शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नवीन संकट ! शहरातील सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे प्रकल्प बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 12:07 IST

Aurangabad Municipal Corporation राज्य शासनाने मागील सहा वर्षांमध्ये महापालिकेला सिमेंट रस्ते तयार करण्यासाठी २७६ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

ठळक मुद्देजुन्या आणि नवीन शहरात जिकडे-तिकडे सिमेंटचे रस्ते पाहायला मिळत आहेत.मनपा हद्दीत एकही नवीन सिमेंट रस्ता होणार नाही

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : महापालिका हद्दीत यापुढे एकाही नवीन सिमेंट रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात येणार नाही. या निर्णयाचे पडसाद शहरातील कोट्यवधी रुपयांच्या आरएमसी (रेडिमिक्स सिमेंट) प्रकल्पांवर होणार आहे. शहरातील जवळपास ७० टक्के प्रकल्प बंद होण्याची शक्यता आहे. रेडिमिक्स सिमेंटच्या मटेरियलची मागणी औरंगाबाद महापालिकेकडूनच सर्वाधिक करण्यात येत होती. शहर आणि परिसरात जवळपास २५ पेक्षा अधिक लहान-मोठे प्रकल्प आहेत. त्यातील किमान २० प्लँट बंद होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

२००० ते २०१० या काळात औरंगाबाद महापालिकेत गट्टू बसविण्याची पद्धत रूढ झाली होती. महापालिकेने शहरात गट्टू बसविण्यावर जवळपास १५० कोटी रुपये खर्च केले आहेत. गट्टू काढल्यानंतर सिमेंट रस्ते तयार करण्याचे काम सुरू झाले. छोटी गल्ली असेल किंवा मोठा रस्ता सिमेंटचा असावा अशी पद्धत रूढ झाली. नगरसेवकांनी ही पद्धत सर्वाधिक डोक्यावर घेतली. मागील दहा वर्षांमध्ये महापालिकेने आपल्या निधीतून जवळपास ७०० कोटी रुपयांचे रस्ते तयार केले आहेत. राज्य शासनाने मागील सहा वर्षांमध्ये महापालिकेला सिमेंट रस्ते तयार करण्यासाठी २७६ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. जुन्या आणि नवीन शहरात जिकडे-तिकडे सिमेंटचे रस्ते पाहायला मिळत आहेत.

सिमेंट रस्त्यांचे दुष्परिणामसिमेंट रस्त्यांचे दुष्परिणाम भविष्यात नागरिकांनाच सोसावे लागणार आहेत. या रस्त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. भूगर्भातील पाणीपातळी वाढत नाही. उन्हाळ्यात सिमेंट रस्ते अधिक तापतात. ते लवकर थंड होत नाहीत. उन्हाळ्यातील तापमानात किमान ३ अंशांनी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उष्णता वाढली तर नागरिक वातानूकुलित यंत्रणेचा वापर जास्त करतील. त्यामुळे उष्णतेत अधिक भर पडेल. शहरातील पर्यावरणाचा विचार करून राज्य शासन आणि औरंगाबाद महापालिकेने भविष्यात सिमेंट रस्ते तयार न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिमेंट प्रकल्पाला कामच राहणार नाहीएमआयडीसी, डीएमआयसी, रेल्वे, खासगी मोठे बांधकाम व्यवसायिक, शहराच्या आसपास असलेल्या ग्रामपंचायती आणि सर्वाधिक सिमेंट रस्त्यांसाठी मटेरियलची मागणी महापालिकेकडून होती. महापालिकेत काम नसेल तर उर्वरित ३० टक्के व्यवसायांवर प्रकल्प चालविणे अवघड आहे. मोठ्या कंत्राटदारांकडे स्वतःचे प्रकल्प आहेत. त्यामुळे त्यांना फरक पडणार नाही. छोट्या प्रकल्पचालकांना कुलूप लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.- शेख मेहाराज, सिमेंट प्लँटचालक.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण