शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

औरंगाबाद मेट्रो मार्गाला नवीन ‘वळण’; 'शेंद्रा ते वाळूज' अखंड नसेल, नव्या २ मार्गांचे सादरीकरण

By मुजीब देवणीकर | Updated: February 11, 2023 17:48 IST

शहराची वाढती लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून निओमेट्रो रेल्वे सुरू व्हावी, यासाठी स्मार्ट सिटीकडून प्रयत्न केले जात आहेत.

औरंगाबाद : शेंद्रा एमआयडीसी ते थेट वाळूजपर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येईल. मात्र, मेट्रोसाठी आता नवीन मार्ग निवडण्यास महापालिकेनेही अनुकूलता दाखवली. क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन असा नवीन मार्ग निवडण्यात आला आहे. शुक्रवारी महामेट्रोने प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्यासमोर डीपीआरचे सादरीकरण केले. रेल्वे स्टेशन ते हर्सूल टी पॉइंटपर्यंत मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामात अनेक अडथळे येत आहेत.

शहराची वाढती लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून निओमेट्रो रेल्वे सुरू व्हावी, यासाठी स्मार्ट सिटीकडून प्रयत्न केले जात आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासमोर महामेट्रोने सादरीकरण केले होते. त्यानंतर शुक्रवारी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी वाळूज ते शेंद्रापर्यंतच्या अखंड उड्डाणपुलाच्या डीपीआरचे सादरीकरण केले. डॉ. चौधरी यांनी नंतर पत्रकारांना माहिती दिली.

डॉ. चौधरी म्हणाले, दोन टप्प्यात मेट्रोचे काम केले जाणार आहे. पहिला टप्पा शेंद्रा ते रेल्वे स्टेशन असा असेल. यात शेंद्रा - चिकलठाणा - सिडको बसस्थानकाचा चौक - क्रांती चौक - उस्मानपुरा - रेल्वे स्टेशन असा मार्ग राहील, तर दुसऱ्या टप्प्यात रेल्वे स्टेशन ते हर्सूल टी पॉइंट असे काम करण्याचे नियोजन आहे. रेल्वे स्टेशन - महावीर चौक - मध्यवर्ती बसस्थानक - ज्युबली पार्क - रंगीन गेट - जिल्हाधिकारी कार्यालय - दिल्ली गेट हर्सूल टी पॉइंट असा मार्ग असणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मार्गात काही वारसास्थळे आहेत, जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत ज्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणांच्या जवळून मेट्रो जाणार आहे. त्यामुळे या मार्गात बरीच वळणे आहेत शिवाय वारसास्थळांचादेखील प्रश्न आहे. त्यांना सुरक्षित ठेवून काम करावे लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याचा विचार तूर्त बाजूला ठेवून पहिल्या टप्प्यावर काम करण्यास अनुकूलता दाखवण्यात आली.

मार्चमध्ये पुन्हा सादरीकरणडीपीआर तयार झाल्यावर मार्च महिन्यात त्याचे सादरीकरण केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या समोर केले जाईल. त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यावर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल, असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

छावणीच्या जागेची अडचणमहावीर चौकापासून पुढे मेट्रोची वाढलेली उंची लक्षात घेऊन लष्कराकडून परवानी मिळेल किंवा नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन आणि दुसऱ्या टप्प्यात रेल्वे स्टेशन ते वाळूज असाही पर्याय निवडला जाऊ शकतो, असे चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMetroमेट्रो