शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

समलिंगी लग्नावर न्यायालयाचा घाईत निर्णय नको; विश्व हिंदू परिषद करणार कडाडून विरोध

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 6, 2023 19:34 IST

लग्नविधी हा भारतीय समाजातील सर्वच जाती-धर्मामध्ये पवित्र असा विधी आहे.

छत्रपती संभाजीनगर : सध्या देशात पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणाऱ्यांमध्ये समलिंगी विवाहाचे फॅड आले आहे. अशा विवाहांना मान्यता द्यावी की अथवा नाही, यासंदर्भात सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अशा समलिंगी विवाहांना मान्यता म्हणजे समाजासाठी घातक ठरू शकते. समाजाचा समतोल बिघडू शकतो. यासाठी समाजातील सर्व घटकांचा विचार ऐकावा तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने घाईघाईत निर्णय घेऊ नये, अशी विनंती विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी केली.

विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी व बजरंग दलाचे प्रशिक्षण शिबिर देशभरात सुरू आहे. त्यानिमित्ताने परांडे यांचे शुक्रवारी शहरात आगमन झाले. सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी सांगितले की, लग्नविधी हा भारतीय समाजातील सर्वच जाती-धर्मामध्ये पवित्र असा विधी आहे. यामुळे समलिंगी विवाहांना सर्व स्तरातून विरोध होत आहे. निर्णय घेण्यापूर्वी याचा विचार न्यायालयाने करणे आवश्यक आहे, असे विहिंपचे मत आहे. औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले; पण काही राजकीय पक्ष या नावाला विरोध करीत आहेत. या विरोधात विहिंप आक्रमकपणे उभी राहील. दोन महिन्यांत देशात विविध भागांत दंगली घडल्या. त्या घडविणाऱ्यांना कठोर शासन करावे, अशी मागणीही त्यांनी केली. या पत्रपरिषदेस प्रांताध्यक्ष संजय बारगजे, आनंद पांडे यांची उपस्थिती होती.

धर्मांतरविरोधी कायदा महाराष्ट्रातही लागू करावाधर्मांतरविरोधी कायदा काही राज्यांत लागू झाला. केंद्र सरकारनेही यासाठी पुढाकार घ्यावा, महाराष्ट्रातही राज्य शासनाने कायदा लवकर लागू करावा, अशी मागणी विहिंपतर्फे करण्यात आली.

मंगळवारी देशभरात सामूहिक हनुमान चालिसा पठणबजरंग दलावर बंदी आणण्यासाठी काँग्रेससह अन्य राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. त्यास विरोध दर्शविण्यासाठी बजरंग दल, विहिंपतर्फे देशभरात मंगळवारी (९ मे) सायंकाळी सामूहिक हनुमान चालिसा पठण करण्यात येणार असल्याची घोषणा परांडे यांनी केली.

टॅग्स :Courtन्यायालयLGBTएलजीबीटीAurangabadऔरंगाबाद