शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

महाराष्ट्रात नद्यांचे जाळे; मग ८ दिवसांनी पाणी का ?, राव यांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 12:35 IST

के.चंद्रशेखर राव : बीआरएसला सत्ता द्या, दररोज पाणी, मोफत वीज देऊ

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात सर्वाधिक नद्यांचे जाळे असताना, स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांत नागरिकांना आठ दिवसांआड पाणी दिले जाते, असे का? असा प्रश्न उपस्थित  करून भारत राष्ट्र समितीचा गुलाबी झेंडा राज्यात सत्तेवर आणा तेलंगणाप्रमाणे नळाला दररोज  पाणी आणि मोफत वीज आम्ही देतो, असे आश्वासन भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी सोमवारी येथील जाहीर सभेत बोलताना दिले.बीआरएसतर्फे शहरातील जबिंदा मैदानावर आयोजित पहिल्याच जाहीर सभेत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीस प्रणाम करून, केसीआर यांनी आपल्या भाषणास प्रारंभ केला. 

महाराष्ट्रापेक्षा खूप लहान व गरीब तेलंगणा राज्य शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज व शेतीला पाणी देते. एकरी दहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करतो, दलितांच्या विकासासाठी दलित बंधू योजना राबवितो,  तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्र राज्याला का शक्य होत नाही, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, परंतु येथील राज्यकर्त्यांची हे देण्याची नियत नाही. महाराष्ट्रात धनाची नव्हे, कर मनाची कमी आहे. त्यामुळे आता वाघ व्हा. परिवर्तनाशिवाय काहीही मिळणार नाही. आगामी निवडणुकात जिल्हा परिषदेवर बीआरएसचा गुलाबी झेंडा फडकवा, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे सरकार आणा, आम्ही एका झटक्यात येथील शेतकरी आत्महत्या थांबवू. तेलंगणात दिल्या, त्या योजना येथे सुरू करू.  मंचावर लोह्याचे माजी आमदार शंकरअण्णा धोंगडे यांच्यासह तेलंगणातून आलेले खासदार पाटील, अनेक आमदारांसह शहरातील माजी आमदार अण्णासाहेब माने पाटील, हर्षवर्धन जाधव, संतोष पाटील, फिरोज पटेल, कदीर मौलाना आदींची उपस्थिती होती.

...तर खासगीकरणाचे धोरण बदलणार

n    देशात जातिवाद, धर्मवाद, लिंगभेद वाढतो. धनवान जास्तच श्रीमंत होत आहे. गरीब अधिकच गरीब होत आहे. शेतकरी दररोज आत्महत्या करतो आहे.n    नागरिकांना पिण्यास आजही पाणी मिळत नाही. ही  गोष्ट नव्हे, तर देशातील हेच सत्य आहे.n    हे असेच चालू ठेवायचे की बदलायचे आहे, असे सांगून केसीआर म्हणाले, आमच्या समस्या आम्हालाच सोडवाव्या लागतील. परदेशातून कुणी येणार नाही.

आता ‘किसान सरकार’

n    तेलंगणातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या. मी रडून आत्महत्या करणाऱ्यांना समजावून सांगत होतो. तेलंगणा मॉडेल लागू करा, मी महाराष्ट्रात येणार नाही, असे सांगितले. डिजिटल, मेक इन इंडिया जोक इन इंडिया झाला आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांवर गुलाबी झेंडा फडकवा, असे आवाहन चंद्रशेखर यांनी केले.n    नव्या संसद इमारतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या, अशी मागणी त्यांनी केली. स्वतःसाठी एकदा तरी मतदान करा. आपला जातधर्म शेतकरी बनायला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. त्यांनी सर्वांकडून ‘अब की बार किसान सरकार’चा नारा वदवून घेतला.

n    विद्यमान राजवटीविरुद्ध शेतकरी, कामगार, बेरोजगार, दलितांनी लढ्यास सिद्ध व्हावे, असे आवाहन केले.n    देशात सध्या खासगीकरणाचे वारे सुटले आहे. आम्ही सत्तेवर आल्यासखासगीकरणाचे धोरण बदलून पुन्हाराष्ट्रीयीकरणाचे धोरण आणू, पाणी धोरण बदलू, अशी घोषणाही त्यांनी केली.

टॅग्स :TelanganaतेलंगणाK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव