शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

महाराष्ट्रात नद्यांचे जाळे; मग ८ दिवसांनी पाणी का ?, राव यांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 12:35 IST

के.चंद्रशेखर राव : बीआरएसला सत्ता द्या, दररोज पाणी, मोफत वीज देऊ

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात सर्वाधिक नद्यांचे जाळे असताना, स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांत नागरिकांना आठ दिवसांआड पाणी दिले जाते, असे का? असा प्रश्न उपस्थित  करून भारत राष्ट्र समितीचा गुलाबी झेंडा राज्यात सत्तेवर आणा तेलंगणाप्रमाणे नळाला दररोज  पाणी आणि मोफत वीज आम्ही देतो, असे आश्वासन भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी सोमवारी येथील जाहीर सभेत बोलताना दिले.बीआरएसतर्फे शहरातील जबिंदा मैदानावर आयोजित पहिल्याच जाहीर सभेत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीस प्रणाम करून, केसीआर यांनी आपल्या भाषणास प्रारंभ केला. 

महाराष्ट्रापेक्षा खूप लहान व गरीब तेलंगणा राज्य शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज व शेतीला पाणी देते. एकरी दहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करतो, दलितांच्या विकासासाठी दलित बंधू योजना राबवितो,  तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्र राज्याला का शक्य होत नाही, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, परंतु येथील राज्यकर्त्यांची हे देण्याची नियत नाही. महाराष्ट्रात धनाची नव्हे, कर मनाची कमी आहे. त्यामुळे आता वाघ व्हा. परिवर्तनाशिवाय काहीही मिळणार नाही. आगामी निवडणुकात जिल्हा परिषदेवर बीआरएसचा गुलाबी झेंडा फडकवा, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे सरकार आणा, आम्ही एका झटक्यात येथील शेतकरी आत्महत्या थांबवू. तेलंगणात दिल्या, त्या योजना येथे सुरू करू.  मंचावर लोह्याचे माजी आमदार शंकरअण्णा धोंगडे यांच्यासह तेलंगणातून आलेले खासदार पाटील, अनेक आमदारांसह शहरातील माजी आमदार अण्णासाहेब माने पाटील, हर्षवर्धन जाधव, संतोष पाटील, फिरोज पटेल, कदीर मौलाना आदींची उपस्थिती होती.

...तर खासगीकरणाचे धोरण बदलणार

n    देशात जातिवाद, धर्मवाद, लिंगभेद वाढतो. धनवान जास्तच श्रीमंत होत आहे. गरीब अधिकच गरीब होत आहे. शेतकरी दररोज आत्महत्या करतो आहे.n    नागरिकांना पिण्यास आजही पाणी मिळत नाही. ही  गोष्ट नव्हे, तर देशातील हेच सत्य आहे.n    हे असेच चालू ठेवायचे की बदलायचे आहे, असे सांगून केसीआर म्हणाले, आमच्या समस्या आम्हालाच सोडवाव्या लागतील. परदेशातून कुणी येणार नाही.

आता ‘किसान सरकार’

n    तेलंगणातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या. मी रडून आत्महत्या करणाऱ्यांना समजावून सांगत होतो. तेलंगणा मॉडेल लागू करा, मी महाराष्ट्रात येणार नाही, असे सांगितले. डिजिटल, मेक इन इंडिया जोक इन इंडिया झाला आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांवर गुलाबी झेंडा फडकवा, असे आवाहन चंद्रशेखर यांनी केले.n    नव्या संसद इमारतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या, अशी मागणी त्यांनी केली. स्वतःसाठी एकदा तरी मतदान करा. आपला जातधर्म शेतकरी बनायला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. त्यांनी सर्वांकडून ‘अब की बार किसान सरकार’चा नारा वदवून घेतला.

n    विद्यमान राजवटीविरुद्ध शेतकरी, कामगार, बेरोजगार, दलितांनी लढ्यास सिद्ध व्हावे, असे आवाहन केले.n    देशात सध्या खासगीकरणाचे वारे सुटले आहे. आम्ही सत्तेवर आल्यासखासगीकरणाचे धोरण बदलून पुन्हाराष्ट्रीयीकरणाचे धोरण आणू, पाणी धोरण बदलू, अशी घोषणाही त्यांनी केली.

टॅग्स :TelanganaतेलंगणाK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव