शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात नद्यांचे जाळे; मग ८ दिवसांनी पाणी का ?, राव यांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 12:35 IST

के.चंद्रशेखर राव : बीआरएसला सत्ता द्या, दररोज पाणी, मोफत वीज देऊ

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात सर्वाधिक नद्यांचे जाळे असताना, स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांत नागरिकांना आठ दिवसांआड पाणी दिले जाते, असे का? असा प्रश्न उपस्थित  करून भारत राष्ट्र समितीचा गुलाबी झेंडा राज्यात सत्तेवर आणा तेलंगणाप्रमाणे नळाला दररोज  पाणी आणि मोफत वीज आम्ही देतो, असे आश्वासन भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी सोमवारी येथील जाहीर सभेत बोलताना दिले.बीआरएसतर्फे शहरातील जबिंदा मैदानावर आयोजित पहिल्याच जाहीर सभेत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीस प्रणाम करून, केसीआर यांनी आपल्या भाषणास प्रारंभ केला. 

महाराष्ट्रापेक्षा खूप लहान व गरीब तेलंगणा राज्य शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज व शेतीला पाणी देते. एकरी दहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करतो, दलितांच्या विकासासाठी दलित बंधू योजना राबवितो,  तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्र राज्याला का शक्य होत नाही, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, परंतु येथील राज्यकर्त्यांची हे देण्याची नियत नाही. महाराष्ट्रात धनाची नव्हे, कर मनाची कमी आहे. त्यामुळे आता वाघ व्हा. परिवर्तनाशिवाय काहीही मिळणार नाही. आगामी निवडणुकात जिल्हा परिषदेवर बीआरएसचा गुलाबी झेंडा फडकवा, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे सरकार आणा, आम्ही एका झटक्यात येथील शेतकरी आत्महत्या थांबवू. तेलंगणात दिल्या, त्या योजना येथे सुरू करू.  मंचावर लोह्याचे माजी आमदार शंकरअण्णा धोंगडे यांच्यासह तेलंगणातून आलेले खासदार पाटील, अनेक आमदारांसह शहरातील माजी आमदार अण्णासाहेब माने पाटील, हर्षवर्धन जाधव, संतोष पाटील, फिरोज पटेल, कदीर मौलाना आदींची उपस्थिती होती.

...तर खासगीकरणाचे धोरण बदलणार

n    देशात जातिवाद, धर्मवाद, लिंगभेद वाढतो. धनवान जास्तच श्रीमंत होत आहे. गरीब अधिकच गरीब होत आहे. शेतकरी दररोज आत्महत्या करतो आहे.n    नागरिकांना पिण्यास आजही पाणी मिळत नाही. ही  गोष्ट नव्हे, तर देशातील हेच सत्य आहे.n    हे असेच चालू ठेवायचे की बदलायचे आहे, असे सांगून केसीआर म्हणाले, आमच्या समस्या आम्हालाच सोडवाव्या लागतील. परदेशातून कुणी येणार नाही.

आता ‘किसान सरकार’

n    तेलंगणातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या. मी रडून आत्महत्या करणाऱ्यांना समजावून सांगत होतो. तेलंगणा मॉडेल लागू करा, मी महाराष्ट्रात येणार नाही, असे सांगितले. डिजिटल, मेक इन इंडिया जोक इन इंडिया झाला आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांवर गुलाबी झेंडा फडकवा, असे आवाहन चंद्रशेखर यांनी केले.n    नव्या संसद इमारतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या, अशी मागणी त्यांनी केली. स्वतःसाठी एकदा तरी मतदान करा. आपला जातधर्म शेतकरी बनायला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. त्यांनी सर्वांकडून ‘अब की बार किसान सरकार’चा नारा वदवून घेतला.

n    विद्यमान राजवटीविरुद्ध शेतकरी, कामगार, बेरोजगार, दलितांनी लढ्यास सिद्ध व्हावे, असे आवाहन केले.n    देशात सध्या खासगीकरणाचे वारे सुटले आहे. आम्ही सत्तेवर आल्यासखासगीकरणाचे धोरण बदलून पुन्हाराष्ट्रीयीकरणाचे धोरण आणू, पाणी धोरण बदलू, अशी घोषणाही त्यांनी केली.

टॅग्स :TelanganaतेलंगणाK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव