शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

औरंगाबाद मेट्रो मार्गाला नवीन ‘वळण’; 'शेंद्रा ते वाळूज' अखंड नसेल, नव्या २ मार्गांचे सादरीकरण

By मुजीब देवणीकर | Updated: February 11, 2023 17:48 IST

शहराची वाढती लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून निओमेट्रो रेल्वे सुरू व्हावी, यासाठी स्मार्ट सिटीकडून प्रयत्न केले जात आहेत.

औरंगाबाद : शेंद्रा एमआयडीसी ते थेट वाळूजपर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येईल. मात्र, मेट्रोसाठी आता नवीन मार्ग निवडण्यास महापालिकेनेही अनुकूलता दाखवली. क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन असा नवीन मार्ग निवडण्यात आला आहे. शुक्रवारी महामेट्रोने प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्यासमोर डीपीआरचे सादरीकरण केले. रेल्वे स्टेशन ते हर्सूल टी पॉइंटपर्यंत मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामात अनेक अडथळे येत आहेत.

शहराची वाढती लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून निओमेट्रो रेल्वे सुरू व्हावी, यासाठी स्मार्ट सिटीकडून प्रयत्न केले जात आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासमोर महामेट्रोने सादरीकरण केले होते. त्यानंतर शुक्रवारी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी वाळूज ते शेंद्रापर्यंतच्या अखंड उड्डाणपुलाच्या डीपीआरचे सादरीकरण केले. डॉ. चौधरी यांनी नंतर पत्रकारांना माहिती दिली.

डॉ. चौधरी म्हणाले, दोन टप्प्यात मेट्रोचे काम केले जाणार आहे. पहिला टप्पा शेंद्रा ते रेल्वे स्टेशन असा असेल. यात शेंद्रा - चिकलठाणा - सिडको बसस्थानकाचा चौक - क्रांती चौक - उस्मानपुरा - रेल्वे स्टेशन असा मार्ग राहील, तर दुसऱ्या टप्प्यात रेल्वे स्टेशन ते हर्सूल टी पॉइंट असे काम करण्याचे नियोजन आहे. रेल्वे स्टेशन - महावीर चौक - मध्यवर्ती बसस्थानक - ज्युबली पार्क - रंगीन गेट - जिल्हाधिकारी कार्यालय - दिल्ली गेट हर्सूल टी पॉइंट असा मार्ग असणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मार्गात काही वारसास्थळे आहेत, जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत ज्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणांच्या जवळून मेट्रो जाणार आहे. त्यामुळे या मार्गात बरीच वळणे आहेत शिवाय वारसास्थळांचादेखील प्रश्न आहे. त्यांना सुरक्षित ठेवून काम करावे लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याचा विचार तूर्त बाजूला ठेवून पहिल्या टप्प्यावर काम करण्यास अनुकूलता दाखवण्यात आली.

मार्चमध्ये पुन्हा सादरीकरणडीपीआर तयार झाल्यावर मार्च महिन्यात त्याचे सादरीकरण केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या समोर केले जाईल. त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यावर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल, असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

छावणीच्या जागेची अडचणमहावीर चौकापासून पुढे मेट्रोची वाढलेली उंची लक्षात घेऊन लष्कराकडून परवानी मिळेल किंवा नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन आणि दुसऱ्या टप्प्यात रेल्वे स्टेशन ते वाळूज असाही पर्याय निवडला जाऊ शकतो, असे चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMetroमेट्रो