शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

नववीतल्या पोराची 'डोकॅलिटी'; हेल्मेट घातल्याशिवाय सुरूच होणार नाही दुचाकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 16:24 IST

हेल्मेट वापराबाबतच्या जनजागृतीसाठी सरकारकडून जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. मद्यपान करून गाडी चालवू नका, हेल्मेट घाला- सुरक्षित प्रवास करा...

औरंगाबाद - हेल्मेट सक्तीविरोधात पोलिस प्रशासाने कठोर पाऊलं उचलली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी नागरिकांकडून हेल्मेट सक्तीला विरोध होत आहे. तर, जीव जाण्यापेक्षा हेल्मेट घातलेलंच बरं असेही अनेकांच म्हणणं आहे. औरंगाबादमध्ये इयत्ता नववी शिकणाऱ्या विस्मय विनोद तोतलाने एक भन्नाट शोध लावला आहे. जर, तुम्ही हेल्मेट घातले नाही, तर तुमची गाडीच सुरू होणार नाही, असे यंत्र विस्मयने बनवले आहे. विशेष म्हणजे तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे तुमच्या कुटुबीयांना लगेच मेसेजही मिळणार आहे.

हेल्मेट वापराबाबतच्या जनजागृतीसाठी सरकारकडून जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. मद्यपान करून गाडी चालवू नका, हेल्मेट घाला- सुरक्षित प्रवास करा.... अशा कितीतरी जाहिरातींवर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, औरंगाबादेतील एका शाळकरी मुलाने भन्नाट शोध लावून हेल्मेटचा वापर अनिवार्य केला आहे. औरंगाबदमधील नाथ व्हॅली स्कूल या शाळेत नववीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने आयडियाची कल्पना लढवली आहे. या स्मार्ट हेल्मेटची कमाल म्हणजे, डोक्यावर हेल्मेट घालून बसल्याशिवाय दुचाकी सुरुच होणार नाही.इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या विस्मय विनोद तोतलाने (12 वर्षे) केलेल्या संशोधनानुसार, तुम्ही हेल्मेट घातले तर तुमची गाडी सुरू होणार, जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असाल तर थेट तुमच्या घरी तसा संदेश जाईल. त्यानंतर तुमचं लोकेशनही तुमच्या घरी जाईल आणि तुमची गाडीच सुरू होणार नाही. विस्मयने केलेल्या या संशोधनाची निवड देशपातळीवरील विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे. या भन्नाट स्मार्ट हेल्मेटच्या निर्मितीसाठी विस्मयला एक महिन्याचा कालावधी लागला. या हेल्मेटमध्ये आर. एफ. ट्रान्समीटर, रिसीव्हर, अल्कोहल सेंसर, लिमिट स्वीचेस, जीपीएस अॅन्टिना या उपकरणांचा वापर करण्यात आला आहे.

दरम्यान, हेल्मेट सक्ती रद्द करावी या मागणीसाठी पुण्यात हेल्मेट विरोधी कृती समितीने महापालिकेच्या नवीन इमारतीमध्ये आंदोलन केले. महापौरांच्या कक्षाबाहेर तसेच मुख्य सभागृहामध्ये जोरदार घोषणाबाजी केली होती. 2001 साली राज्य शासनाने परिपत्रक काढून महामार्गावर हेल्मेट घालणे बंधनकारक केले होते. तर शहरी भागात हेल्मेट सक्ती नसल्याचे म्हटले होते. मात्र, त्यावर न्यायालयाने हे परिपत्रक चुकीचे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे 2003 साली परिपत्रक काढून शासनाने आधिचे परिपत्रक रद्द केले होते. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSchoolशाळाStudentविद्यार्थीResearchसंशोधनscienceविज्ञान