शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

'आमच्या आंदोलनासाठी कोणीही एक रुपयाही देऊ नये, याआधी कुणी दिले असेल तर नाव सांगावे'; मनोज जरांगे यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 12:14 IST

दिवाळीनंतर मनोज जरांगे पुन्हा मैदानात

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाचे राज्यात सुरू असलेले आंदोलन हे सर्वसामान्य मराठ्यांनी एकत्र येऊन सुरू केले आहे. या आंदोलनासाठी कोणाकडूनही एक रुपयाही घेतला जात नाही. यामुळे राज्यातील अधिकारी, राजकीय नेते आणि सामान्य नागरिकांनी आमच्या आंदोलनासाठी कोणीही एक रुपयाही देऊ नये, असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केले. एवढेच नव्हे तर याआधी कुणी दिले असेल तर त्याचे नाव आम्हाला सांगावे, असेही जरांगे म्हणाले.

मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती आता ठणठणीत होत आहे. दिवाळीनंतर जरांगे पुन्हा मैदानात उतरणार आहेत. राज्यभरातून त्यांना सभा घेण्यासाठी आमंत्रित केले जात असल्याने जरांगे-पाटील यांनी १५ नोव्हेंबरपासून राज्यात संपर्क दौरा करण्याची घोषणा केली.

गुरुवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे-पाटील म्हणाले की, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्यसरकारने घ्यावा, यासाठी राज्यातील सर्व मराठा समाजाने प्रत्येक गावात १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू करायचे आहे. या आंदोलनाची तयारी सुरू करावी. आपल्या दौऱ्यात शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून सुरुवात करणार आहोत. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे. 

मात्र, मुख्यमंत्री याविषयी वेगळे बोलले असल्याच्या बाबीकडे जरांगे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री जे बोलले त्याविषयी २४ डिसेंबरला बोलू. आता मराठा समाज कुणबी असल्याचे पुरावे मिळत आहेत. यामुळे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला. हे आता भुजबळ यांना सहन होत नसल्याचे जरांगे म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी ते काहीतरी करत राहणारच आहेत. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्र देण्याची स्पीड वाढवावी, अशी आमची सरकारला विनंती असल्याचे ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नये, असे आपण मराठा भावांना आवाहन करीत असल्याचे जरांगे म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद