शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नवीन संकट ! शहरातील सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे प्रकल्प बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 12:07 IST

Aurangabad Municipal Corporation राज्य शासनाने मागील सहा वर्षांमध्ये महापालिकेला सिमेंट रस्ते तयार करण्यासाठी २७६ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

ठळक मुद्देजुन्या आणि नवीन शहरात जिकडे-तिकडे सिमेंटचे रस्ते पाहायला मिळत आहेत.मनपा हद्दीत एकही नवीन सिमेंट रस्ता होणार नाही

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : महापालिका हद्दीत यापुढे एकाही नवीन सिमेंट रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात येणार नाही. या निर्णयाचे पडसाद शहरातील कोट्यवधी रुपयांच्या आरएमसी (रेडिमिक्स सिमेंट) प्रकल्पांवर होणार आहे. शहरातील जवळपास ७० टक्के प्रकल्प बंद होण्याची शक्यता आहे. रेडिमिक्स सिमेंटच्या मटेरियलची मागणी औरंगाबाद महापालिकेकडूनच सर्वाधिक करण्यात येत होती. शहर आणि परिसरात जवळपास २५ पेक्षा अधिक लहान-मोठे प्रकल्प आहेत. त्यातील किमान २० प्लँट बंद होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

२००० ते २०१० या काळात औरंगाबाद महापालिकेत गट्टू बसविण्याची पद्धत रूढ झाली होती. महापालिकेने शहरात गट्टू बसविण्यावर जवळपास १५० कोटी रुपये खर्च केले आहेत. गट्टू काढल्यानंतर सिमेंट रस्ते तयार करण्याचे काम सुरू झाले. छोटी गल्ली असेल किंवा मोठा रस्ता सिमेंटचा असावा अशी पद्धत रूढ झाली. नगरसेवकांनी ही पद्धत सर्वाधिक डोक्यावर घेतली. मागील दहा वर्षांमध्ये महापालिकेने आपल्या निधीतून जवळपास ७०० कोटी रुपयांचे रस्ते तयार केले आहेत. राज्य शासनाने मागील सहा वर्षांमध्ये महापालिकेला सिमेंट रस्ते तयार करण्यासाठी २७६ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. जुन्या आणि नवीन शहरात जिकडे-तिकडे सिमेंटचे रस्ते पाहायला मिळत आहेत.

सिमेंट रस्त्यांचे दुष्परिणामसिमेंट रस्त्यांचे दुष्परिणाम भविष्यात नागरिकांनाच सोसावे लागणार आहेत. या रस्त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. भूगर्भातील पाणीपातळी वाढत नाही. उन्हाळ्यात सिमेंट रस्ते अधिक तापतात. ते लवकर थंड होत नाहीत. उन्हाळ्यातील तापमानात किमान ३ अंशांनी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उष्णता वाढली तर नागरिक वातानूकुलित यंत्रणेचा वापर जास्त करतील. त्यामुळे उष्णतेत अधिक भर पडेल. शहरातील पर्यावरणाचा विचार करून राज्य शासन आणि औरंगाबाद महापालिकेने भविष्यात सिमेंट रस्ते तयार न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिमेंट प्रकल्पाला कामच राहणार नाहीएमआयडीसी, डीएमआयसी, रेल्वे, खासगी मोठे बांधकाम व्यवसायिक, शहराच्या आसपास असलेल्या ग्रामपंचायती आणि सर्वाधिक सिमेंट रस्त्यांसाठी मटेरियलची मागणी महापालिकेकडून होती. महापालिकेत काम नसेल तर उर्वरित ३० टक्के व्यवसायांवर प्रकल्प चालविणे अवघड आहे. मोठ्या कंत्राटदारांकडे स्वतःचे प्रकल्प आहेत. त्यामुळे त्यांना फरक पडणार नाही. छोट्या प्रकल्पचालकांना कुलूप लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.- शेख मेहाराज, सिमेंट प्लँटचालक.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण