शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

नववीतल्या पोराची 'डोकॅलिटी'; हेल्मेट घातल्याशिवाय सुरूच होणार नाही दुचाकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 16:24 IST

हेल्मेट वापराबाबतच्या जनजागृतीसाठी सरकारकडून जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. मद्यपान करून गाडी चालवू नका, हेल्मेट घाला- सुरक्षित प्रवास करा...

औरंगाबाद - हेल्मेट सक्तीविरोधात पोलिस प्रशासाने कठोर पाऊलं उचलली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी नागरिकांकडून हेल्मेट सक्तीला विरोध होत आहे. तर, जीव जाण्यापेक्षा हेल्मेट घातलेलंच बरं असेही अनेकांच म्हणणं आहे. औरंगाबादमध्ये इयत्ता नववी शिकणाऱ्या विस्मय विनोद तोतलाने एक भन्नाट शोध लावला आहे. जर, तुम्ही हेल्मेट घातले नाही, तर तुमची गाडीच सुरू होणार नाही, असे यंत्र विस्मयने बनवले आहे. विशेष म्हणजे तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे तुमच्या कुटुबीयांना लगेच मेसेजही मिळणार आहे.

हेल्मेट वापराबाबतच्या जनजागृतीसाठी सरकारकडून जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. मद्यपान करून गाडी चालवू नका, हेल्मेट घाला- सुरक्षित प्रवास करा.... अशा कितीतरी जाहिरातींवर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, औरंगाबादेतील एका शाळकरी मुलाने भन्नाट शोध लावून हेल्मेटचा वापर अनिवार्य केला आहे. औरंगाबदमधील नाथ व्हॅली स्कूल या शाळेत नववीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने आयडियाची कल्पना लढवली आहे. या स्मार्ट हेल्मेटची कमाल म्हणजे, डोक्यावर हेल्मेट घालून बसल्याशिवाय दुचाकी सुरुच होणार नाही.इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या विस्मय विनोद तोतलाने (12 वर्षे) केलेल्या संशोधनानुसार, तुम्ही हेल्मेट घातले तर तुमची गाडी सुरू होणार, जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असाल तर थेट तुमच्या घरी तसा संदेश जाईल. त्यानंतर तुमचं लोकेशनही तुमच्या घरी जाईल आणि तुमची गाडीच सुरू होणार नाही. विस्मयने केलेल्या या संशोधनाची निवड देशपातळीवरील विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे. या भन्नाट स्मार्ट हेल्मेटच्या निर्मितीसाठी विस्मयला एक महिन्याचा कालावधी लागला. या हेल्मेटमध्ये आर. एफ. ट्रान्समीटर, रिसीव्हर, अल्कोहल सेंसर, लिमिट स्वीचेस, जीपीएस अॅन्टिना या उपकरणांचा वापर करण्यात आला आहे.

दरम्यान, हेल्मेट सक्ती रद्द करावी या मागणीसाठी पुण्यात हेल्मेट विरोधी कृती समितीने महापालिकेच्या नवीन इमारतीमध्ये आंदोलन केले. महापौरांच्या कक्षाबाहेर तसेच मुख्य सभागृहामध्ये जोरदार घोषणाबाजी केली होती. 2001 साली राज्य शासनाने परिपत्रक काढून महामार्गावर हेल्मेट घालणे बंधनकारक केले होते. तर शहरी भागात हेल्मेट सक्ती नसल्याचे म्हटले होते. मात्र, त्यावर न्यायालयाने हे परिपत्रक चुकीचे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे 2003 साली परिपत्रक काढून शासनाने आधिचे परिपत्रक रद्द केले होते. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSchoolशाळाStudentविद्यार्थीResearchसंशोधनscienceविज्ञान