शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

महापालिकेचा कचऱ्यावरील खर्च ७ कोटींनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 19:45 IST

कचऱ्याच्या नावावर महापालिकेची उधळण सुरूच असल्याचे समोर आले आहे. 

औरंगाबाद : महापालिकेने घरोघरी जाऊन कचरा संकलन व वाहतूक करण्यासाठी बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीची नियुक्ती केली. खासगी कंपनीची नियुक्ती केल्यानंतर महापालिकेची आर्थिक बचत होईल, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता. हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. मागील नऊ महिन्यांमध्ये कचरा संकलनावर १७ कोटी रुपये खर्च झाला आहे. खाजगी कंपनी नियुक्त करण्यापूर्वी हा खर्च फक्त १० कोटी रुपये होता. कचऱ्याच्या नावावर महापालिकेची उधळण सुरूच असल्याचे समोर आले आहे. 

कचऱ्यावरील खर्च नेमका कोठे वाढला याचे चिंतन महापालिका प्रशासन करायला तयार नाही. कचऱ्याच्या आड खाबुगिरी तर वाढली नाही? याचा शोधही प्रशासन घ्यायला तयार नाही. महापालिकेतर्फे घन कचरा व्यवस्थापनावर मागील वर्षापर्यंत ६० कोटी रुपये खर्च केले जात होते. खासगीकरण केल्यानंतर हा खर्च कमी होईल, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता. खर्च कमी होण्याऐवजी वाढल्याचे समोर आले आहे. मुख्य लेखा परीक्षक दीपाराणी देवतराज यांनी महापालिकेच्या प्रमुख विभागांच्या खर्चाचा तपशील सादर केला आहे. त्यात कचरा संकलनासाठीचा खर्च १० कोटींवरून १७ कोटींवर गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. गतवर्षी १ फेब्रुवारी ते ३१ आॅक्टोबर २०१८ या काळात कचरा संकलनावर १० कोटी ८८ लाख ५१ हजार ७०३ रुपये खर्च झाले होते. आता फेब्रुवारी महिन्यापासून महापालिकेने पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीमार्फत काम सुरू केले आहे. त्यामुळे खर्च तब्बल सात कोटींनी वाढला आहे. फेब्रुवारी ते आॅक्टोबर २०१९ या काळात १७ कोटी १९ लाख ५५ हजार ३८० रुपये खर्च झाल्याचे या अहवालात नमूद  आहे. देवतराज यांनी या खर्चाचा तपशील महापौरांना सादर केला आहे. 

प्रकल्पांवर ११ कोटींचा खर्चराज्य शासनाच्या अनुदानातून चिकलठाणा, कांचनवाडी, हर्सूल व पडेगाव येथे कचरा प्रक्रिया प्रकल्पांची कामे सुरू करण्यात आली आहेत. पडेगाव वगळता तीन प्रकल्पांवर ११ कोटी ६० लाख ५१ हजार ७०८ रुपयांचा खर्च झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

खर्च आणखी वाढणारमनपा अ‍ॅक्टिव्हा या खाजगी कंपनीच्या सहकार्याने कचऱ्याचे संकलन, वाहतूक करीत होती. या कंपनीच्या रिक्षा बंद करण्यात आल्या. एकाच झोनमध्ये या कंपनीचे काम सुरू आहे. आठ झोनमध्ये बंगळुरू येथील कंपनी काम करीत आहे. भविष्यात कंपनीकडून खर्च आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादTaxकरfundsनिधी