शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, राज्याचे कृषिमंत्री कोणाला माहिती नाहीत: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 13:02 IST

''राज्याचे कृषिमंत्री कोण हे कोणालाही माहिती नाही'', आदित्य ठाकरेंचा शेतकऱ्यांच्या बांधावरुन हल्लाबोल

- अनिलकुमार मेहेत्रेपाचोड ( छत्रपती संभाजीनगर) : मराठवाड्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शिवसेना  नेते आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पण सरकारचे कोणीही त्यांच्यासोबत उभे नाही. मागच्या वेळी कृषिमंत्री असलेले यावेळी पालकमंत्री आहेत, ते त्यावेळी देखील फिरकले नाहीत. आता कृषिमंत्री कोणीतरी दुसरे आहे, नाव देखील माहिती नाही राज्याला, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केला. 

शेतकऱ्यांना मदत करताना राजकारण करू नये. माझा पाहणी दौरा जाहीर झाला त्यानंतर आता सरकर सक्रिय झाल्याची टीका ठाकरे यांनी केली. तसेच राष्ट्रपती देखील मराठवाड्यात आहेत, त्यांनी गंभीर पुर परिस्थितीची नोंद घेऊन सूचना कराव्यात अशी मागणी देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. 

पैठण तालुक्यात शनिवारी  रविवारी व सोमवारी  पाचोड गावासह  विविध गावात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. पाचोड परिसरातील गल्हाटी नदीला महापूर आल्यामुळे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. यात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी संजय नागोराव भुमरे पाटील यांची तर चक्क अडीच एकर जमीन खरडून वाहून गेली. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे हे बुधवारी सकाळी साडे आकरा वाजता पाचोडला आले. आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणचे नुकसानग्रस्त शेतकरी राजेश शेठी व माणिक शेळके शेतात जाऊन पावसाने नुकसान झालेल्या कपाशीची पाहणी केली.

यावेळी शेतकरी माणिक शेळके व राजेश सेठी यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे समोर आपली कैफियत मांडली. तीन दिवस पडलेल्या पावसामुळे कपाशीचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करावे व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. तर माणिक शेळके या शेतकऱ्यांनी सांगितले की, पाचोड ते अंबड रोड झाल्यामुळे बाजूला प्लॉट पडले आहेत. त्या ठिकाणी असलेल्या पुलाची दुरुस्ती न केल्यामुळे पावसाचे पाणी दरवर्षी माझ्या शेतात येत असल्याने दरवर्षी माझे अतोनात नुकसान होत असल्याचे सांगितले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी तहसीलदार सारंग चव्हाण यांच्याकडून पैठण तालुक्यातील नुकसानीची माहिती घेतली.

यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख दत्तात्रय गोर्डे, अॅड. बद्रीनारायण भुमरे, माजी नगरसेवक आप्पासाहेब गायकवाड, शिवसेना तालुका अध्यक्ष मनोज पेरे, संजय भुमरे, आनिस पटेल यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी, अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादRainपाऊसFarmerशेतकरी