शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

सीड कंपन्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी नवीन कृषी कायदे आणत आहेत, रघुनाथदादा पाटील यांचा आरोप

By बापू सोळुंके | Updated: November 16, 2023 16:38 IST

नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकरी आत्महत्या थांबणार आहे का? शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघूनाथदादा पाटील यांचा कृषींमत्र्यांना सवाल

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या आहेत. राज्यसरकारकडून प्रस्तावित करण्यात आलेले नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकरी आत्महत्या थांबणार आहे, असा सवाल शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी कृषीमंत्र्यांना केला. हे कायदे सीड कंपन्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी आणले जात असल्याचा थेट आरोपही त्यांनी येथे गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

रघुनाथदाद पाटील म्हणाले की, देशस्वतंत्र झाला तेव्हा देशात अन्नधान्याची प्रचंड टंचाई होती. यानंतर राज्यातील बियाणे कंपन्यांनी केलेल्या संसोधानामुळे नवीन संकरित वाण तयार केल्याने आज १४० कोटी लोकसंख्येला पुरून उरेल एवढे अन्नधान्य बळीराजा पिकवतो. हे केवळ बियाणे कंपन्यांच्या संशोधनामुळे शक्य झाले. एरवी आपले कृषी विद्यापीठांसह कृषी विभाग केवळ पांढरा हत्तीच असल्याचे ते म्हणाले. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यात प्रस्तावित केलेल्या नवीन कृषी कायद्यामुळे बियाणे कंपन्या, खत आणि किटकनाशक कंपन्यांच्या मालक आणि झोपडपट्टीतील गुंड, हातभट्टीवाला यांच्या रांगेत बसविण्याचा निर्णय घेतला. कारण या कंपन्यांच्या मालकांना ते एमपीडीएखाली जेलमध्ये टाकण्याची तरतूद या कायद्यात करीत आहेत.

 नवीन कायद्याला घाबरून गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातील सीड कंपन्यांनी राज्याचे कृषी आयुक्तांना पत्र पाठवून राज्यात बिझनेस न करण्याचे कळविले आहे. या कंपन्यांनी त्यांचे महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात नेण्याची तयारी सुरू केली. असे झाल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करण्यासाठी राज्यसरकारने काय उपाययोजना केली, असा आमचा सवाल असल्याचे ते म्हणाले. राज्यातील सीड कंपन्यांमुळे हजारोंना रोजगार मिळाला आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यसरकारने प्रस्तावित कायदे मागे घ्यावे,अशी आमची मागणी असल्याचे ते रघुनाथदादा म्हणले. शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट म्हणाले की, जून्या चांगल्या कायद्याची अंमलबजावणी करायची नाही, एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्यासंदर्भात कायदा असताना दरवर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमी दरानेच लिलाव होतो. मात्र मागील ५० वर्षात या कायद्यानुसार एकाही व्यापाऱ्यांवर गुन्हा नोंदविला नाही. यामुळे कृषीमंत्र्यांचा नवीन कायदा आणण्याचा हेतू शुद्ध वाटत नसल्याचा आरोप त्यांनी केला. यापत्रकार परिषदेला रामचंद्र नाके, जगन्नाथ काळे, नीलेश बारगळ आदींची उपस्थिती होती.

आजपासून राज्यभर जनजागृतीप्रस्तावित कृषी कायदे हे शेतकरी आणि बियाणे ,खत कंपन्यांविरोधातील आहे, यामुळे या कायद्यांविरोधात राज्यभर जनजागृती करण्यास आजपासून सुरवात झाल्याचे रघूनाथदादा पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद