शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

राष्ट्रवादीचा 'कॉंग्रेस'ला पुन्हा धक्का; आता गंगापूरच्या माजी नगराध्यक्षांचा ५ नगरसेवकांसह प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 18:11 IST

गंगापूरमध्ये ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का 

गंगापूर ( औरंगाबाद ) : माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विद्यमान पाच नगरसेवकांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला; मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षावर नाराज असलेले जाधव हे पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात होते; त्यांच्या पक्षांतराने शहरात प्राबल्य असलेल्या काँग्रेस पक्षाला पालिका निवडणुकीच्या तोंडावर खिंडार पडले आहे. दरम्यान, मागील महिन्यातच मालेगाव मधील काँग्रेसच्या २७ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला हा दुसरा धक्का बसला आहे. 

यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, आमदार सतीश चव्हाण, खादि ग्रामउद्योग मंडळाचे संतोष माने, तालुकाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर निळ, वाल्मिक सिरसाट, फैसल चाऊस यांची उपस्थिती होती.मागील पालिका निवडणुकीचा व अपवाद वगळता जाधव यांची वीस वर्ष्यापासून गंगापूर पालिकेवर पकड आहे; डिसें.२०१६ मध्ये झालेल्या निवडणुकित सेना भाजपाची युती होती तर काँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्र लढले होते सेनेचे सर्वाधिक ८ काँग्रेसचे ७ तर २ नगरसेवकांसह नगराध्यक्ष पदासाठी थेट जनतेतून झालेल्या निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष झाला होता याच अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जाधव यांच्या पत्नी काँग्रेस उमेदवार सुवर्णा जाधव जवळून पराभूत झाल्या होत्या.

विपरीत परिस्थितीत पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले असतांना देखील पक्षाच्या वतीने गंगापूरकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्याने व पालिका निवडणुकीत पाहिजे तसे सहकार्य न मिळाल्याने जाधव यांनी अनेकदा पक्ष श्रेष्टीकडे व शहरात झालेल्या कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली होती तरी देखील पक्षाने त्यांची दखल घेतली नाही त्यामुळे त्यांनी अखेर काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. तालुक्याच्या तुलनेत शहरात कॉंग्रेस मजबूत होती मात्र आता जाधव यांच्या सोबत विद्यमान पाच नगरसेवकांनी 'घड्याळ' बांधल्याने काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून पक्षाला अनेक वार्डात उमेदवार शोधावे लागणार आहे; तर जाधव यांच्या प्रवेशाने पालिकेत सध्या एक देखील नगरसेवक नसलेल्या राष्ट्रवादीची ताकद किती वाढणार हे येणाऱ्या पालिका निवडणुकीत दिसून येईल; यावेळी ज्ञानेश्वर साबने,सुरेश नेमाडे,योगेश पाटील,अशोक खाजेकर, मोहसीन चाऊस या पाच नगरसेवकांसह बाजार समितीचे सहा संचालक तसेच अमोल जगताप, सोपानराव देशमुख, तुकाराम सटाले,राकेश कळसकर, राजेंद्र दंडे नवनाथ कानडे, सचिन भवार,हनिफ बागवान, गुलाम शहा, दिनेश गायकवाड, उमेश बाराहते आदींनी प्रवेश केला.

लोकमतचा अंदाज खरा ठरलाकाँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत मागील आठवड्यात पक्षाची आढावा बैठक झाली होती. यावेळी जाधव आपल्या समर्थकांसह गैरहजर होते. तेव्हाच ते पक्षांतर करणार असा अंदाज 'लोकमत' वर्तवला होता.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसAurangabadऔरंगाबाद