शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे; पण ५ रुपयांचा, कुठे ५० रुपयांचा चेक नको: आदित्य ठाकरे

By संतोष हिरेमठ | Updated: September 4, 2024 12:18 IST

आदित्य ठाकरे यांचा मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हा पूर परिस्थिती पाहणी दौरा असणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सण येत आहेत. शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे आहे. पंचनामे होतील. पण मागच्या प्रमाणे कुठे ५ रुपयांचा, कुठे ५० रुपयांचा चेक, अस यावेळी होऊ नये, असे युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.

गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडयात मोठया प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आमचे पाहिले ध्येय हे महाराष्ट्र द्रोही भाजपाला हद्दपार करणे आहे, प्रत्येक जागेवर चर्चा होईल. कोणीही मुख्यमंत्री पदासाठी लढत नाही, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्यासाठी रस्त्यावर आलेली भाजपा नेते आता कुठं आहे, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात मध्य मार्ग काढला पाहिजे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांचा मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हा पूर परिस्थिती पाहणी दौरा असणार आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसAaditya Thackerayआदित्य ठाकरेAurangabadऔरंगाबाद