शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

औरंगाबादेत भूखंडाचे परस्पर आरक्षण बदलले; मनपाला थांगपत्ताही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:34 AM

शहर विकास आराखड्यात फेरबदल करण्याचा अधिकार सर्वसाधारण सभा आणि राज्य शासनाला असतानाही शहरातील काही भूखंडांचे आरक्षण बदलण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

औरंगाबाद : शहर विकास आराखड्यात फेरबदल करण्याचा अधिकार सर्वसाधारण सभा आणि राज्य शासनाला असतानाही शहरातील काही भूखंडांचे आरक्षण बदलण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण या शासकीय जागांवरील आरक्षणे परस्पर बदलण्यात आली आहेत. भूखंडाचे श्रीखंड खाणारे कोण? याचा सविस्तर अहवाल द्यावा, असे आदेश शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी नगररचना विभागाला दिले.

महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी नगररचना विभागाची आढावा बैठक घेतली. बैठकीला गजानन बारवाल, नगररचनाचे उपअभियंता एस.एस. कुलकर्णी यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. १९९१ च्या मंजूर विकास आराखड्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, महावितरण, तसेच इतर शासकीय कार्यालयांनी सुचविल्यानुसार आरक्षणे टाकण्यात आली. ज्या हेतूसाठी आरक्षण टाकण्यात आले तो हेतू नियोजित वेळेत पूर्ण झाला नाही तर आरक्षण बदलता येते. त्यासाठी महापालिका सर्वसाधारण सभेत ठराव घ्यावा लागतो. या ठरावाची प्रत शासनाकडे दाखल करावी लागते. शासनाला उचित वाटल्यास आरक्षण उठविण्याची कारवाई होते. मागील काही वर्षांमध्ये शासकीय जागांवरील आरक्षणे परस्पर बदलण्यात आली आहेत. 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपयोगासाठी आरक्षित असलेल्या जागांची आरक्षणे सर्वात जास्त बदलण्यात आल्याचेही समोर आले आहे. जागामालकांनी बांधकाम विभागाकडून पालिकेच्या नगररचना विभागाला देऊन जागांवरील आरक्षणे बदलून घेतली आहेत. नेमकी अशी किती प्रकरणे आहेत, किती आरक्षित जागांचा ताबा अद्याप घेण्यात आलेला नाही, किती आरक्षित जागांचा आरक्षणाप्रमाणे वापर होत नसून ते बदलून देण्यासाठी किती जणांचे प्रस्ताव आलेले आहेत, याचा संपूर्ण अहवाल येणाऱ्या सभेत सादर करण्याचे महापौरांनी आदेशित केले. 

बिल्डरांनी लढवली शक्कलमोठ्या ग्रुप हाऊसिंग प्रकल्पात बिल्डरांना मध्यमवर्गीय, सर्वसामान्यांसाठी २० टक्के सदनिकांचे आरक्षण ठेवावे असा दंडक करण्यात आला आहे. शासनाच्या या नवीन नियमातही बिल्डरांनी शक्कल लढविली आहे. म्हाडा कार्यालयाकडून एक पत्र आणायचे आणि त्यात मध्यमवर्गीय, सर्वसामान्यांसाठी घरांची गरज नाही. त्यानंतर योजनेतील सर्व घरे व्यावसायिक दराने विकून टाकायची. या प्रकरणाचाही सविस्तर तपशील सर्वसाधारण सभेने द्यावा, असे महापौरांनी नमूद केले आहे. 

नगररचना विभागच केंद्रबिंदूजमिनीचे आरक्षण बदलणे, हाऊसिंग योजनेतील घरे याचा संबंध मनपाच्या नगररचना विभागाशी येतो. या विभागाची परवानगी घेतल्याशिवाय काहीच निर्णय होत नाही. नगररचना विभागानेच आरक्षणे, बांधकाम परवानग्या तपासून या महाघोटाळ्याचा अहवाल द्यावा, अशी अपेक्षाही महापौरांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfraudधोकेबाजी