शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

कचरा निर्मूलनात नागरिकांचाही सक्रिय सहभाग आवश्यक; औरंगाबाद खंडपीठाचे मत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 17:41 IST

नागरिकांचा यामध्ये सक्रिय सहभाग आवश्यक आहे. कचऱ्याचे वर्गीकरण नागरिकांनीच करायला हवे.’ असे मत औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. मनीष पितळे यांनी व्यक्त केले. 

औरंगाबाद : ‘शहरातील कचरा निर्मूलनाची जबाबदारी एकट्या महापालिकेची नसून, नागरिकांचा यामध्ये सक्रिय सहभाग आवश्यक आहे. कचऱ्याचे वर्गीकरण नागरिकांनीच करायला हवे.’ असे मत औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. मनीष पितळे यांनी कचऱ्यासंदर्भातील याचिकांच्या सुनावणीत गुरुवारी (दि.२७) व्यक्त केले. 

कचरा वर्गीकरणाबाबत महापालिकेने प्रसार माध्यमांद्वारे जनजागृती करणे आवश्यक आहे, यासाठी सेलिब्रिटीजची मदत घ्यावी, पथनाट्याचाही उपयोग करता येऊ शकेल. खंडपीठ वकील संघानेही यात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली. कचऱ्याचे वर्गीकरण आणि प्रक्रिया या संदर्भात महापालिकेने ज्या यंत्रणा उभारल्या आहेत, त्याच्या कामाची पाहणी, मजुरांची संख्या, होत असलेले काम आदींसंदर्भात सध्या देखरेख ठेवणाऱ्या समितीमध्ये याचिकाकर्त्याचाही समावेश करावा. १९ आॅक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. १०० टक्के कचऱ्याचे वर्गीकरण झाल्याशिवाय शासनाने दिलेल्या ९२ कोटी रुपयांचा वापर करता येणार नाही, असा शासन निर्णय असताना त्या निधीचाही वापर होतो आहे. तो थांबवावा, अशी याचिकाकर्त्यांची विनंती खंडपीठाने अमान्य केली.

पडेगाव, हर्सूल, कांचनवाडी आणि चिकलठाणा येथे वर्गीकरण न करताच महापालिका कचरा टाकत असल्याबद्दल आक्षेप घेणाऱ्या याचिका तसेच मूळ अवमान याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. कचऱ्याचे वर्गीकरण न करताच तो टाकला जात असल्याच्या आक्षेपांवर खंडपीठाने निर्देश दिले की, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि घनकचरा व्यवस्थापन समितीचे प्रमुख यांच्या समितीमध्ये याचिकाकर्त्यांचा समावेश करावा आणि त्यांनी कचरा प्रक्रिया केंद्राच्या पाहणीवेळी या सदस्यांना बरोबर न्यावे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर आणि अ‍ॅड. वाघ, मूळ याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. देवदत्त पालोदकर, महापालिकेतर्फे अ‍ॅड. राजेंद्र देशमुख, तर प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे अ‍ॅड. उत्तम बोंदर यांनी काम पाहिले. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ