शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

दोस्त दोस्त ना रहा : वैजापूर न.प. निवडणुकीचा आखाडा तापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 11:11 IST

येथील न.प. निवडणुकीचा आखाडा तापला असून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजपने आपापल्या जोरावर निवडणूक लढविण्याची म्हणजेच स्वत:च्या झेंड्यांखाली विरोधकांची उणीदुणी काढण्याची घोषणा केली. त्यामुळे कालपर्यंत गळ्यात गळे, मांडीला मांडी आणि खांद्याला खांदा लावणारे नेते आज एकमेकांवरच शब्दांच्या पिचकाऱ्या उडवून शिमगा खेळताना दिसणार आहेत. म्हणजे यांचे खरे शत्रू कोण आणि मित्र कोण याचा संशयकल्लोळ वैजापूरच्या राजकारणात चालू आहे.

मोबीन खानवैजापूर : येथील न.प. निवडणुकीचा आखाडा तापला असून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजपने आपापल्या जोरावर निवडणूक लढविण्याची म्हणजेच स्वत:च्या झेंड्यांखाली विरोधकांची उणीदुणी काढण्याची घोषणा केली. त्यामुळे कालपर्यंत गळ्यात गळे, मांडीला मांडी आणि खांद्याला खांदा लावणारे नेते आज एकमेकांवरच शब्दांच्या पिचकाऱ्या उडवून शिमगा खेळताना दिसणार आहेत. म्हणजे यांचे खरे शत्रू कोण आणि मित्र कोण याचा संशयकल्लोळ वैजापूरच्या राजकारणात चालू आहे.

निवडणूक बदलली की राजकीय समीकरणात बदल होतात. युत्या-आघाड्या तसेच मित्र-शत्रू बदलतात. या राजकीय गणितांचा पुनश्च अनुभव देणाºया वैजापूर नगर परिषद निवडणुकीने शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून राजकारणातील सर्व डावपेच कृतीत आणताना बेरजेच्या राजकारणावर भर दिला जात आहे. मात्र, जनाधार नेमका कोणाला साथ देईल, याचा अंदाज कठीण बनल्याचेच चित्र शहरात दिसून येत आहे. नगर परिषद निवडणूक रिंगणात नेमके किती अन् कोणते उमेदवार असणार हे येत्या २६ मार्चला स्पष्ट होणार आहे. सद्यस्थितीचा विचार करता प्रामुख्याने शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एम.आय.एम.चे उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय अपक्ष उमेदवारांचीही मोठी संख्या असल्याने येथील निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एकेकाळचे मित्र असलेल्या, मात्र आता पालिका निवडणुकीत राजकीय विरोधक असलेल्या आपल्याच मित्रांना पराभूत करण्याची वेळ माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्यावर आली असून यामध्ये नेमके कोण यशस्वी होतो, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून शिल्पा परदेशी या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. शिल्पा परदेशी या माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्या पत्नी असल्याने ही निवडणूक परदेशींसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. शिवसेनेच्या वतीने माजी नगराध्यक्ष साबेर खान यांची सून सय्यद तशफा अझहर अली नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी व एम.आय.एम.ने काही प्रभागात आपले उमेदवार उभे केले असून नगराध्यक्षपदासाठी डॉ. राजीव डोंगरे यांच्या पत्नी विजया डोंगरे यांचे ऐन वेळेवर भाजपकडून तिकीट कापले गेल्याने त्यांनी अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज सादर केल्याने त्या ऐन वेळेवर काँग्रेससोबत जाणार की अपक्ष तिकीटावरच निवडणूक लढविवार यावर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

जनतेतून नगराध्यक्षासह अकरा प्रभागातून २३ नगरसेवक निवडले जाणार असताना नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठीही मोठी चुरस निर्माण झाली आहे. काही आजी माजी नगरसेवकांसह शहरातील चर्चेतील पदाधिकाºयांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले असून बहुतेक जण मतदारांशी संपर्क साधून असल्याने सर्व लढती चुरशीने होण्याचीच चिन्हे दिसून येत आहेत.

नव्या समीकरणांची जुळवणी होणार

शहरात शिवसेनेला आपली परिस्थिती भक्कम असल्याचे भाजपला दाखवायचे आहे. राष्ट्रवादीला देखील आपण शहरात दुसºया क्रमांकाचा पक्ष असल्याने आपले महत्त्व सिद्ध करायचे आहे. मात्र २६ मार्चनंतर राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस व शिवसेना यांच्यात समझोता होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. थेट नगराध्यक्षपदाची ही निवडणूक अधिक चुरशीची होणार यात शंकाच नाही. मात्र त्यानिमित्ताने नव्या समीकरणांची जुळवणी होणार आहे.

शहरात एकूण मतदारसंख्या ३८ हजार ९८९ असून त्यात सर्वाधिक मतदार संख्या मुस्लीम समाजाची १० हजार ७०४ आहे. त्यानंतर अनुसूचित जातीची मतदार संख्या ६ हजार २७९ अणि अनु. जमातीची मतदारसंख्या १ हजार ३१ असून व इतर समाजाचे २० हजार ९७५ मतदार आहेत. शहरात रणकंदन होत असताना अत्यंत उदासिनतेने नागरिक याकडे पाहत आहेत. ठराविक मंडळीपुरताच हा मर्यादित खेळ ठरल्याचे स्पष्ट चित्र सध्या शहरात पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा