सरकारच्या विरोधात लढा उभारण्याची गरज - टोपे

By Admin | Updated: May 13, 2015 00:25 IST2015-05-13T00:10:43+5:302015-05-13T00:25:11+5:30

घनसावंगी : शेतकऱ्यांच्या विरोधी असणाऱ्या सरकारच्या विरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ. राजेश टोपे यांनी अंबड-घनसावंगी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना मंगळवारी केले.

Need to build a fight against the government - Tope | सरकारच्या विरोधात लढा उभारण्याची गरज - टोपे

सरकारच्या विरोधात लढा उभारण्याची गरज - टोपे


घनसावंगी : शेतकऱ्यांच्या विरोधी असणाऱ्या सरकारच्या विरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ. राजेश टोपे यांनी अंबड-घनसावंगी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना मंगळवारी केले.
बैठकीला माजी खा. अंकुशराव टोपे, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, उत्तमराव पवार, अमरसिंह खरात, तात्यासाहेब उढाण, मनोज मरकड, तात्यासाहेब चिमणे, गणेश आर्दड, तालुकाध्यक्ष कल्याण सपाटे, नकूल भालेकर, मेहेरनाथ बोबडे हे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना टोपे म्हणाले की, केंद्र व राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या व सामान्य नागरिकांच्या विरोधी असणारे असल्याने सरकारचया विरोधात नागरिकांनी एकत्र येवून लढा उभारला पाहिजे. शासनाने आतापर्यंतच्या शेतकऱ्यांच्या हिताचा एकही धोरणात्मक निर्णय न घेतल्याने दुष्काळी परिस्थितीत मजुरांना काम नाही, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर आहे. शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाबरोबर विम्याची रक्कम मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याने त्यांना आधार देण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा उभारणार असून, शेतकऱ्यांनी एकत्र येवून सरकारच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. त्यासाठी राकाँ.च्या वतीने धिक्कार मोर्चाचे आयोजन केले आहे.
या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ व विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे उपस्थित राहणार असून, शेतकऱ्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने ेउपस्थित रहावे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.
यावेळी अंकुशराव टोपे म्हणाले की, सत्तेसाठी केंद्र व राज्य सरकारने सामान्य जनतेला भूलथापा देवून सत्ता स्थापन केली. हे सरकार जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना मोठी झळ बसत आहे. मराठवाड्यात दुष्काळ असताना सरकार याकडे गांभिर्याने पाहत नाही. शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने सरकारच्या विरोधात उभे राहणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

Web Title: Need to build a fight against the government - Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.