोठं आंदोलन उभं करावं लागेल, असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला.

फडणवीस यांना इशाराआम्हाला आश्वासन देण्यासाठी तिन्ही गटाचे लोक होते. आमच्याकडे सगळे कागदांचे फोटो आणि व्हिडीओ आहेत. एक महिन्यात गुन्हे मागे घेऊ असं सांगितलं, अटक करणार नाही असं सांगितलं, असताना या भुजबळच ऐकून निष्पाप पोर राज्यभर अटक केले. भुजबळ बोलत असल्यापासून फडणवीस  लक्ष देत नाहीत. बच्चू कडू याला साक्षीदार आहेत. फडणवीस साहेब तुमच्या बद्दल मराठ्यांमध्ये नाराजी पसरवू देऊ नका, अन्यथा तुम्हाला प्रचंड जड जाईल. मराठ्यांचा रोष घ्यावा लागेल, असेही जरांगे म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळAurangabadऔरंगाबाद