शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

नववीतल्या पोराची 'डोकॅलिटी'; हेल्मेट घातल्याशिवाय सुरूच होणार नाही दुचाकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 16:24 IST

हेल्मेट वापराबाबतच्या जनजागृतीसाठी सरकारकडून जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. मद्यपान करून गाडी चालवू नका, हेल्मेट घाला- सुरक्षित प्रवास करा...

औरंगाबाद - हेल्मेट सक्तीविरोधात पोलिस प्रशासाने कठोर पाऊलं उचलली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी नागरिकांकडून हेल्मेट सक्तीला विरोध होत आहे. तर, जीव जाण्यापेक्षा हेल्मेट घातलेलंच बरं असेही अनेकांच म्हणणं आहे. औरंगाबादमध्ये इयत्ता नववी शिकणाऱ्या विस्मय विनोद तोतलाने एक भन्नाट शोध लावला आहे. जर, तुम्ही हेल्मेट घातले नाही, तर तुमची गाडीच सुरू होणार नाही, असे यंत्र विस्मयने बनवले आहे. विशेष म्हणजे तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे तुमच्या कुटुबीयांना लगेच मेसेजही मिळणार आहे.

हेल्मेट वापराबाबतच्या जनजागृतीसाठी सरकारकडून जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. मद्यपान करून गाडी चालवू नका, हेल्मेट घाला- सुरक्षित प्रवास करा.... अशा कितीतरी जाहिरातींवर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, औरंगाबादेतील एका शाळकरी मुलाने भन्नाट शोध लावून हेल्मेटचा वापर अनिवार्य केला आहे. औरंगाबदमधील नाथ व्हॅली स्कूल या शाळेत नववीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने आयडियाची कल्पना लढवली आहे. या स्मार्ट हेल्मेटची कमाल म्हणजे, डोक्यावर हेल्मेट घालून बसल्याशिवाय दुचाकी सुरुच होणार नाही.इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या विस्मय विनोद तोतलाने (12 वर्षे) केलेल्या संशोधनानुसार, तुम्ही हेल्मेट घातले तर तुमची गाडी सुरू होणार, जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असाल तर थेट तुमच्या घरी तसा संदेश जाईल. त्यानंतर तुमचं लोकेशनही तुमच्या घरी जाईल आणि तुमची गाडीच सुरू होणार नाही. विस्मयने केलेल्या या संशोधनाची निवड देशपातळीवरील विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे. या भन्नाट स्मार्ट हेल्मेटच्या निर्मितीसाठी विस्मयला एक महिन्याचा कालावधी लागला. या हेल्मेटमध्ये आर. एफ. ट्रान्समीटर, रिसीव्हर, अल्कोहल सेंसर, लिमिट स्वीचेस, जीपीएस अॅन्टिना या उपकरणांचा वापर करण्यात आला आहे.

दरम्यान, हेल्मेट सक्ती रद्द करावी या मागणीसाठी पुण्यात हेल्मेट विरोधी कृती समितीने महापालिकेच्या नवीन इमारतीमध्ये आंदोलन केले. महापौरांच्या कक्षाबाहेर तसेच मुख्य सभागृहामध्ये जोरदार घोषणाबाजी केली होती. 2001 साली राज्य शासनाने परिपत्रक काढून महामार्गावर हेल्मेट घालणे बंधनकारक केले होते. तर शहरी भागात हेल्मेट सक्ती नसल्याचे म्हटले होते. मात्र, त्यावर न्यायालयाने हे परिपत्रक चुकीचे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे 2003 साली परिपत्रक काढून शासनाने आधिचे परिपत्रक रद्द केले होते. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSchoolशाळाStudentविद्यार्थीResearchसंशोधनscienceविज्ञान