शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडूनच पाणी सिंचन व्यवस्थापनाकडे कानाडोळा; ४३२ पैक्की ६३ संस्थाच कार्यान्वित

By बापू सोळुंके | Updated: April 18, 2023 14:24 IST

छत्रपती संभाजीनगरच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयांतर्गत मोठे, मध्यम आणि लघू अशा एकूण १७२ धरणांतर्गत ४३२ पाणी वापर संस्था प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर : २००५ च्या शासन निर्देशानुसार सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन पाणी वापर संस्थांच्या वतीनेच करण्याचे बंधनकारक असताना पाणी वापर संस्थांची स्थापना आणि नोंदणी करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयांतर्गत मोठे, मध्यम आणि लघू अशा एकूण १७२ धरणांतर्गत ४३२ पाणी वापर संस्था प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र केवळ ६३ संस्थाच कार्यान्वित असल्याचे दिसून आले आहे.

लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) कार्यालयांतर्गत जायकवाडी, नांदूर मधमेश्वर आणि अन्य निम्न दुधना ही मोठी, २३ मध्यम, १० उच्च बांध पातळी बंधारे आणि १३६ लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. शेतीची सिंचनक्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ही धरणे बांधण्यात आली आहेत. २००५ पर्यंत या पाटबंधारे विभागामार्फत शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देऊन ओलित क्षेत्राच्या आधारे शेतकऱ्यांकडून पाणी वापराचे बिल वसूल केले जात होते. सन २००५ मध्ये शासनाने शेतकऱ्यांकडूनच सिंचनाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्थांची लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे नोंदणी करावी. यानंतर पाणी वापर संस्थेच्या मागणीनुसार शेतीला पाणी द्यावे आणि पाणी वापर संस्थेकडून बिल वसूल करावे, असा हा नियम आहे. मात्र, या नियमानुसार पाणी वापर संस्था स्थापन करणे, त्या संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांकडून पाणी वापराचे बिल वसूल करून ते कडा कार्यालयाकडे भरणे ही कामे या संस्थांना करावी लागणार आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु धरणांतील पाण्याचा शेतीसाठी वापर करण्यासाठी ४३२ पाणी वापर संस्था प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र शेतकरी यासाठी पुढे येत नसल्याने सन २००५ पासून आतापर्यंत १७ वर्षात मोजक्याच ६३ पाणी वापर संस्थांनी नोंदणी केली, तर ७४ संस्थांचा कडासोबत करारनामा बाकी आहे, असे कडा कार्यालयाने दिलेल्या माहितीतून दिसून आले.

गतवर्षी दाेन लाख ७२ हजार हेक्टर जमीन ओलिताखालीबीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन लाख ५४ हजार ९१६ हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचे ध्येय कडा कार्यालयाचे आहे. गतवर्षी २०२१-२२ मध्ये या प्रकल्पामुळे दाेन लाख ७२ हजार ७८७ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले होते.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण