शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मेट्रो मार्गाला नवीन ‘वळण’; 'शेंद्रा ते वाळूज' अखंड नसेल, नव्या २ मार्गांचे सादरीकरण

By मुजीब देवणीकर | Updated: February 11, 2023 17:48 IST

शहराची वाढती लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून निओमेट्रो रेल्वे सुरू व्हावी, यासाठी स्मार्ट सिटीकडून प्रयत्न केले जात आहेत.

औरंगाबाद : शेंद्रा एमआयडीसी ते थेट वाळूजपर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येईल. मात्र, मेट्रोसाठी आता नवीन मार्ग निवडण्यास महापालिकेनेही अनुकूलता दाखवली. क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन असा नवीन मार्ग निवडण्यात आला आहे. शुक्रवारी महामेट्रोने प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्यासमोर डीपीआरचे सादरीकरण केले. रेल्वे स्टेशन ते हर्सूल टी पॉइंटपर्यंत मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामात अनेक अडथळे येत आहेत.

शहराची वाढती लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून निओमेट्रो रेल्वे सुरू व्हावी, यासाठी स्मार्ट सिटीकडून प्रयत्न केले जात आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासमोर महामेट्रोने सादरीकरण केले होते. त्यानंतर शुक्रवारी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी वाळूज ते शेंद्रापर्यंतच्या अखंड उड्डाणपुलाच्या डीपीआरचे सादरीकरण केले. डॉ. चौधरी यांनी नंतर पत्रकारांना माहिती दिली.

डॉ. चौधरी म्हणाले, दोन टप्प्यात मेट्रोचे काम केले जाणार आहे. पहिला टप्पा शेंद्रा ते रेल्वे स्टेशन असा असेल. यात शेंद्रा - चिकलठाणा - सिडको बसस्थानकाचा चौक - क्रांती चौक - उस्मानपुरा - रेल्वे स्टेशन असा मार्ग राहील, तर दुसऱ्या टप्प्यात रेल्वे स्टेशन ते हर्सूल टी पॉइंट असे काम करण्याचे नियोजन आहे. रेल्वे स्टेशन - महावीर चौक - मध्यवर्ती बसस्थानक - ज्युबली पार्क - रंगीन गेट - जिल्हाधिकारी कार्यालय - दिल्ली गेट हर्सूल टी पॉइंट असा मार्ग असणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मार्गात काही वारसास्थळे आहेत, जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत ज्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणांच्या जवळून मेट्रो जाणार आहे. त्यामुळे या मार्गात बरीच वळणे आहेत शिवाय वारसास्थळांचादेखील प्रश्न आहे. त्यांना सुरक्षित ठेवून काम करावे लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याचा विचार तूर्त बाजूला ठेवून पहिल्या टप्प्यावर काम करण्यास अनुकूलता दाखवण्यात आली.

मार्चमध्ये पुन्हा सादरीकरणडीपीआर तयार झाल्यावर मार्च महिन्यात त्याचे सादरीकरण केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या समोर केले जाईल. त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यावर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल, असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

छावणीच्या जागेची अडचणमहावीर चौकापासून पुढे मेट्रोची वाढलेली उंची लक्षात घेऊन लष्कराकडून परवानी मिळेल किंवा नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन आणि दुसऱ्या टप्प्यात रेल्वे स्टेशन ते वाळूज असाही पर्याय निवडला जाऊ शकतो, असे चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMetroमेट्रो