शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वक्फ कायद्याच्या विरोधात हिंदू बांधवांनी साथ द्यावी; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 12:06 IST

ही लढाई कोणत्या जातीधर्माच्या विरोधात नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध आहे.

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने चुकीच्या पद्धतीने वक्फ कायद्यात सुधारणा करून नवीन कायदा तयार केला. त्यामुळे आम्ही देशभरात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या माध्यमातून विरोध करतोय. या विरोधात हिंदू बांधवांनीही साथ द्यायला हवी. ही लढाई कोणत्या जातीधर्माच्या विरोधात नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध आहे. या देशाचे आम्ही नागरिक आहोत. या देशाचे वारसदार आहोत, आमच्या पूर्वजांचा वारसा आम्हीच सांभाळणार, असे मत मौलाना यासीन अली उस्मानी बदायूनी यांनी व्यक्त केले.

आमखास मैदानावर रविवारी रात्री ‘तहफ्फुज-ए-औकाफ कॉन्फरन्स’चे आयोजन केले होते. सायंकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असतानाही हजारोंच्या संख्येने अल्पसंख्याक बांधव परिषदेला उपस्थित होते. ‘मगरिब’च्या नमाजनंतर सुरू झालेल्या परिषदेत अनेक मान्यवरांनी वक्फ कायद्याच्या नव्या मसुद्याच्या विरोधात मत व्यक्त केले.

यावेळी एमआयएम पक्षाचे नासेर सिद्दीकी, राष्ट्रवादीचे इलियास किरमाणी, रफियोद्दीन अशरफी, जुनैद-उर-रहेमान कासमी, मौलाना इलियास फलाही, दिल्लीचे ॲड. शमशाद, मौलाना मोईजोद्दीन कासमी, जियाउद्दीन सिद्दीकी, महेफूज-उर रहेमान यांनी मार्गदर्शन केले.

पूर्वजांच्या जमिनी वाचवणार ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य हजरत मौलाना उमरैन महफूज रहमानी यांनी सरकारला इशारा दिला की वातावरण खराब नका करू, आमच्या पूर्वजांच्या जमिनी आम्हीच वाचवणार आहोत. आमच्यासोबत व्यासपीठावर हिंदू भाऊही उभे आहेत.-उमरैन महफूज रहमानी

जमिनींचा वापर इस्लामसाठीचमुस्लिमांच्या पूर्वजांनी अल्लाहसाठी जमिनी वक्फ केल्या. त्या कोणाच्या मालकीच्या नाहीत. या जमिनींचा वापर इस्लामसाठीच होईल. भावी पिढ्या त्या जमिनींचा वापर करतील. कब्रस्तान कुठून आणायचे ? लोकसभेत मंजूर कायद्याचा आढावा घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. न्यायमूर्तींनाही भाजप नेते धमकावत आहेत.- आ. जितेंद्र आव्हाड

पाठीशी खंबीरपणे उभे‘वक्फ’च्या या काळ्या कायद्याच्या विरोधात काँग्रेसने लोकसभेत ताकदीने विरोध केला. जोपर्यंत सरकार हा कायदा माघारी घेणार नाही, तोपर्यंत लढा सुरू राहील. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.- खा. कल्याण काळे

संविधानाची चौकट तोडलीवक्फ नव्या कायद्याच्या माध्यमातून गरीब मुस्लिमांचा उद्धार करणार, असे सरकार सांगत आहे. हे खोटे आहे. जुन्या कायद्यानुसारसुद्धा उद्धार करता आला असता. संविधानाच्या चौकटीत हा कायदा नाही. कलम २४, ३६ चे उल्लंघन होत आहे.- मौलाना मलिक मोहतसीम

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरJitendra Awhadजितेंद्र आव्हाडKalyan kaleडॉ. कल्याण काळे