शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

शेतकऱ्यांकडूनच पाणी सिंचन व्यवस्थापनाकडे कानाडोळा; ४३२ पैक्की ६३ संस्थाच कार्यान्वित

By बापू सोळुंके | Updated: April 18, 2023 14:24 IST

छत्रपती संभाजीनगरच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयांतर्गत मोठे, मध्यम आणि लघू अशा एकूण १७२ धरणांतर्गत ४३२ पाणी वापर संस्था प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर : २००५ च्या शासन निर्देशानुसार सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन पाणी वापर संस्थांच्या वतीनेच करण्याचे बंधनकारक असताना पाणी वापर संस्थांची स्थापना आणि नोंदणी करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयांतर्गत मोठे, मध्यम आणि लघू अशा एकूण १७२ धरणांतर्गत ४३२ पाणी वापर संस्था प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र केवळ ६३ संस्थाच कार्यान्वित असल्याचे दिसून आले आहे.

लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) कार्यालयांतर्गत जायकवाडी, नांदूर मधमेश्वर आणि अन्य निम्न दुधना ही मोठी, २३ मध्यम, १० उच्च बांध पातळी बंधारे आणि १३६ लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. शेतीची सिंचनक्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ही धरणे बांधण्यात आली आहेत. २००५ पर्यंत या पाटबंधारे विभागामार्फत शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देऊन ओलित क्षेत्राच्या आधारे शेतकऱ्यांकडून पाणी वापराचे बिल वसूल केले जात होते. सन २००५ मध्ये शासनाने शेतकऱ्यांकडूनच सिंचनाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्थांची लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे नोंदणी करावी. यानंतर पाणी वापर संस्थेच्या मागणीनुसार शेतीला पाणी द्यावे आणि पाणी वापर संस्थेकडून बिल वसूल करावे, असा हा नियम आहे. मात्र, या नियमानुसार पाणी वापर संस्था स्थापन करणे, त्या संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांकडून पाणी वापराचे बिल वसूल करून ते कडा कार्यालयाकडे भरणे ही कामे या संस्थांना करावी लागणार आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु धरणांतील पाण्याचा शेतीसाठी वापर करण्यासाठी ४३२ पाणी वापर संस्था प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र शेतकरी यासाठी पुढे येत नसल्याने सन २००५ पासून आतापर्यंत १७ वर्षात मोजक्याच ६३ पाणी वापर संस्थांनी नोंदणी केली, तर ७४ संस्थांचा कडासोबत करारनामा बाकी आहे, असे कडा कार्यालयाने दिलेल्या माहितीतून दिसून आले.

गतवर्षी दाेन लाख ७२ हजार हेक्टर जमीन ओलिताखालीबीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन लाख ५४ हजार ९१६ हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचे ध्येय कडा कार्यालयाचे आहे. गतवर्षी २०२१-२२ मध्ये या प्रकल्पामुळे दाेन लाख ७२ हजार ७८७ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले होते.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण