शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

‘दत्तक’ याेजनेत गुटखा, मद्य उत्पादकाचे नाव दिल्यास शाळा बदनाम होईल;जनहित याचिका दाखल

By प्रभुदास पाटोळे | Published: March 15, 2024 2:02 PM

राज्य शासनाच्या ‘शाळा दत्तक’ याेजनेसंदर्भातील परिपत्रकात दुरुस्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल

छत्रपती संभाजीनगर : शाळा एखाद्या गुटखा अथवा मद्य उत्पादक कंपनीने दत्तक घेतल्यास किंवा त्यांनी त्यांच्यापैकी कोणाचे नाव दिल्यास शिक्षण क्षेत्र बदनाम हाेईल. तसेच विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होईल. अशा दत्तक घेतलेल्या एका शाळांमध्ये नाचगाणी झाल्याचे वृत्त प्रकाशित झाल्याच्या बातमीकडे एका जनहित याचिकेवर गुरुवारी झालेल्या सुनावणीत लक्ष वेधले आहे.

राज्य शासनाच्या ‘शाळा दत्तक’ याेजनेसंदर्भातील परिपत्रकात दुरुस्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने न्या. रवींद्र घुगे व न्या. आर. एम. जाेशी यांनी ग्रामविकास विभागाचे सचिव व शालेय शिक्षण आयुक्तांना नाेटीस बजावण्याचा आदेश दिला. याचिकेत आक्षेप घेण्यात आलेल्या मुद्यांवर काही बदल करता येतील का, अशी विचारणा खंडपीठाने सुनावणीवेळी राज्य शासनाला केली. या जनहित याचिकेवर २८ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे.

जालना येथील वात्सल्य बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान या अशासकीय संस्थेचे सचिव नीलेश ढाकणे यांनी ॲड. अनघा पेडगावकर यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार राज्य शासनाने १८ सप्टे २०२३ च्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्था संचलित सर्व माध्यमांच्या ‘शाळा दत्तक’ घेण्याची याेजना जाहीर केली आहे. खासगी क्षेत्रातील संस्था, एनजीओ, बहुराष्ट्रीय कंपन्या, खासगी व्यक्ती, काॅर्पोरेट ऑफिस शाळा दत्तक घेऊ शकतात. ५ वर्षांसाठी ‘सर्वसाधारण’ पालकत्व आणि १० वर्षांसाठी ‘नामकरण आधारित’ पालकत्व अशा दाेन प्रकारे शाळा दत्तक घेता येतात. त्यातील ‘नामकरणा’च्या प्रकाराला याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे. एखाद्या कंपनीने शाळेचे पालकत्व १० वर्षांसाठी स्वीकारले तर तिचे नाव शाळेच्या नावाच्या आधी किंवा नंतर लावले जाईल. १० वर्षांनंतर शाळेचे नाव पूर्ववत हाेईल. मात्र, कालांतराने त्या शाळेतील बाेर्ड परीक्षा उत्तीर्ण हाेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेच्या नावाबाबत माेठा संभ्रम निर्माण हाेईल आदी मुद्दे याचिकेत उपस्थित केले आहेत.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण