शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

मनपा पाणीपुरवठा योजनेवरील ते पत्र न्यायालयात मांडणार, शासन म्हणे रक्कम आम्ही देणार

By विकास राऊत | Updated: January 13, 2024 14:35 IST

८२२ कोटी कसे उभारायचे यावर मनपा गांभीर्याने चिंतन करणार

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने शहर पाणीपुरवठा योजनेतील २७४० कोटींपैकी महापालिकेचा ८२२ कोटी रुपयांचा हिस्सा भरण्यास नकार दिल्याचे पत्र न्यायालयात सादर करण्यात येईल, पालिकेला ८२२ कोटी उभारण्यासाठी काय करता येईल. यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. असे प्रशासक जी. श्रीकांत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपाचा वाटा शासनच भरणार असल्याचे गंगापूरमध्ये गुरुवारी पत्रकारांशी बोलतांना नमूद केले. शहर पाणीपुरवठा योजना अमृत-२ मधून राबविली जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे काम करीत आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत योजना पूर्ण होईल, असा दावा केला जात असतानाच शासनाने ८२२ कोटींबाबत पालिकेला पत्र पाठविल्याने योजनेच्या कामावर याचा परिणाम होणे शक्य आहे. ही रक्कम उभी करणे पालिकेच्या आवाक्याबाहेर आहे.

शासनाने पालिकेच्या वाट्याचा निधी भरावा, यासाठी दोनवेळा मनपाने प्रस्ताव पाठविले आहेत. योजनेबाबत न्यायालयात दाखल याचिकेची वारंवार सुनावणी होत आहे. त्यात न्यायालयाने देखील पालिकेचा हिस्सा शासनाने भरावा,असे निर्देशित केले आहे. नगरविकास विभागाने पत्र देऊन ८२२ कोटी राज्य शासन देऊ शकत नाही. पालिकेने स्वत:च्या पातळीवर निधीची तरतूद करावी, असे कळविले. त्यामुळे मनपा प्रशासनला मोठा हादरा बसला आहे. एवढा निधी उभा करणे हे पालिकेच्या सध्या तरी आवाक्यात नाही.

पुन्हा विनंती करू शासनाला...डिसेंबर २०२४ मध्ये योजना पूर्ण होईल. ११ महिन्यांत ८२२ काेटींचा निधी कसा उभारणार? यावर बोलतांना प्रशासक जी.श्रीकांत म्हणाले, राज्य शासनाला पुन्हा एकदा पत्र पाठवून विनंती करू. त्यासोबतच शहरातील मंत्री, लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली जाईल. शहरासाठी पाणी योजनेचे काम होणे गरजेचे आहे. गरज पडल्यास कर्ज काढण्यासाठी शासनाची मदत घ्यावी लागेल. इतर योजनांना कात्री लावावी लागेल. असेही प्रशासकांनी नमूद केले.

योजनेत असा आहे वाटा....एकूण योजनेची किंमत: २७४० कोटीकेंद्र सरकारचा वाटा २५ टक्के : ६८५ कोटीराज्य शासनाचा वाटा ४५ कोटी : १२३३ कोटीमहापालिकेचा वाटा ३० कोटी : ८२२ कोटीसध्या योजनेचे काम किती : ५० टक्के झाल्याचा दावा

उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणालेशहर पाणीपुरवठा योजनेत महापालिकेच्या वाट्याची रक्कम शासनच भरणार आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी गंगापूर येथील कार्यक्रमाप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी फडणवीस यांच्या कानावर शासनाकडून आलेला पत्रप्रपंच घातला. त्यानंतर फडणवीस यांनी शासनच वाटा भरील असे नमूद केले. सावे म्हणाले, ८२२ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून पालिकेला मिळतील, यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू केले आहेत.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी