शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
4
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
5
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
6
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
7
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
8
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
9
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
10
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
11
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
12
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
13
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
14
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
15
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
16
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
17
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
18
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
20
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड

आठ वर्षे जुने पाईप टाकणार मनपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:42 AM

पुंडलिकनगर जलकुंभ ते एन-५ पर्यंत ५०० मि.मी.ची जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे २०११ मध्ये उत्पादित केलेले पाईप २०१८ मध्ये वापरण्यात येणार असून, त्या पाईपची विल्हेवाट लावण्यासाठीच हे काम हाती घेण्यात आल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या वेंधळ्या कारभाराचा एक नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे. आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामांना ब्रेक लावण्याचे आदेश दिलेले असतानाही पुंडलिकनगर जलकुंभ ते एन-५ पर्यंत ५०० मि.मी.ची जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे २०११ मध्ये उत्पादित केलेले पाईप २०१८ मध्ये वापरण्यात येणार असून, त्या पाईपची विल्हेवाट लावण्यासाठीच हे काम हाती घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर पाईप पडले असून, ते नवीन वाटण्याऐवजी एकदम जुनाट झाल्याचे लक्षात येते.कुठल्याही पाईपची जल निर्वाहन क्षमता ही साधारणत: २० वर्षांची असते. मग ८ वर्षे जुने पाईप येथे का वापरण्यात येत आहेत? समांतर जलवाहिनीसाठी काम करणा-या कंपनीने खरेदी केलेले हे पाईप पालिकेतील महाभागांनी दडवून ठेवत आज बाहेर काढून हे काम काढले तर नाही ना, अशी शंका येत आहे.पुंडलिकनगर जलकुंभ पूर्णक्षमतेने भरत नसताना त्या जलकुंभावर ती पाईपलाईन एन-५ टाकण्यात येत असून, त्या कामाचे भूमिपूजनही लगबगीने उरकण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून कुठेतरी दडवून ठेवलेले पाईप या कामासाठी काढण्यात आल्याचे दिसते. १८ लाख रुपयांतून हे काम करण्यात येणार आहे.गेल्या सभेमध्ये प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे स्पष्टीकरण देताना सांगितले की, मुकुंदवाडी, जयभवानीनगर, रामनगर, अंबिकानगर, चिकलठाणा, मसनतपूर, ठाकरेनगर या भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी एन-५ ऐवजी पुंडलिकननगर जलकुंभावरून जलवाहिनी टाकण्यात येणार आहे; परंतु सध्या पाईप हनुमान चौक ते एन-४ च्या दिशेने येऊन पडले आहेत. मग ही जलवाहिनी वरील भागांना पाणीपुरवठा करण्याऐवजी कोणत्या भागासाठी टाकली जात आहे, असा प्रश्न आहे....तर रस्त्यावर उतरणारनगरसेवक तथा माजी सभागृह नेते गजानन मनगटे म्हणाले, पुंडलिकनगर जलकुंभ सद्य:स्थितीत पूर्ण क्षमतेने भरत नाही. १ लाख लोकांना पाणी देण्यासाठी तो जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्याची जोपर्यंत व्यवस्था पालिका करीत नाही, तोपर्यंत येथून नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाला आमचा विरोध राहील. या विरोधाला दुर्लक्ष करीत जर जलवाहिनी टाकली, तर ती उखडून फेकण्यात येईल, तसेच वेळप्रसंगी पुंडलिकनगर, न्यायनगर, गजानननगर परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन केले जाईल.