शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नाथषष्ठी यात्रा रद्द मात्र २० मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार सोहळा; भाविकांचा सलग दुसऱ्या वर्षी हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 5:24 PM

Nathashthi Yatra is canceled due to corona नाथषष्ठीची ४०० वर्षाची परंपरा असून तुकाराम बीजेपासून नाथषष्ठी सोहळ्यास प्रारंभ होणार आहे.

ठळक मुद्देया सोहळ्यात मानकऱ्या व्यतिरिक्त इतर भाविकांना सहभागी होता येणार नाही

पैठण : कोरोनाचे नियम पाळून २० मानकऱ्यासह नाथषष्ठीचे सर्व धार्मिक व पारंपरिक सोहळे  पार पाडण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, या काळात भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे बंद राहणार आहेत. सलग दुसऱ्या वर्षी नाथषष्ठी यात्रा रद्द झाल्याने वारकरी संप्रदायात नाराजगी आहे.

कोरोनामुळे यंदा नाथषष्ठी यात्रा महोत्सव  रद्द करण्यात आला असला तरी नाथषष्ठी दरम्यान होणारी धार्मिक पूजाविधी पारंपरिक सोहळे खंडीत करता येणार नसल्याने मानकऱ्यांना नाथषष्ठी यात्रा साजरी करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी नाथवंशजांच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली होती. या अनुषंगाने दि २५ रोजी उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे व नाथवंशज यांची बैठक तहसील कार्यालयात घेण्यात आली. बैठकीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे , प्रभारी तहसीलदार दत्तात्रय निलावड , पोलीस निरीक्षक किशोर पवार, ज्येष्ठ नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी , रघुनाथ बुवा पालखीवाले, हरीपंडित महाराज गोसावी, आदीसह नाथवंशज उपस्थित होते.  

नाथषष्ठीची ४०० वर्षाची परंपरा असून तुकाराम बीजेपासून नाथषष्ठी सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. बैठकीत इतर देवस्थानच्या धर्तीवर मानकऱ्यांना सोहळा साजरा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जेष्ठ नाथवंशज रावसाहेब व हरिपंडीत महाराज यांनी केली. यानुसार २० मानकऱ्यासह सोहळा साजरा करण्याची परवानगी प्रशासनाने दिली. या सोहळ्यात मानकऱ्या व्यतिरिक्त इतर भाविकांना सहभागी होता येणार नसून  तसे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा ईशारा देत  यात्रा कालावधीत मंदीर बंद ठेवण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी सांगितले.

नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राजभरातील ४५० दिंडी प्रमुखांनी नोंदणी केली आहे. गत वर्षी नाथषष्ठी यात्रा महोत्सव प्रशासनाने रद्द केला होता तरीही वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून नाथमंदीराच्या बंद दरवाजाच्या बाहेरून दर्शन घेत वारी पूर्ण केली होती.  यंदाही वारकऱ्यांकडून गतवर्षीची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. पंढरपूर यात्रेनंतर वारकरी संप्रदायाच्या दृष्टीकोनातून पैठण यात्रेचे मोठे महत्त्व आहे. पंढरपूर प्रमाणेच लाखो वारकरी हरिनामाचा गजर करीत दिंड्या घेऊन पैठणची वारी पूर्ण करतात सलग दुसऱ्या वर्षी यात्रा रद्द झाल्याने वारकरी संप्रदायात मोठी नाराजगी पसरली असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या