शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

दीड कोटीसाठी मित्राच्या मदतीने भाच्याचे अपहरण; मुंबईच्या फौजदारासह तिघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 18:06 IST

पोलिसांनी मुबईत कार्यरत असलेल्या फौजदारासह तीन जणांना अटक केली. 

ठळक मुद्देतिघांनी मुलाच्या आजी-आजोबांना केली मारहाण विशेष म्हणजे ही मारहाण रस्त्यावर सुरू होती. दिड कोटीची खंडणी मागितली

औरंगाबाद: कौटुंबिक वादातून मित्राच्या मदतीने मेहुण्याला बेदम मारहाण करून सहा वर्षीय भाच्याचे दिड कोटी रुपयांसाठी अपहरण करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी विद्यानगर येथे घडली. याप्रकरणी वकिल पित्याने दिलेल्या तक्रारीवरून अपहरणकर्त्यांविरोधात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी मुबईत कार्यरत असलेल्या फौजदारासह तीन जणांना अटक केली. 

फौजदार अमोल चव्हाण(नेमणूक चेम्बुर ठाणे, मुंबई), मुलाचा मामा कृष्णा बापुराव लाटकर (रा. घाटकोपर) आणि शांभवी अनिल मालवणकर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, विद्यानगर येथील अ‍ॅड.श्रीकांत तात्यासाहेब वीर (वय ४०)यांचे त्यांची पत्नी अ‍ॅड. सोनाली यांच्यासोबत पटत नाही. यामुळे वर्षभरापासून वीर पती-पत्नी विभक्त राहते. या दाम्पत्याला मुलगी आर्या (वय १०) आणि मुलगा रमन (वय ६) असे अपत्ये आहे.आर्या आईसोबत मुंबईत तर रमन हा वडिलासोबत औरंगाबादेत राहतो. त्यांच्यात मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात वाद सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशाने अ‍ॅड. श्रीकांत वीर यांनी रमन यास १८ एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर केले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या केसची तारीख २९ जून रोजी ठेवली आहे. १२ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अ‍ॅड. श्रीकांत हे त्याच्या विद्यानगर येथील घरी असताना  फौजदार अमोल चव्हाण, कृष्णा लाटकर, शांभवी मालवणकरसह  सात जण काठ्या आणि चाकू घेऊन त्यांच्या फ्लॅटमध्ये घुसले. चाकूचा धाक दाखवून त्यांनी रमनला बळजबरीने त्यांच्या घरातून हिसकावून नेले. 

दिड कोटीची खंडणी मागितलीरमनला घेऊन जाताना आरोपींनी वीर परिवाराकडे दिड कोटी रुपयांची खंडणी मागितली. मुलगा हवा असेल तर दिड कोटी रुपये द्यावे लागतील, अन्यथा मुलाचा जीव कसा घ्यायाचा हे आम्हाला चांगले ठाऊक आहे,अशी धमकीच आरोपींनी दिल्याचे वीर यांनी तक्रारीत नमूद केले. 

वीर यांच्या वृद्ध आई-वडिलांना केली मारहाणयावेळी श्रीकांत आणि त्यांच्या वृद्ध आर्ई-वडिलांनी  आरोपींना अडविण्याचा आणि रमनला सोडविण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी तेथे दहशत निर्माण करीत त्यांना बेदम मारहाण केली. यामुळे कोणीही त्यांच्या मदतीला धावले नाही. विशेष म्हणजे ही मारहाण रस्त्यावर सुरू होती. ही घटना समजताच पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन फौजदार चव्हाण, मालवणकर आणि श्यामभवीला पकडले. दरम्यान याप्रकरणी श्रीकांत वीर यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपींविरोधात अपहरण करणे, खंडणी मागणे, दंगा करणे, मारहाण करणे,आदी कलमानुसार गुन्हा नोंदविला. सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्यामार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माळी हे तपास करीत आहे.

 

टॅग्स :KidnappingअपहरणAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीArrestअटक