शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पाण्याच्या टँकरने ९ जणांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीचालकाला वाचविताना पाण्याच्या खाजगी टँकरने समोरून येणाºया आॅटो रिक्षाला धडक दिल्यानंतर टँकरने ...

ठळक मुद्देऔरंगाबाद-पैठण रोडवर मृत्यूचे तांडव : समोरासमोर टकरीनंतर टँकरने रिक्षाला पन्नास फूट फरपटत नेले; दोन जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीचालकाला वाचविताना पाण्याच्या खाजगी टँकरने समोरून येणाºया आॅटो रिक्षाला धडक दिल्यानंतर टँकरने रिक्षाला ५० फूट फरपटत नेले. या भीषण अपघातात रिक्षाचालकासह ९ प्रवासी टँकर आणि रिक्षाखाली चिरडून घटनास्थळीच ठार झाले. पैठण रोडवरील गेवराई तांडा येथे एका ढाब्याजवळ शुक्रवारी सायंकाळीसहाच्या सुमारास हा अपघात घडला. यानंतर प्रत्यक्षदर्शी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना घाटीत दाखल केले.जनार्दन नाथा अवचरमल (४८, रा. साईनगर, चितेगाव), त्यांची नात अनुजा सुनील अवचरमल (११), राममहेश प्यारेलाल ठाकूर (३७, रा. बिडकीन), त्यांची आई रामकुमारी प्यारेलाल ठाकूर (६०, रा.बिडकीन), भावजय पुष्पा धर्मेंद्र ठाकूर (३५, रा. बिडकीन) व पुतण्या युवराज धर्मेंद्र ठाकूर (३), शिवलालसिंग गुलाबसिंग ठाकूर (८४, रा. मातोश्री वृद्धाश्रम, कांचनवाडी), शेकू तुकाराम त्रिंबके (७५, रा. मातोश्री वृद्धाश्रम), रिक्षाचालक अमीर मतुर शेख (२३, रा. नूर कॉलनी, जुना बाजार) अशी मृतांची नावे आहेत.

रिक्षाचालक अमीर हा त्याच्या रिक्षात (एमएच-२० डीसी ४२६७) आठ प्रवाशांना घेऊन बिडकीनकडे जात होता. त्याचवेळी बिडकीनकडून पाण्याचे खाजगी टँकर (क्रमांक एमएच-१५जी ८४०) नक्षत्रवाडीकडे येत होते. गेवराई तांडा येथील एका ढाब्याजवळ बिडकीनकडून आलेला एक सुसाट दुचाकीस्वार औरंगाबादकडे जाण्यासाठी टँकरला ओव्हरटेक करण्यासाठी पुढे आला. डाव्या बाजूने अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी टँकरचालकाने वेगातील टँकर उजव्या बाजूच्या रस्त्यावर घेतले. त्याचवेळी समोरून अमीर रिक्षा घेऊन येत होता. उजव्या लेनवर आलेला त्यांच्यासाठी रस्ता सोडेल अथवा ब्रेक लावून त्यांना मार्ग देईल असे त्यांना वाटल्याने तो टँकरच्या दिशेने आला, मात्र टँकरचालकाने ब्रेक न लावता त्यांना जोराची धडक दिली. यावेळी टँकरने रिक्षाला सुमारे पन्नास फुटापर्यंत फरपटत नेले. हा अपघात एवढा भीषण होता की, रिक्षातील प्रवासी खाली पडून टँकरखाली चिरडले गेले.शर्थीच्या प्रयत्नांनंतरही अपयशच्अपघाताचे साक्षीदार असलेले घाटी रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीतील कर्मचारी हनुमान रूळे आणि त्यांच्या मित्रांनी पाच जखमींना दोन रिक्षांतून घाटीत नेले, मात्र दुर्दैैवाने जखमींनी रस्त्यातच प्राण सोडल्याने रुळे यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.च्अपघाताचे भीषण दृश्य पाहून प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी मदतकार्य सुरू केले. अरूंद रस्ता असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादauto rickshawऑटो रिक्षाDeathमृत्यू