शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, राज्याचे कृषिमंत्री कोणाला माहिती नाहीत: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 13:02 IST

''राज्याचे कृषिमंत्री कोण हे कोणालाही माहिती नाही'', आदित्य ठाकरेंचा शेतकऱ्यांच्या बांधावरुन हल्लाबोल

- अनिलकुमार मेहेत्रेपाचोड ( छत्रपती संभाजीनगर) : मराठवाड्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शिवसेना  नेते आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पण सरकारचे कोणीही त्यांच्यासोबत उभे नाही. मागच्या वेळी कृषिमंत्री असलेले यावेळी पालकमंत्री आहेत, ते त्यावेळी देखील फिरकले नाहीत. आता कृषिमंत्री कोणीतरी दुसरे आहे, नाव देखील माहिती नाही राज्याला, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केला. 

शेतकऱ्यांना मदत करताना राजकारण करू नये. माझा पाहणी दौरा जाहीर झाला त्यानंतर आता सरकर सक्रिय झाल्याची टीका ठाकरे यांनी केली. तसेच राष्ट्रपती देखील मराठवाड्यात आहेत, त्यांनी गंभीर पुर परिस्थितीची नोंद घेऊन सूचना कराव्यात अशी मागणी देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. 

पैठण तालुक्यात शनिवारी  रविवारी व सोमवारी  पाचोड गावासह  विविध गावात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. पाचोड परिसरातील गल्हाटी नदीला महापूर आल्यामुळे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. यात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी संजय नागोराव भुमरे पाटील यांची तर चक्क अडीच एकर जमीन खरडून वाहून गेली. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे हे बुधवारी सकाळी साडे आकरा वाजता पाचोडला आले. आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणचे नुकसानग्रस्त शेतकरी राजेश शेठी व माणिक शेळके शेतात जाऊन पावसाने नुकसान झालेल्या कपाशीची पाहणी केली.

यावेळी शेतकरी माणिक शेळके व राजेश सेठी यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे समोर आपली कैफियत मांडली. तीन दिवस पडलेल्या पावसामुळे कपाशीचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करावे व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. तर माणिक शेळके या शेतकऱ्यांनी सांगितले की, पाचोड ते अंबड रोड झाल्यामुळे बाजूला प्लॉट पडले आहेत. त्या ठिकाणी असलेल्या पुलाची दुरुस्ती न केल्यामुळे पावसाचे पाणी दरवर्षी माझ्या शेतात येत असल्याने दरवर्षी माझे अतोनात नुकसान होत असल्याचे सांगितले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी तहसीलदार सारंग चव्हाण यांच्याकडून पैठण तालुक्यातील नुकसानीची माहिती घेतली.

यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख दत्तात्रय गोर्डे, अॅड. बद्रीनारायण भुमरे, माजी नगरसेवक आप्पासाहेब गायकवाड, शिवसेना तालुका अध्यक्ष मनोज पेरे, संजय भुमरे, आनिस पटेल यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी, अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादRainपाऊसFarmerशेतकरी