शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाला बायपासवर पांढरे पट्टे मारण्याचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 18:00 IST

मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्व्हिस रोडचा चक्क विसर पडला आहे. 

ठळक मुद्दे वाहतूक पोलीस वगळता, सर्व्हिस रोडला अन्य यंत्रणांची बगलनागरिकांची नाराजी

औरंगाबाद : दोन महिन्यांपूर्वी सर्व्हिस रोडच्या प्रश्नावर नागरिकांनी जोरदार आवाज उठविल्याने सार्वजनिक बांधकाम, मनपा तसेच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली होती; परंतु अपघात रोखण्यासाठी पोलीस तेवढे वाहने थोपवून धरत आहेत. मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्व्हिस रोडचा चक्क विसर पडला आहे. 

बायपास रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता सर्व्हिस रस्ता तयार करणे अत्यंत गरजेचे आहे; परंतु मनपा व सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर आपली जबाबदारी ढकलून देत आहे. त्यात नागरिकांना मात्र सतत गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यावर फलक लावून दिशादर्शक, पांढरे पट्टे आदी कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करणार होते; परंतु अद्याप रस्त्याचे साईड पंखे भरण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. काही ठिकाणी थातुरमातुर मुरूम तेवढा टाकला आहे. खड्डे बुजविले असले तरी महानुभाव आश्रम चौक ते देवळाई चौकापर्यंत कुठेही पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाही. 

वाहतूक कोंडी कायमथोपविलेल्या जड वाहनांचा लोंढा एकदाच सुटल्याने दुचाकीस्वार व स्कूल व्हॅनचालकांना रस्ता ओलांडणे म्हणजे अपघातास निमंत्रणच ठरते आहे. पोलीस यंत्रणेने लोखंडी बॅरिकेट लावून वाहनांना थोडीफार शिस्त लावण्याचा प्रयत्न केला; परंतु वाहतुकीला सवय लागेपर्यंत पोलिसांचा प्रयत्न असाच सुरू ठेवावा म्हणून सातारा-देवळाई संघर्ष समितीचे पदाधिकारी पोलीस आयुक्तांना भेटले. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर लागणारी आवश्यक साधणे उपलब्ध करून दिली नसल्याची खंतही नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

अतिक्रमणाला विराम किती दिवसच्बायपासवरील अपघात टळले असे म्हणता येत नाही. नुकताच एका  दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला आहे. पादचाऱ्याला दत्तमंदिराजवळ दुचाकीस्वाराने धडक देऊन तो स्वत:ही जखमी झाल्याचा प्रकार घडलेला आहे. च्जड वाहने सिंगल लाईनमधून चालत नाही. तीन लेनचा अख्खा रस्ता ते व्यापतात. त्यामुळे दुचाकीस्वार व पादचारींना डांबरी रस्त्यावरून खाली उतरावे लागते. त्यामुळे घसरून अपघाताच्या घटना घडत आहेत. अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी सर्व्हिस रोड बनवावा, अशी मागणी राजू राठोड, पद्मसिंग राजपूत, माजी ग्रा.पं. सदस्य विठ्ठल काळे, राजू नरवडे आदींनी केली आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसpwdसार्वजनिक बांधकाम विभाग