शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'कोणी गुलालही लावणार नाही,अन्...'; भुजबळांच्या गोळी मारणार विधानाचा जरांगेंकडून समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 18:33 IST

आम्ही कोणत्याही समाजाबद्दल बोललो नाही पण तुम्हाला आता सुट्टी नाही.

- अमेय पाठक 

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्यातील वाद वाढतच जात आहेत. दरम्यान, मंत्री भुजबळ यांनी मला गोळी मारणार असल्याची शक्यता वर्तवली. या विधानाचा जरांगे यांनी समाचार घेतला असून, ' तुम्हाला कोणी गुलालही लावणार नाही, अन् तुम्ही गोळी मारण्याचे बोलता.' अशी टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना जरांगे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.   जरांगे पुढे म्हणाले, मराठ्याबद्दल राग, विषारी भाषा बोलू नका, तुमच्या विरोधात आयुष्यभर बोलत राहणार. आम्ही कोणत्याही समाजाबद्दल बोललो नाही पण तुम्हाला आता सुट्टी नाही. हे विनाकारण धमकावत आहेत, असा आरोपही जरांगे यांनी यावेळी केला.  सरकारने जेव्हा स्टेटमेंट बदलायला सुरुवात केली. तेव्हा एका व्यक्तीसाठी हे आम्हाला फसवायला लागले हे आमच्या लक्षात आले आहे. जर आरक्षण दिलं नाही तर ६ कोटी जनतेच्या दारात उभं राहायचं नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.

तसेच समाजाला १७ डिसेंबरला आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बोलवलेलं असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. या बैठकीला साहित्यिक, अभ्यासक, मराठा समाजाची उपस्थिती असेल. सकाळी ९ ते संध्याकाळी ६पर्यत ही बैठक होईल. यात पुढील आंदोलन कसं करायचं हे ठरवू, असेही जरांगे यांनी जाहीर केले. जी दिशा यात ठरेल ती फायनल असेल.पण शांततेत आंदोलन होईल. फक्त सरकारने आमच्या मागणीवर गंभीरपणे विचार करावा, अन्यथा त्यांना हे आंदोलन अवघड जाईल, असा इशारा जरांगे यांनी दिला.

भुजबळ यांना बळ देऊ नका छगन भुजबळ हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. ते बोलत असल्यानेच गावांगावांत जातीय तणाव निर्माण होत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. बीडची दंगल यांनीच घडवून आणली असून त्यांना बळ देऊ नका, असे सरकारला आवाहनही जरांगे यांनी केले. भुजबळ यांचे ऐकून मराठ्यांच वाटोळं करू नका. यांनी महाराष्ट्र्र सदन खाल्लं तरी याची केस तुम्ही मागे घ्यायला लागलेत. सगळा महाराष्ट्र याने खाल्ला, तरीही फडणवीस साहेब याला बळ द्यायला लागले असं दिसतं आहे, असा आरोपही जरांगे यांनी केला. आम्ही शांततेच आवाहन करतो आणि हे लोकांना भडकवतात. तुम्ही जर असंच करत राहिले तर आम्हाला मोठं आंदोलन उभं करावं लागेल, असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला.

फडणवीस यांना इशाराआम्हाला आश्वासन देण्यासाठी तिन्ही गटाचे लोक होते. आमच्याकडे सगळे कागदांचे फोटो आणि व्हिडीओ आहेत. एक महिन्यात गुन्हे मागे घेऊ असं सांगितलं, अटक करणार नाही असं सांगितलं, असताना या भुजबळच ऐकून निष्पाप पोर राज्यभर अटक केले. भुजबळ बोलत असल्यापासून फडणवीस  लक्ष देत नाहीत. बच्चू कडू याला साक्षीदार आहेत. फडणवीस साहेब तुमच्या बद्दल मराठ्यांमध्ये नाराजी पसरवू देऊ नका, अन्यथा तुम्हाला प्रचंड जड जाईल. मराठ्यांचा रोष घ्यावा लागेल, असेही जरांगे म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळAurangabadऔरंगाबाद