शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

महानगरपालिकेची आमदनी जेमतेम २२ कोटी; खर्च मात्र दरमहा ३२ कोटींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 16:29 IST

ही दरी कमी करण्याच्या दृष्टीने कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

ठळक मुद्देदरमहा शासनाकडून जीएसटीचे २० कोटींचे अनुदानवर्षभरात ७०० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न होत नाही. असे असतानाही १८०० कोटींचा अर्थसंकल्प

औरंगाबाद : महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भयावह आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. तब्बल २०० कोटींची कंत्राटदारांची बिले थकली आहेत. ही बिले कधी अदा होतील याचा अजिबात नेम नाही. कारण तिजोरीत आलेला निधी दिवसभरही थांबत नाही. दरमहा तिजोरीवर ३२ कोटींचे दायित्व टाकण्यात आले आहे. एका महिन्यात तिजोरीत फक्त २० ते २५ कोटी रुपयेच जमा होतात. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, अशी दरी सध्या निर्माण झाली आहे. ही दरी कमी करण्याच्या दृष्टीने कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

शहराची तहान भागविणाऱ्या जलवाहिन्यांची जशी मरणासन्न अवस्था निर्माण झाली आहे, तशीच अवस्था महापालिकेच्या अर्थव्यवस्थेची झाली आहे. महापालिका प्रशासनाने कितीही प्रयत्न केले तरी वर्षभरात ७०० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न होत नाही. असे असतानाही यंदा १८०० कोटींचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला. विशेष बाब म्हणजे शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहणाऱ्या आयुक्तांनीही तीनपट मोठ्या अर्थसंकल्पाला मान्यता दिली. अवाढव्य अर्थसंकल्पाची अंमलबजावणीही करण्यात आली. एका वॉर्डात किमान ४० ते ५० कोटींची विकासकामे करण्यात येत आहेत. मागील वर्षभरात केलेल्या असंख्य कामांची बिले आता लेखा विभागात येऊन धडकत आहेत. बिलांसाठी कंत्राटदारांचा संयम संपला आहे. दोन वेळेस कंत्राटदारांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. एवढी दयनीय अवस्था महापालिकेत यापूर्वी कधीच निर्माण झाली नव्हती.

अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी पूर्ववत आणावी, असे आदेश मागील महिन्यात औरंगाबाद खंडपीठाने मनपा प्रशासन, राज्य शासनाला दिले. त्यानंतरही प्रशासनाकडून कोणत्याच ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. जिथे गरज नाही, तेथे कोट्यवधी रुपयांची कामे करण्यासाठी राजकीय मंडळींकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

दरमहा शासनाकडून २० कोटींचे अनुदानजीएसटी अनुदान म्हणून राज्य शासनाकडून दरमहा महापालिकेला किमान २० कोटी रुपये प्राप्त होतात. या निधीतून कर्मचाऱ्यांचा पगार आणि काही पैसे शिल्लक राहिल्यास अत्यावश्यक खर्चासाठी वापरण्यात येतात. मालमत्ताकर, पाणीपट्टी, नगररचना आदी विभागांकडून येणाऱ्या उत्पन्नातून आणखी काही अत्यावश्यक खर्च भागविला जातो.

आणखी खर्च वाढणारकचरा संकलन करणारी कंपनी सोमवारपासून श्रीगणेशा करणार आहे. या कंपनीला दरमहा किमान २ कोटी ५१ लाख रुपये द्यावे लागतील. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी काही छोट्या कंपन्यांची नेमणूक केली आहे. त्यांचे मीटर यापूर्वीच डाऊन झाले आहे. त्यांना प्रशासन कोठून पैसे देणार आहे.

महापालिकेच्या तिजोरीवरील खर्च- एलईडी दिवे लावणाऱ्या कंत्राटदाराला दरमहा २ कोटी ७२ लाख रुपये द्यावेच लागतात. - टँकरसाठी दरमहा २२ लाख तर वर्षाला २ कोटी ६४ लाख रुपये खर्च येतो.- जायकवाडी पाणीपुरवठ्याचे लाईट बिल दरमहा ४ कोटी २५ लाख रुपये.- इंधन, देखभाल दुरुस्तीपोटी दरमहा ५५ लाख रुपये खर्च.- मनुष्यबळ पुरविणाऱ्या विविध एजन्सीला दरमहा २ कोटी द्यावे लागतात.- कचरा जमा करणाऱ्या रिक्षाच्या कंत्राटदाराला दरमहा ५० लाख.- मनपाने २०० कोटींचे कर्ज घेतले होते, त्याचा हप्ता दरमहा १ कोटी ४० लाख रुपये.- एसटीपी प्लँटच्या विजेचा खर्च दरमहा ४० लाख रुपये.- मनपा कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शनसाठी १८ कोटींचा खर्च येतो.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद