शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटीसाठी मित्राच्या मदतीने भाच्याचे अपहरण; मुंबईच्या फौजदारासह तिघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 18:06 IST

पोलिसांनी मुबईत कार्यरत असलेल्या फौजदारासह तीन जणांना अटक केली. 

ठळक मुद्देतिघांनी मुलाच्या आजी-आजोबांना केली मारहाण विशेष म्हणजे ही मारहाण रस्त्यावर सुरू होती. दिड कोटीची खंडणी मागितली

औरंगाबाद: कौटुंबिक वादातून मित्राच्या मदतीने मेहुण्याला बेदम मारहाण करून सहा वर्षीय भाच्याचे दिड कोटी रुपयांसाठी अपहरण करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी विद्यानगर येथे घडली. याप्रकरणी वकिल पित्याने दिलेल्या तक्रारीवरून अपहरणकर्त्यांविरोधात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी मुबईत कार्यरत असलेल्या फौजदारासह तीन जणांना अटक केली. 

फौजदार अमोल चव्हाण(नेमणूक चेम्बुर ठाणे, मुंबई), मुलाचा मामा कृष्णा बापुराव लाटकर (रा. घाटकोपर) आणि शांभवी अनिल मालवणकर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, विद्यानगर येथील अ‍ॅड.श्रीकांत तात्यासाहेब वीर (वय ४०)यांचे त्यांची पत्नी अ‍ॅड. सोनाली यांच्यासोबत पटत नाही. यामुळे वर्षभरापासून वीर पती-पत्नी विभक्त राहते. या दाम्पत्याला मुलगी आर्या (वय १०) आणि मुलगा रमन (वय ६) असे अपत्ये आहे.आर्या आईसोबत मुंबईत तर रमन हा वडिलासोबत औरंगाबादेत राहतो. त्यांच्यात मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात वाद सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशाने अ‍ॅड. श्रीकांत वीर यांनी रमन यास १८ एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर केले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या केसची तारीख २९ जून रोजी ठेवली आहे. १२ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अ‍ॅड. श्रीकांत हे त्याच्या विद्यानगर येथील घरी असताना  फौजदार अमोल चव्हाण, कृष्णा लाटकर, शांभवी मालवणकरसह  सात जण काठ्या आणि चाकू घेऊन त्यांच्या फ्लॅटमध्ये घुसले. चाकूचा धाक दाखवून त्यांनी रमनला बळजबरीने त्यांच्या घरातून हिसकावून नेले. 

दिड कोटीची खंडणी मागितलीरमनला घेऊन जाताना आरोपींनी वीर परिवाराकडे दिड कोटी रुपयांची खंडणी मागितली. मुलगा हवा असेल तर दिड कोटी रुपये द्यावे लागतील, अन्यथा मुलाचा जीव कसा घ्यायाचा हे आम्हाला चांगले ठाऊक आहे,अशी धमकीच आरोपींनी दिल्याचे वीर यांनी तक्रारीत नमूद केले. 

वीर यांच्या वृद्ध आई-वडिलांना केली मारहाणयावेळी श्रीकांत आणि त्यांच्या वृद्ध आर्ई-वडिलांनी  आरोपींना अडविण्याचा आणि रमनला सोडविण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी तेथे दहशत निर्माण करीत त्यांना बेदम मारहाण केली. यामुळे कोणीही त्यांच्या मदतीला धावले नाही. विशेष म्हणजे ही मारहाण रस्त्यावर सुरू होती. ही घटना समजताच पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन फौजदार चव्हाण, मालवणकर आणि श्यामभवीला पकडले. दरम्यान याप्रकरणी श्रीकांत वीर यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपींविरोधात अपहरण करणे, खंडणी मागणे, दंगा करणे, मारहाण करणे,आदी कलमानुसार गुन्हा नोंदविला. सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्यामार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माळी हे तपास करीत आहे.

 

टॅग्स :KidnappingअपहरणAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीArrestअटक