शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

ना गतिरोधक, ना सिग्नल; वेस ओलांडून शहरात यायची शेंद्रा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना भीती

By साहेबराव हिवराळे | Updated: March 7, 2024 18:39 IST

एक दिवस एक वसाहत: नवीन परिसर उंच-उंच इमारतींमुळे देखणा दिसतो. उच्चशिक्षित रहिवासी आहेत. काही सरकारी व निमसरकारी कर्मचारी, अधिकारी येथे राहतात.

छत्रपती संभाजीनगर : प्लॅटिनम, सारा, कॉपरस्टोन, सेक्टर ४१ सह जुन्नेश्वर, वरूड रोडवरील वसाहती अगदी छत्रपती संभाजीनगरच्या वेशीवरील; पण त्या आहेत शेंद्रा पंचतारांकित ग्रामपंचायतीच्या हद्दीत. भरधाव वाहणारा जालना रोड पार करताना जराशी नजर हटली तरी अपघातास सामोरे जाण्याची भीती या नागरिकांना सारखी वाटते. येथे ना स्पीड ब्रेकर ना सिग्नल. म्हणून जीव मुठीत धरूनच जालना रोड ओलांडावा लागतो. अहो, किमान सिग्नल बसवा, नाही तरी स्पीड ब्रेकर तरी टाका, या त्यांच्या किमान अपेक्षाही कोण पूर्ण करणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

नवीन परिसर उंच-उंच इमारतींमुळे देखणा दिसतो. उच्चशिक्षित रहिवासी आहेत. काही सरकारी व निमसरकारी कर्मचारी, अधिकारी येथे राहतात. रहदारीच्या ठिकाणी रस्त्यावर परवानगीने गतिरोधक उभारण्याविषयी नागरिकांंच्या शिष्टमंडळाने अनेक लोकप्रतिनिधींसमोर आपली व्यथा मांडली; परंतु अद्याप कोणीही निराकरण केलेले नाही. जालना रोड पार करण्यासाठी काही वेळ थांबल्याशिवाय नागरिकांना सुरक्षित रस्ता पार करण्याचे दिव्य लाभत नाही. दररोज ही जीवघेणी कसरत नागरिकांना करावी लागते. अंधारात तर अत्यंत गैरसोयीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागत असून, शेंद्रा ग्रामपंचायत देखील या नवीन वसाहतीकडे लक्ष देत नाही. नागरिकांनी आपल्या व्यथा मांडाव्यात तरी कुणाकडे, असा प्रश्न आहे. नळ नसल्याने बोअरवेल आणि पिण्यासाठी जारचे पाणी उपयोगात आणावे लागते. उन्हाळ्यात बोअरवेलचे पाणी आटल्याने विकतचे टँकर मागवावे लागते.

अंधारात अपघाताची भीतीदिवसा रस्ता ओलांडणे, हे धोक्याचे आहेच; पण रात्री ट्युशनहून मुली, मुले आणि कामगार येतात. त्यांना अंधारातच चालत जावे लागते. ग्रामपंचायतीने किंवा लोकप्रतिनिधीच्या निधीतून पथदिवे लावण्याची आवश्यकता आहे. याकडे लक्ष कोण देणार, असा प्रश्न आहे.-संदीप बंड, रहिवासी

विजेचा लपंडाववीजपुरवठा खंडित झाल्यास तत्काळ दखल घेतली जात नाही. वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे लक्ष दिले पाहिजे.- नामदेव कातारे, रहिवासी

रहदारीसाठी सिग्नल तर लावा...सुरळीतपणे रस्ता ओलांडता यावा म्हणून या रस्त्यावर वाहतुकीची गती कमी व्हावी आणि गतिरोधक, वाहतूक सिग्नल बसविण्याची गरज आहे. जागतिक रस्ते विकास महामंडळाने हा प्रश्न सोडवावा.- शिवाजी हरकळ, रहिवासी

जलवाहिनी टाकाबोअरवेलच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. अनेकदा टँकरचे पाणी विकत आणावे लागते. ग्रामपंचायतीने जलवाहिनी टाकण्याची गरज आहे.- कन्नन अय्यर, रहिवासी

कचऱ्याचे नियोजन करा..स्वखर्चाने प्लॅटिनम सोसायटीतील नागरिकांना कचरा उचलावा लागतो. इतरत्र ग्रामपंचायतीच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या फिरविल्या जातात. कचरा उचलण्याची सोय नसल्याने काही जण रस्त्यावर कचरा टाकत आहेत.- ज्ञानेश्वर काकड, रहिवासी

कर लावून सेवा-सुविधा पुरवाव्यात..ग्रामपंचायतीने घरांना कर लावून स्थानिक सेवा-सुविधा पुरवाव्यात. नागरिकांनी व बांधकाम व्यावसायिकांंनी पुढाकार घेण्याची गरज आहे.- शिवाजी बेलखेडे, रहिवासी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका