शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

नवी पाणीपुरवठा योजना होणार हायटेक; जलवाहिन्यांवर जीपीएसद्वारे ठेवणार कंट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 14:11 IST

शहरात जमिनीखालून (अंडरग्राऊंड) नव्याने टाकण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांवर जीपीएसचे नियंत्रण ठेवण्याबाबत चर्चा

ठळक मुद्देशहर पाणीपुरवठा योजनेचा नकाशा कळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापरशहरातील जलवाहिन्यांवर जीपीएसचा असणार कंट्रोल

औरंगाबाद : शहर पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी जमिनीखालून ज्या जलवाहिन्या जाणार आहेत त्यांना जीपीएस बसविण्यात यावे. जलवाहिनीचा नकाशा भविष्यात सर्व इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनुषंगाने कळण्यासाठी ती यंत्रणा बसविण्यात यावी, असे आदेश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी दिले.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरात १६८० कोटी रुपयांच्या तरतूदीतून शहर पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. योजनेच्या कामाच्या अनुषंगाने गुरुवारी पाणीपुरवठा मंत्र्यांनी मंत्रालयात बैठक घेतली. बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (एमजीपी) अभियंते व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

एमजीपीच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले, शहरात जमिनीखालून (अंडरग्राऊंड) नव्याने टाकण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांवर जीपीएसचे नियंत्रण ठेवण्याबाबत चर्चा झाली. सध्या जमिनीखालून गेलेल्या जलवाहिन्यांचा नकाशा पालिकेकडे पूर्णत: उपलब्ध नाही. त्यामुळे रस्ते, मल:निस्सारण वाहिन्या, इंटरनेट केबल, साईडड्रेनसाठी खोदकाम सुरू असताना जलवाहिन्या फुटतात. परिणामी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे संकट वारंवार येते. नवीन योजनेच्या कामांत जीपीएस यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर जलवाहिनी कुठे आहे, हे ताबडतोब कळेल. त्यामुळे जलवाहिन्या फुटण्याचे प्रमाण अत्यल्प असेल.

१० वर्षांनंतरही जीपीएस चालेलसूत्रांनी सांगितले, सध्याच्या जलवाहिन्यांना वापरण्यात येणारे जीपीएस तंत्रज्ञान हे पुढील दहा वर्षांपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक काळ टिकेल. पैठण ते नक्षत्रवाडीपर्यंत टाकण्यात येणारी जलवाहिनी रस्त्यालगतच वरून टाकण्यात येणार असल्यामुळे ती सहज दिसू शकेल. परंतु शहरात सुमारे २ हजार किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्या जमिनीखालून टाकण्यात येतील. त्या कुठून, कशा आणि कोणत्या भागातून गेल्या आहेत, हे जीपीएसमुळे समजणे शक्य होईल.

योजनेच्या कामाला गती द्याशहरासाठी १६८० कोटींच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. एमजीपीने जीव्हीपीआर या कंपनीला कंत्राट दिले आहे. योजनेचे काम सुरू असून शहरात नऊ जलकुंभांची उभारणी, नक्षत्रवाडी येथे जलशुध्दीकरण केंद्र आणि दोन एमबीआरचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. ४४ किमीची पा्ईपलाईन टाकण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. शहरात २ हजार किलोमीटर जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यापैकी सुमारे १५०० किलोमीटरचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी सर्वेक्षण झाले आहे. अशी माहिती बैठकीत एमजीपीने दिली. यावर योजनेच्या कामाला गती देण्याच्या सूचना पाणीपुरवठा मंत्र्यांनी केल्या.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका