शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नव्या संशोधनाने कॉर्निया प्रत्यारोपणातील अपयश टाळणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 19:27 IST

या नव्या संशोधनाने कॉर्निया प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील यशाची टक्केवारी वाढण्यास मदत होत आहे, असे  ब्रिटनमधील नॉटिंगहॅम नेत्र विभागाचे प्रमुख आणि दुआ लेअरचे जनक डॉ. हरमिंदरसिंग दुआ म्हणाले.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : पाच वर्षांपूर्वी डोळ्यातील सहाव्या पापुद्र्याचा शोध लावला. यापुढे जाऊन आता तीन आठवड्यांपूर्वीच कॉर्निया प्रत्यारोपणातील अडचणींवर नवीन संशोधन केले. डोळ्याचा बाहेरून दिसणारा स्वच्छ काचेसारखा पारदर्शक बाह्यपटलाचा भाग म्हणजे कॉर्निया. या नव्या संशोधनाने कॉर्निया प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील यशाची टक्केवारी वाढण्यास मदत होत आहे, असे  ब्रिटनमधील नॉटिंगहॅम नेत्र विभागाचे प्रमुख आणि दुआ लेअरचे जनक डॉ. हरमिंदरसिंग दुआ म्हणाले.

नेत्ररोगतज्ज्ञांच्या तीनदिवसीय राज्यस्तरीय परिषदेनिमित्त डॉ. हरमिंदरसिंग दुआ हे शहरात आले होते. यावेळी ‘लोकमत’शी संवाद साधताना डोळ्यांचे आजार आणि केलेल्या संशोधनावर त्यांनी प्रकाश टाकला. डॉ. हरमिंदरसिंग दुआ म्हणाले की, २०१३ मध्ये संशोधन केले आणि मनुष्याच्या डोळ्यातील सहाव्या प्रापुद्र्याचा शोध लावला. गेली अनेक वर्षे जगाला फक्त पाच पापुद्रे माहीत होते. सहाव्या पापुद्र्याला दुआ लेअर म्हणून ओळख मिळाली. या नव्या पापुद्र्याच्या शोधाने तीन नवीन शस्त्रक्रियाही तयार झाल्या. फ्रान्स, इजिप्त आणि आपल्याकडे या नव्या शस्त्रक्रिया तयार झाल्या. या दुआ लेअरच्या संशोधनाची तब्बल २ हजार ८० वैज्ञानिक संशोधन पेपरमध्ये नोंद झाल्याचे ते म्हणाले.

तीन आठवड्यांपूर्वी आणखी एक नवीन संशोधन के ले. कॉर्निया प्रत्यारोपण करताना एक पापुद्रा (लेअर) टाकला जातो. हा पापुद्रा एकाच पद्धतीने उघडावा लागतो. त्यासाठी येणाऱ्या अडचणीने कधी-कधी शस्त्रक्रिया अपयशी होते. हे का होते, हे संशोधनातून शोधून काढले. रसायनाच्या मदतीने पापुद्रा सहज उघडला जाईल, हे समोर आणले. हे संशोधन अमेरिकेतील जर्नल्समध्ये प्रकाशित झाल्याचेही डॉ. दुआ यांनी सांगितले. नवीन डॉक्टरांकडून होणाऱ्या संशोधनाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी परिषदेत आयोजन समितीच्या प्रमुख डॉ. सुनयना मलिक, सचिव डॉ. राजीव मुंदडा यांची उपस्थिती होती.

मोतीबिंदूचे वय घटलेजगाच्या तुलनेत २५ टक्के अंध भारतात आहेत. यामध्येही ७० टक्के अंधत्व हे केवळ मोतीबिंदूमुळे आलेले आहे. सरकारकडून प्रयत्न होत आहेत; परंतु त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर, रुग्णालय अपुरे पडत आहेत. पूर्वी वयाच्या ६० वर्षांनंतर मोतीबिंदू आढळत असे. आता हे वय कमी होऊन ४० ते ५० वर्षांपर्यंत आले आहे. ज्येष्ठांच्या मोतीबिंदूकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे मोतीबिंदूबरोबरच ज्येष्ठाचा मृत्यू होत असल्याची चिंताही डॉ. दुआ यांनी व्यक्त केली.

डोळे कोरडे होण्याचे प्रमाण वाढलेडॉ. हरमिंदरसिंग दुआ म्हणाले की, डोळे कोरडे होणे हे केवळ पूर्वी ज्येष्ठांतच दिसत असे; परंतु प्रदूषण, संगणक, मोबाईलचा अतिवापर, झोपेचे प्रमाण कमी होणे यासारख्या कारणांनी डोळे कोरडे होण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. त्यातही युवकांमध्ये ही बाब अधिक दिसते. त्यातून डोळ्याची नजर कमी होणे, डोळ्यात वाळू, मिर्ची पडल्यासारखे वाटणे, असा त्रास होतो.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्यdoctorडॉक्टर