शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

ना गतिरोधक, ना सिग्नल; वेस ओलांडून शहरात यायची शेंद्रा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना भीती

By साहेबराव हिवराळे | Updated: March 7, 2024 18:39 IST

एक दिवस एक वसाहत: नवीन परिसर उंच-उंच इमारतींमुळे देखणा दिसतो. उच्चशिक्षित रहिवासी आहेत. काही सरकारी व निमसरकारी कर्मचारी, अधिकारी येथे राहतात.

छत्रपती संभाजीनगर : प्लॅटिनम, सारा, कॉपरस्टोन, सेक्टर ४१ सह जुन्नेश्वर, वरूड रोडवरील वसाहती अगदी छत्रपती संभाजीनगरच्या वेशीवरील; पण त्या आहेत शेंद्रा पंचतारांकित ग्रामपंचायतीच्या हद्दीत. भरधाव वाहणारा जालना रोड पार करताना जराशी नजर हटली तरी अपघातास सामोरे जाण्याची भीती या नागरिकांना सारखी वाटते. येथे ना स्पीड ब्रेकर ना सिग्नल. म्हणून जीव मुठीत धरूनच जालना रोड ओलांडावा लागतो. अहो, किमान सिग्नल बसवा, नाही तरी स्पीड ब्रेकर तरी टाका, या त्यांच्या किमान अपेक्षाही कोण पूर्ण करणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

नवीन परिसर उंच-उंच इमारतींमुळे देखणा दिसतो. उच्चशिक्षित रहिवासी आहेत. काही सरकारी व निमसरकारी कर्मचारी, अधिकारी येथे राहतात. रहदारीच्या ठिकाणी रस्त्यावर परवानगीने गतिरोधक उभारण्याविषयी नागरिकांंच्या शिष्टमंडळाने अनेक लोकप्रतिनिधींसमोर आपली व्यथा मांडली; परंतु अद्याप कोणीही निराकरण केलेले नाही. जालना रोड पार करण्यासाठी काही वेळ थांबल्याशिवाय नागरिकांना सुरक्षित रस्ता पार करण्याचे दिव्य लाभत नाही. दररोज ही जीवघेणी कसरत नागरिकांना करावी लागते. अंधारात तर अत्यंत गैरसोयीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागत असून, शेंद्रा ग्रामपंचायत देखील या नवीन वसाहतीकडे लक्ष देत नाही. नागरिकांनी आपल्या व्यथा मांडाव्यात तरी कुणाकडे, असा प्रश्न आहे. नळ नसल्याने बोअरवेल आणि पिण्यासाठी जारचे पाणी उपयोगात आणावे लागते. उन्हाळ्यात बोअरवेलचे पाणी आटल्याने विकतचे टँकर मागवावे लागते.

अंधारात अपघाताची भीतीदिवसा रस्ता ओलांडणे, हे धोक्याचे आहेच; पण रात्री ट्युशनहून मुली, मुले आणि कामगार येतात. त्यांना अंधारातच चालत जावे लागते. ग्रामपंचायतीने किंवा लोकप्रतिनिधीच्या निधीतून पथदिवे लावण्याची आवश्यकता आहे. याकडे लक्ष कोण देणार, असा प्रश्न आहे.-संदीप बंड, रहिवासी

विजेचा लपंडाववीजपुरवठा खंडित झाल्यास तत्काळ दखल घेतली जात नाही. वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे लक्ष दिले पाहिजे.- नामदेव कातारे, रहिवासी

रहदारीसाठी सिग्नल तर लावा...सुरळीतपणे रस्ता ओलांडता यावा म्हणून या रस्त्यावर वाहतुकीची गती कमी व्हावी आणि गतिरोधक, वाहतूक सिग्नल बसविण्याची गरज आहे. जागतिक रस्ते विकास महामंडळाने हा प्रश्न सोडवावा.- शिवाजी हरकळ, रहिवासी

जलवाहिनी टाकाबोअरवेलच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. अनेकदा टँकरचे पाणी विकत आणावे लागते. ग्रामपंचायतीने जलवाहिनी टाकण्याची गरज आहे.- कन्नन अय्यर, रहिवासी

कचऱ्याचे नियोजन करा..स्वखर्चाने प्लॅटिनम सोसायटीतील नागरिकांना कचरा उचलावा लागतो. इतरत्र ग्रामपंचायतीच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या फिरविल्या जातात. कचरा उचलण्याची सोय नसल्याने काही जण रस्त्यावर कचरा टाकत आहेत.- ज्ञानेश्वर काकड, रहिवासी

कर लावून सेवा-सुविधा पुरवाव्यात..ग्रामपंचायतीने घरांना कर लावून स्थानिक सेवा-सुविधा पुरवाव्यात. नागरिकांनी व बांधकाम व्यावसायिकांंनी पुढाकार घेण्याची गरज आहे.- शिवाजी बेलखेडे, रहिवासी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका