शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा पाणीपुरवठा योजनेवरील ते पत्र न्यायालयात मांडणार, शासन म्हणे रक्कम आम्ही देणार

By विकास राऊत | Updated: January 13, 2024 14:35 IST

८२२ कोटी कसे उभारायचे यावर मनपा गांभीर्याने चिंतन करणार

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने शहर पाणीपुरवठा योजनेतील २७४० कोटींपैकी महापालिकेचा ८२२ कोटी रुपयांचा हिस्सा भरण्यास नकार दिल्याचे पत्र न्यायालयात सादर करण्यात येईल, पालिकेला ८२२ कोटी उभारण्यासाठी काय करता येईल. यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. असे प्रशासक जी. श्रीकांत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपाचा वाटा शासनच भरणार असल्याचे गंगापूरमध्ये गुरुवारी पत्रकारांशी बोलतांना नमूद केले. शहर पाणीपुरवठा योजना अमृत-२ मधून राबविली जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे काम करीत आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत योजना पूर्ण होईल, असा दावा केला जात असतानाच शासनाने ८२२ कोटींबाबत पालिकेला पत्र पाठविल्याने योजनेच्या कामावर याचा परिणाम होणे शक्य आहे. ही रक्कम उभी करणे पालिकेच्या आवाक्याबाहेर आहे.

शासनाने पालिकेच्या वाट्याचा निधी भरावा, यासाठी दोनवेळा मनपाने प्रस्ताव पाठविले आहेत. योजनेबाबत न्यायालयात दाखल याचिकेची वारंवार सुनावणी होत आहे. त्यात न्यायालयाने देखील पालिकेचा हिस्सा शासनाने भरावा,असे निर्देशित केले आहे. नगरविकास विभागाने पत्र देऊन ८२२ कोटी राज्य शासन देऊ शकत नाही. पालिकेने स्वत:च्या पातळीवर निधीची तरतूद करावी, असे कळविले. त्यामुळे मनपा प्रशासनला मोठा हादरा बसला आहे. एवढा निधी उभा करणे हे पालिकेच्या सध्या तरी आवाक्यात नाही.

पुन्हा विनंती करू शासनाला...डिसेंबर २०२४ मध्ये योजना पूर्ण होईल. ११ महिन्यांत ८२२ काेटींचा निधी कसा उभारणार? यावर बोलतांना प्रशासक जी.श्रीकांत म्हणाले, राज्य शासनाला पुन्हा एकदा पत्र पाठवून विनंती करू. त्यासोबतच शहरातील मंत्री, लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली जाईल. शहरासाठी पाणी योजनेचे काम होणे गरजेचे आहे. गरज पडल्यास कर्ज काढण्यासाठी शासनाची मदत घ्यावी लागेल. इतर योजनांना कात्री लावावी लागेल. असेही प्रशासकांनी नमूद केले.

योजनेत असा आहे वाटा....एकूण योजनेची किंमत: २७४० कोटीकेंद्र सरकारचा वाटा २५ टक्के : ६८५ कोटीराज्य शासनाचा वाटा ४५ कोटी : १२३३ कोटीमहापालिकेचा वाटा ३० कोटी : ८२२ कोटीसध्या योजनेचे काम किती : ५० टक्के झाल्याचा दावा

उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणालेशहर पाणीपुरवठा योजनेत महापालिकेच्या वाट्याची रक्कम शासनच भरणार आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी गंगापूर येथील कार्यक्रमाप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी फडणवीस यांच्या कानावर शासनाकडून आलेला पत्रप्रपंच घातला. त्यानंतर फडणवीस यांनी शासनच वाटा भरील असे नमूद केले. सावे म्हणाले, ८२२ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून पालिकेला मिळतील, यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू केले आहेत.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी