शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

हगणदारीमुक्त शहरासाठी पालिकेची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:04 AM

जालना : शहर हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव पालिकेने घेतला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहर हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव पालिकेने घेतला आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नागरिक आजही उघड्यावर शौचास जात आहेत. वैयक्तिक शौचालयांचे कामही अपूर्ण आहे. लवकरच राज्यस्तरीय पथक शहरात तपासणीसाठी येणार असल्याने पालिका प्रशासनाची धावपळ सुरू आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रत्येक शहर व गाव हगणदारीमुक्त करण्याचा शासनाचा निर्धार आहे. त्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. या अभियानात सहभाग घेतलेल्या जालना नगरपालिकेने शहर संपूर्ण हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव घेतला आहे. परंतु प्रत्यक्षात शहरातील स्थिती वेगळी आहे. २०१५-१६ मध्ये केलेल्या सर्वेनुसार पालिकेला तेरा हजार २०२ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट होते. पैकी पाच हजार २१० शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्याचा वापर सुरू आहे. उर्वरित शौचालयांचे काम ७० टक्के काम पूर्ण झाल्याचे पालिका प्रशासन सांगत आहे. ज्या भागात नागरिक उघड्यावर शौचास जातात तिथे पालिकेने सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधली आहेत. उघड्यावर न बसता या स्वच्छतागृहांचा वापराच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी गुड मॉर्निंग पथकांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हास्तरीय पथकाने नुकतीच शहरात येऊन तपासणी केली. आता लवकरच राज्य व केंद्र स्तरावरील पथक शहरात अचानक तपासणी करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून शौचालयाचा वापर करावा यासाठी प्रत्येक प्रभागात पथनाट्ये, पोस्टर, बॅनर व अन्य माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.