शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

नवीन ट्रेंड! छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपा शाळांचे भूखंड खासगी विकासकांना, मागविले प्रस्ताव

By मुजीब देवणीकर | Published: March 21, 2024 3:40 PM

महापालिकेच्या मालकीचे अनेक भूखंड शहरात आहेत. कोट्यवधींचे हे भूखंड पडून आहेत.

छत्रपती संभाजीनगर : दिवसेंदिवस महापालिकेवर कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. पाणीपुरवठा योजना, ड्रेनेज आदी योजनांमध्ये जवळपास १५०० कोटींचा वाटा मनपाला टाकावा लागणार आहे. प्रशासक जी. श्रीकांत यांनी आत्मनिर्भर मनपाच्या दृष्टीने ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली. शहरात महापालिकेच्या शाळांचे भूखंड पडून आहेत. हे भूखंड खासगी विकासकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. इच्छुकांकडून यासंदर्भात प्रस्तावही मागविण्यात आले आहेत.

महापालिकेच्या मालकीचे अनेक भूखंड शहरात आहेत. कोट्यवधींचे हे भूखंड पडून आहेत. या जमिनींचा वापर व्हावा, या उदात्त हेतूने प्रशासक यांनी पावलं उचलली आहेत. अलीकडेच त्यांनी नमूद केले होते की, महापालिका भूखंडाच्या बाबतीत श्रीमंत आहे. याचा योग्य वापर झाला तरच तिजोरीत चार पैसे येतील. नागरिकांना दर्जेदार सोयीसुविधा, कल्याणकारी योजना राबविताना कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. शासन योजनांमध्ये ३० ते ४० टक्के आर्थिक वाटा टाकावा लागतो. २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत ८२२ कोटींचे सॉफ्ट लोन शासनाने मंजूर केले. याची परतफेड करायला मनपाला दरमहा किमान १० कोटी रुपये लागणार आहेत.

भावसिंपुरा मनपा शाळेची १४ एकरहून अधिक जागा आहे. शाळेसाठी एवढी जागा लागत नाही. भूखंड पडून आहे. खासगी विकासकाला भूखंड दिल्यास काही पैसे येतील. त्याचप्रमाणे नक्षत्रवाडी येथेही मोठा भूखंड आहे. हे दोन्ही भूखंड खासगी विकासकांना देऊन विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात ई-निविदा पद्धतीने इच्छुकांकडून प्रस्ताव मागविले आहेत. त्यास किती प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका