शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
5
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
6
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
7
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
8
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
9
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
10
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
11
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
12
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
13
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
14
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
15
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
16
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
17
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
18
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
19
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
20
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

अडीच हजार कोटींची गरज

By admin | Updated: March 27, 2015 00:43 IST

औरंगाबाद : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडलेली मराठवाड्यातील १६८२ गावे टंचाईमुक्त करण्यासाठी एकूण २ हजार ७२९ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.

औरंगाबाद : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडलेली मराठवाड्यातील १६८२ गावे टंचाईमुक्त करण्यासाठी एकूण २ हजार ७२९ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. यापैकी १ हजार ८९ कोटी रुपये येत्या वर्षभरात विविध योजनांमधून मिळणार आहेत. उर्वरित सोळाशे कोटी रुपयांचा निधी उद्योजकांकडून मिळविण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या मुंबईत उद्योजकांची बैठक बोलावण्यात आलीआहे. पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील १६८२ गावे निवडण्यात आली आहेत. या गावांमध्ये जलसंधारणाची कोणकोणती कामे केल्यास ही गावे टंचाईमुक्त होऊ शकतात याचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी किती खर्च लागणार हेही यात नमूद करण्यात आलेले आहे. त्यानुसार मराठवाड्यातील १६८२ गावे टंचाईमुक्त करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांवर एकूण २ हजार ७२९ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यापैकी जून २०१५ पर्यंत एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम, गतिमान पाणलोट क्षेत्र विकास, जिल्हा नियोजन समिती, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आदी योजनांमधून १ हजार ८९ कोटी रुपये उपलब्ध होणारआहेत. राहिलेले १ हजार ६४० कोटी रुपये उद्योजकांच्या सीएसआर फंडातून (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) मिळविण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जातआहे. बैठकीला राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, रोहयो उपायुक्त तसेच इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या गावांतील कामांसंदर्भात आणि आवश्यक निधीबाबत विभागीय आयुक्त सादरीकरण करणार आहेत.