शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

गडकरींच्या व्हिजनला सुरुंग; औरंगाबाद ते पैठण रस्ता चौपदरीऐवजी द्विपदरी करण्याचा घाट ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 19:44 IST

एनएचएआयच्या या प्रकाराविरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुढच्या आठवड्यात भेटून सगळा प्रकार कानावर घालणार असल्याचे रोहयो मंत्री संदिपान भूमरे यांनी सांगितले.

- विकास राऊतऔरंगाबाद : औरंगाबाद ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे औरंगाबाद ते पैठण हा रस्ता चौपदरीऐवजी द्विपदरी करण्यासाठी एनएचएआयमधील काही महाभागांनी नागपूर क्षेत्रीय कार्यालयाशी पत्रव्यवहार केल्याची माहिती पुढे आली आहे.

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी २४ एप्रिल २०२२ रोजी पुढच्या दौऱ्यात औरंगाबाद ते पुणे या द्रुतगती मार्गाचे भूमीपूजन करण्याचा शब्द देत औरंगाबाद ते पैठण या सुमारे १६०० कोटी रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन केले. त्यांच्या व्हिजनला एनएचएआयमधील काही महाभागांनी सुरुंग लावत नागपूर कार्यालयाशी पत्रव्यवहार करून औरंगाबाद ते पैठण हा महामार्ग १० मीटर दोन्ही बाजूंनी रुंद करावा. जेणेकरून भूसंपादनाचा खर्च वाचेल. तसेच नवीन प्रस्तावित महामार्गाशी औरंगाबाद ते पैठण रस्ता जोडल्यास बहुतांश मार्ग चौपदरी होईल. भूसंपादन, अलायन्मेंटवरून सुरू असलेले वाददेखील होणार नाहीत. अशा आशयाचे पत्र एनएचएआयच्या प्रकल्प कार्यालयाकडून नागपूर कार्यालयाकडे पाठविल्याची चर्चा असून, एनएचएआयच्या अध्यक्षा अलका उपाध्याय यांच्याकडे याबाबत येत्या आठवड्यांत बैठक होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.

अलायन्मेंट बदलण्याचे अधिकार प्रकल्प संचालक कार्यालयाला नाहीत. यातूनच महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्तावच बदलण्याची भूमिका काही अधिकाऱ्यांनी घेतली असून, तसे क्षेत्रीय व मुख्य कार्यालयापर्यंत पत्राद्वारे कळविण्यात आल्याची चर्चा आहे. कुणाच्या फायद्यासाठी तो महामार्ग नसून औरंगाबाद ते पैठण या पट्ट्यातील उद्योग आणि भक्तांना नाथनगरीपर्यंतचा प्रवास सुकर होण्यासाठी १२ वर्षांनंतर भूमिपूजनाला मुहूर्त लागला. चार वेळा निविदा, दोन डीपीआर होऊनही त्या मार्गातील अडथळे अजून कायम आहेत. सुमारे १०० हेक्टर भूसंपादन, आक्षेप, हरकतींचा निपटारा झाल्यावर निविदा प्रक्रियेला सुरुवात होईल. याला सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्टपणे दिसत असतानाच आता तो रस्ता १० मीटर म्हणजेच विद्यमान रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ५-५ मीटर रुंदीकरणाचा घाट घालण्यासाठी एनएचएआयमधील काही अधिकारी सरसावले आहेत. जर या अधिकाऱ्यांचे मनसुबे यशस्वी झाले तर औरंगाबाद ते पैठण मार्ग चौपदरी होणार नाही.

प्रकल्प संचालकांची माहिती अशी----प्रकल्प संचालक अरविंद काळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, १० मीटरमध्येच पैठण रस्ता रूंदीकरण करण्याच्या काही हालचाली सुरू नाहीत. भूसंपादनाच्या अनुषंगाने काही हरकती आल्या आहेत. भूसंपादनामुळे काही वाद होण्याची शक्यता असल्यामुळे द्विपदरीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याबाबत पत्रव्यवहार झाला आहे काय ? याबाबत अधिकृतपणे काही सांगता येणार नाही. जोपर्यंत मुख्यालयाकडून याबाबत काही सूचना येणार नाहीत, तोवर काही सांगता येणार नाही.

कार्यकारी अभियंता काय म्हणतात----कार्यकारी अभियंता महेश पाटील यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले, मी सुटीवर होतो. असे काही पत्र येथून नागपूर कार्यालयाला गेले आहे की नाही, याची माहिती घेऊनच बोलता येईल. औरंगाबाद ते पुणे या प्रस्तावित रस्त्याच्या घोषणेमुळे औरंगाबाद ते पैठण हा रस्ता १० मीटर रूंद करण्याबाबत पत्र आपल्या स्तरावरून गेले आहे काय? याबाबत पाटील यांनी माहिती घ्यावी लागेल, असे उत्तर दिले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री काय म्हणाले----केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद ते पुणे या द्रुतगती मार्गाची घोषणा करताना औरंगाबाद ते पैठण या महामार्गाचे भूमिपूजन केले आहे. पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गाचे अलायन्मेट वेगळे आहे. त्याचा पैठणशी काहीही संबंध नाही. औरंगाबाद ते पैठण हा रस्ता चौपदरीच होईल, यासाठी मी स्वत: गडकरी यांना दोन दिवसांत भेटेन.

गडकरींना भेटून त्यांच्या कानावर घालणार----औरंगाबाद ते पैठण महामार्ग द्विपदरी करणाच्या हालचाली सुरू झाल्याचे माझ्या कानावर आले आहे. जर का रस्ता द्विपदरी करायचा असेल, तर मग आहे तोच रस्ता चांगला आहे. एनएचएआयच्या या प्रकाराविरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुढच्या आठवड्यात भेटून सगळा प्रकार कानावर घालणार असल्याचे रोहयो मंत्री संदिपान भूमरे यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग