शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

महानगरांमध्ये आॅलिम्पिक सेंटर उभारण्याची गरज : बास्केटबॉलपटू विशेष भृगुवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 19:00 IST

बास्केटबॉलमध्ये कामगिरी उंचावण्यासाठी महानगरांत आंतरराष्ट्रीय दर्जाचे आॅलिम्पिक सेंटर उभारण्याची आवश्यकता असल्याचे मत भारतीय बास्केटबॉल संघाचा कर्णधार विशेष भृगुवंशी याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देविशेष भृगुवंशी याने २00६ ते २0१७ दरम्यान भारतीय बास्केटबॉल संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. त्याचप्रमाण आॅस्ट्रेलिया आणि अमेरिका येथील व्यासायिक लीग बास्केटबॉल स्पर्धेत चार वर्षे खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे.

- जयंत कुलकर्णी 

औरंगाबाद : भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांचा अभाव आहे. देशात फक्त बंगळुरू येथेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉलचे मैदान आहे. बास्केटबॉलमध्ये कामगिरी उंचावण्यासाठी भारतात किमान मुंबई, कोलकाता, नवी दिल्ली, चेन्नई आदी महानगरांत तरी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आॅलिम्पिक सेंटर उभारण्याची आवश्यकता असल्याचे मत भारतीय बास्केटबॉल संघाचा कर्णधार विशेष भृगुवंशी याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे औरंगाबाद येथे सोमवारपासून सुरू झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी विशेष भृगुवंशी हा औरंगाबादेत सोमवारी सकाळी दाखल झाला. यावेळी त्याने लोकमतशी विशेष संवाद साधला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताच्या कामगिरीविषयी छेडले असता विशेष भृगुवंशी म्हणाला, ‘‘सध्या भारतीय संघाचा दर्जा चांगला आहे. आम्ही खेळण्याआधी भारतीय संघ टॉप १२ मध्ये असायचा. आता भारतीय संघ अव्वल आठमध्ये आहे. भारतीय संघ सातत्याने आशियाई स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठत आहे.’’ 

आॅलिम्पिक दर्जाची  मैदान उभारावी

आॅलिम्पिकसाठी भारतीय संघ कधी पात्र ठरेल, असे विचारल्यानंतर तो म्हणाला, ‘‘आॅलिम्पिकला पात्र ठरणे ही फार दूरची बाब आहे. भारतात आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुविधांचा अभाव आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांयुक्त बास्केटबॉलचे मैदान फक्त बंगळुरू येथेच आहे. छोटे शहर व ग्रामीण भागातील खेळाडूंना अद्ययावत सुविधांयुक्त आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्या यासाठी सरकारने मुंबई, कोलकाता, चेन्नई आदी महानगरात चार ते पाच आॅलिम्पिक दर्जाच्या मैदान असणाऱ्या केंद्राची उभारणी करायला हवी. त्याचा भविष्यात निश्चितच खेळाडूंना फायदा होईल. बास्केटबॉल हा युरोपमधील खेळ आहे. त्यामुळे परदेशी प्रशिक्षक आणणे आपल्या खेळाडूंचा खेळ उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ’’

सरकार, प्रशिक्षकांनीही अपडेट राहायला हवे

 केंद्रीय क्रीडामंत्री म्हणून आॅलिम्पिक पदक विजेता राज्यवर्धनसिंह राठोड असल्याने खेळाडूंना फायदा होत असल्याचेही त्याने सांगितले. तो म्हणाला, ‘‘राज्यवर्धनसिंह राठोड हे क्रीडमंत्री असल्यामुळे खेळाडूंना पैसे मिळत आहेत. तसेच आॅलिम्पिकच्या तयारीच्या दृष्टिकोनातून ‘खेलो इंडिया’सारखा प्रकल्प राबवला जात असून तो खूप प्रशंसनीय आहे. सरकार, प्रशिक्षकांनीही अपडेट राहायला हवे. नवनवीन बाबीसमोर येत आहेत. त्यानुसार खेळाडूंसाठी शिबिराचे आयोजन करायला हवे. त्याचप्रमाणे खेळाडूंसाठी स्पोर्टस् सायकॉलॉजीमधील तज्ज्ञांची आवश्यकता आहे. त्यामुळे खेळाडूंना विश्रांतीचे महत्त्व समजेल तसेच तात्काळ निर्णयक्षमता वाढेल.’’

आशियाई स्पर्धेत देशाला जिंकून द्यायचे२०१७ मध्ये गुडघ्याला दुखापत झाल्याने आपण खेळू शकलो नाही; परंतु आता पुन्हा पुनरागमन करून भारताला आशियाई स्पर्धेत विजेतेपद पटकावून देण्याचे आपले मुख्य लक्ष्य आहे, असे भारतीय बास्केटबॉल संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या विशेष भृगुवंशी याने सांगितले. बास्केटबॉलसाठी जास्त उंचीच महत्त्वाची असते हे म्हणणे चुकीचे आहे. जास्त उंचीचा फायदा होत असतो; परंतु कमी उंचीचेदेखील एनबीएत अनेक दर्जेदार खेळाडू आहेत. भारताने चीनवर दोनदा मिळवलेला विजय हा आपल्या कारकीर्दीतील अविस्मरणीय क्षण असल्याचे त्याने सांगितले. फक्त मेहनत व सातत्यावर लक्ष केंद्रित करून शहर व देशाचे नाव उंचवावे, असा सल्लाही त्याने उदयोन्मुख खेळाडूंना दिला. विशेष भृगुवंशी याने २00६ ते २0१७ दरम्यान भारतीय बास्केटबॉल संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. त्याचप्रमाण आॅस्ट्रेलिया आणि अमेरिका येथील व्यासायिक लीग बास्केटबॉल स्पर्धेत चार वर्षे खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे.

टॅग्स :Basketballबास्केटबॉलDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद