शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

ना तासिका, ना शिक्षकांच्या नियुक्त्या; तरीही ७७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त प्रवेश

By राम शिनगारे | Updated: July 29, 2024 13:24 IST

शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या कारवाईकडे लक्ष; छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरातील अनुदानित महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची वानवा, ग्रामीणमध्ये दुप्पट प्रवेश

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा शोध घ्यावा लागत असतानाच ग्रामीण भागातील तब्बल ७७ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देण्यात आले आहेत. या महाविद्यालयांमध्ये नियमित तासिका होत नाहीत. त्याठिकाणी शिक्षकांची नियुक्ती नसून, भौतिक सुविधाही उपलब्ध नाहीत. त्यामुळे नियमबाह्यपणे प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवर शिक्षण उपसंचालक कार्यालय कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहरातील नामांकित अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी अकरावी प्रवेश न घेता ग्रामीण भागातील महाविद्यालयांना प्राधान्य देत असल्याचे उघडकीस आले होते. त्यानुसार कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांच्या संघटनेने शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांची भेट घेत हा गंभीर मुद्दा असल्याचे सांगितले. शहरातील महाविद्यालयात विद्यार्थी संख्या नसल्यामुळे संचमान्यतेमध्ये अनेक शिक्षकांची पदसंख्या कमी होत असल्याकडेही लक्ष वेधले होते. साबळे यांनी त्यांच्या अंतर्गत चारही जिल्ह्यांतील कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक शाळांच्या तपासणीचा निर्णय घेतला.

८ ते १५ जुलैदरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४३४ महाविद्यालयांची तपासणी करण्यात आली. या तपासणीचे अहवाल येण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार शहराच्या हद्दीजवळील ५ आणि ग्रामीण भागातील ७२ अशा ७७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देण्यात आल्याचे दिसले. फक्त अकरावीच्या नव्हे तर बारावीच्या वर्गातही अतिरिक्त प्रवेश दिले आहेत. ज्या महाविद्यालयांमध्ये भौतिक सुविधा पूर्णपणे आहेत, त्या ठिकाणी एकूण मान्यतेच्या १० टक्के प्रवेश देता येतात. मात्र, ७७ पैकी एकाही महाविद्यालयाने अतिरिक्त प्रवेश देताना परवानगी घेतली नाही.

८०, १२० च्या जागी दुप्पट प्रवेशअकरावी, बारावीच्या वर्गात अनेक महाविद्यालयांमध्ये ८० किंवा १२० च्या तुकडीची मान्यता आहे. भाैतिक सुविधा असल्यानंतर नियमानुसार १० टक्के अतिरिक्त प्रवेश देता येतात. त्यासही उपसंचालक कार्यालयाची मान्यता घ्यावी लागते. मात्र, महाविद्यालयाच्या प्रशासनाने कोणाचीही परवानगी न घेता काही ठिकाणी दुप्पट प्रवेश दिले आहेत. आता या महाविद्यालयांवर कोणती कारवाई होते, याकडे संबंधित वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अतिरिक्त प्रवेश देणाऱ्यांना नोटीसउच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी, बारावीमध्ये देण्यात आलेल्या प्रवेशाची तपासणी केली आहे. त्याविषयीचे अहवाल प्राप्त होत आहेत. अतिरिक्त प्रवेश देणाऱ्यांना नोटीस पाठवून खुलासा मागविण्यात येईल. त्यानंतर कडक कारवाई होईल.- अनिल साबळे, शालेय शिक्षण उपसंचालक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी