शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरच्या खोऱ्यात लपलेत 'हायब्रिड दहशतवादी', शोपियानमधून दोघांना अटक, एके-५६ सहित दारुगोळा जप्त!
2
देशातील ४९ जिल्ह्यांत जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक, भारताची लोकसंख्या घटण्याच्या मार्गावर? 
3
'हा राष्ट्रीय विजय, यात सर्वांचे योगदान', ऑपरेशन सिंदूरबाबत एअर चीफ मार्शल यांचे मोठे वक्तव्य
4
उच्चांकी स्तरावरुन ६०० अंकांनी का घसरला सेन्सेक्स, काय आहेत या घसरणीची कारणं?
5
हगवणेंच्या बैलासमोर नृत्य केल्याच्या व्हायरल व्हिडिओवर आता गौतमी पाटीलची प्रतिक्रिया, म्हणाली...
6
Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलकडे मोठा पराक्रम करण्याची संधी, फक्त तीन विकेट्स दूर!
7
प्रेमासाठी काय पण! ग्रॅज्युएट तरुणीने केलं आठवी नापास मुलाशी लग्न; म्हणाली, "माझी मर्जी..."
8
पुणेकरांनो सावध व्हा...! AI थेट पावती फाडणार; मागचा पुढचा विचार सोडा... वाहतूक नियम पाळा...
9
लश्कर ए तोयबानं पाडलं बांगलादेशातील शेख हसीना सरकार?; आता भारताला दिली धमकी
10
वडील म्हणाले पैसे नाहीत, तरीही ज्योती मल्होत्राला मिळाला वकील! कोण मांडणार तिची बाजू? जाणून घ्या
11
Chandrapur Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात आणखी दोन जण ठार, एका महिन्यात ११ जणांचा मृत्यू; ग्रामस्थांमध्ये घबराट
12
Airtel नं आणले ३ नवे रिचार्ज प्लान्स, कमी किंमतीत अनलिमिटेड बेनिफट्स; OTT चाही मोफत लाभ
13
Video - बापरे! रीलच्या नादात ट्रेनच्या दरवाजाला लटकत होती तरुणी, अचानक हात सुटला अन्...
14
Google ने भारतात सुरू केले अधिकृत स्टोअर; Pixel फोन्सवर मिळतोय ₹42000 चा डिस्काउंट
15
एक कांदा ८०० ग्रॅम ते १ किलो वजनाचा! नितीन गडकरींच्या पत्नीने केला अनोखा प्रयोग; भरघोस उत्पादन आले...
16
IPL 2025 Playoffs Rules: पावसामुळे सामना रद्द झाल्यास फायनलला कोणता संघ जाणार? जाणून घ्या नियम
17
"आता गांधीजींचा देशही दुसरा गाल पुढे करणार नाही, तर…’’, शशी थरूर यांनी ठणकावले   
18
MI संघातील 'हा' खेळाडू साकारु शकेल 'बाबूभैय्या', हरभजन सिंगची 'हेरा फेरी'वादावर मजेशीर टिप्पणी
19
'बंटी और बबली' सिनेमासाठी अभिषेक बच्चनला नव्हती पहिली पसंती, या अभिनेत्याची केलेली निवड, पण...
20
सोनं झालं स्वस्त! आज मोठी घसरण, खरेदीची 'सुवर्णसंधी' की अजून वाट पाहाल? नवे दर काय?

वक्फ कायद्याच्या विरोधात हिंदू बांधवांनी साथ द्यावी; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 12:06 IST

ही लढाई कोणत्या जातीधर्माच्या विरोधात नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध आहे.

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने चुकीच्या पद्धतीने वक्फ कायद्यात सुधारणा करून नवीन कायदा तयार केला. त्यामुळे आम्ही देशभरात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या माध्यमातून विरोध करतोय. या विरोधात हिंदू बांधवांनीही साथ द्यायला हवी. ही लढाई कोणत्या जातीधर्माच्या विरोधात नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध आहे. या देशाचे आम्ही नागरिक आहोत. या देशाचे वारसदार आहोत, आमच्या पूर्वजांचा वारसा आम्हीच सांभाळणार, असे मत मौलाना यासीन अली उस्मानी बदायूनी यांनी व्यक्त केले.

आमखास मैदानावर रविवारी रात्री ‘तहफ्फुज-ए-औकाफ कॉन्फरन्स’चे आयोजन केले होते. सायंकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असतानाही हजारोंच्या संख्येने अल्पसंख्याक बांधव परिषदेला उपस्थित होते. ‘मगरिब’च्या नमाजनंतर सुरू झालेल्या परिषदेत अनेक मान्यवरांनी वक्फ कायद्याच्या नव्या मसुद्याच्या विरोधात मत व्यक्त केले.

यावेळी एमआयएम पक्षाचे नासेर सिद्दीकी, राष्ट्रवादीचे इलियास किरमाणी, रफियोद्दीन अशरफी, जुनैद-उर-रहेमान कासमी, मौलाना इलियास फलाही, दिल्लीचे ॲड. शमशाद, मौलाना मोईजोद्दीन कासमी, जियाउद्दीन सिद्दीकी, महेफूज-उर रहेमान यांनी मार्गदर्शन केले.

पूर्वजांच्या जमिनी वाचवणार ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य हजरत मौलाना उमरैन महफूज रहमानी यांनी सरकारला इशारा दिला की वातावरण खराब नका करू, आमच्या पूर्वजांच्या जमिनी आम्हीच वाचवणार आहोत. आमच्यासोबत व्यासपीठावर हिंदू भाऊही उभे आहेत.-उमरैन महफूज रहमानी

जमिनींचा वापर इस्लामसाठीचमुस्लिमांच्या पूर्वजांनी अल्लाहसाठी जमिनी वक्फ केल्या. त्या कोणाच्या मालकीच्या नाहीत. या जमिनींचा वापर इस्लामसाठीच होईल. भावी पिढ्या त्या जमिनींचा वापर करतील. कब्रस्तान कुठून आणायचे ? लोकसभेत मंजूर कायद्याचा आढावा घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. न्यायमूर्तींनाही भाजप नेते धमकावत आहेत.- आ. जितेंद्र आव्हाड

पाठीशी खंबीरपणे उभे‘वक्फ’च्या या काळ्या कायद्याच्या विरोधात काँग्रेसने लोकसभेत ताकदीने विरोध केला. जोपर्यंत सरकार हा कायदा माघारी घेणार नाही, तोपर्यंत लढा सुरू राहील. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.- खा. कल्याण काळे

संविधानाची चौकट तोडलीवक्फ नव्या कायद्याच्या माध्यमातून गरीब मुस्लिमांचा उद्धार करणार, असे सरकार सांगत आहे. हे खोटे आहे. जुन्या कायद्यानुसारसुद्धा उद्धार करता आला असता. संविधानाच्या चौकटीत हा कायदा नाही. कलम २४, ३६ चे उल्लंघन होत आहे.- मौलाना मलिक मोहतसीम

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरJitendra Awhadजितेंद्र आव्हाडKalyan kaleडॉ. कल्याण काळे