शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

नीती आयोगाने केंंद्र सरकारला न्यायाधिकरण स्थापण्याची केली शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 23:30 IST

शेतीमालाचा दर ठरविण्यासाठी आता कायदेशीर न्यायाधिकरणाची स्थापना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय आला आहे .यावरून नीती आयोगाने केंद्र सरकारला न्यायाधिकरण (ट्रॅब्यूनल) स्थापन करण्याची शिफारस केली आहे. या शिफारसीनुसार शेतकी न्यायाधिकरण स्थापन झाले तर खऱ्या अर्थाने शेतकºयांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच महाराष्ट्र कृषक हितवर्धक संघटनेचा सुमारे १७ वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यास खºया अर्थाने यश येईल, अशी माहिती उच्च न्यायालयातील अ‍ॅड. अजय तल्हार यांनी मंगळवारी (दि.२४ ) पत्र परिषदेत दिली.

ठळक मुद्देनीती आयोगाने केंंद्र सरकारला न्यायाधिकरण स्थापण्याची केली शिफारस

औरंगाबाद: शेतीमालाचा दर ठरविण्यासाठी आता कायदेशीर न्यायाधिकरणाची स्थापना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय आला आहे .यावरून नीती आयोगाने केंद्र सरकारला न्यायाधिकरण (ट्रॅब्यूनल) स्थापन करण्याची शिफारस केली आहे.या शिफारसीनुसार शेतकी न्यायाधिकरण स्थापन झाले तर खऱ्या अर्थाने शेतकºयांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच महाराष्ट्र कृषक हितवर्धक संघटनेचा सुमारे १७ वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यास खºया अर्थाने यश येईल, अशी माहिती उच्च न्यायालयातील अ‍ॅड. अजय तल्हार यांनी मंगळवारी (दि.२४ ) पत्र परिषदेत दिली.जळगाव जिल्ह्यातील कर्की येथील प्रकाश गंभीर महाजन यांनी महाराष्ट्र कृषक हितवर्धक संघटनेची (मुक्ताईनगर) स्थापना केली. या संघटनेने अ‍ॅड. तल्हार यांच्यामार्फत खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. त्यामध्ये केंद्र शासनाला शेतकºयांच्या शेतीमालाला योग्य दर निर्धारण करण्यासाठी (भारतीय संविधानाच्या परिच्छेद ३२३ ब अन्वये) शेतमाल मूल्य निर्धारण न्यायाधिकरण स्थापन करण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती केली. जेणेकरून शेतमालाचे मूल्य निर्धारण हे न्यायिक पद्धतीने केले जाईल व शेतकºयांच्या सर्व समस्यांचे निराकरण होईल.याचिकेमध्ये असेही निदर्शनास आणून दिले की, आतापर्यंत राज्य शासनाची समिती कृषी मालाचे भाव निर्धारित करून किमान उत्पादन खर्च अधिक १५ टक्के नफा मिळवत केंद्र शासनाकडे किमतीची शिफारस करते. आंतरराष्ट्रीय मूल्य विचारात घेऊन, किंमत ४० ते ५० टक्के कमी करून, शेतमालाची आधारभूत किंमत निश्चित करत असते. त्यामुळे उत्पन्न कमी व खर्च जास्त असा आतबट्ट्याचा व्यवहार होत असे. अर्थात त्यामुळे शेतकºयांना अंदाजे ३० ते ३५ टक्के तोटा होत होता.या जनहित याचिकेवर २० डिसेंबर २०१८ रोजी खंडपीठात सुनावणी झाली असता, केंद्र शासनाचे असिस्टंंट सॉलिसिटर जनरल यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, नीती आयोगाने सध्याच्या प्रचलित शेतमाल मूल्य निर्धारण समितीऐवजी शेतकरी न्यायाधिकरणाची स्थापना करण्याची शिफारस केली आहे. जेणेकरून शेतमालाचे मूल्य निर्धारण हे न्यायिक पद्धतीने करता येईल. या शिफारसीमुळे याचिकाकर्ते यांच्या मागण्या केंद्र शासनाकडे विचारार्थ आहेत, असे सकृतदर्शनी न्यायालयाचे मत झाले. त्या आधारे उच्च न्यायालयाने सदरील जनहित याचिका निकाली काढली. जर केंद्र शासनाने योग्य वेळेत सदरील प्रकरणी पुढील कारवाई केली नाही, तर याचिकाकर्ते पुनश्च उच्च न्यायालयात दाद मागू शकतील, अशी मुभा न्यायालयाने याचिकर्त्यास दिली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयFarmerशेतकरी