शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा रेल्वे प्रवास वेगवान होईल; ताशी १३० कि.मी. वेगाला मंजुरी,अंमलबजावणीत मात्र अडचणी

By संतोष हिरेमठ | Updated: August 2, 2023 13:51 IST

‘हाय स्पीड’साठी प्रवाशांना आणखी काही महिने वाट पाहावी लागेल.

छत्रपती संभाजीनगर : जालना ते मनमाड या १७४ किलोमीटरच्या मार्गावर रेल्वेगाड्यांची गती ताशी १३० किलोमीटरपर्यंत वाढविण्यास मार्चमध्ये मंजुरी मिळाली. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेंचा वेग वाढून प्रवाशांचा वेळ वाचण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, चार महिन्यांनंतरही हा वेग फक्त कागदावरच आहे. त्यामुळे मुंबईचा प्रवास वेगवान होण्यासाठी प्रवाशांना थोडी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

देशातील ५३ रेल्वे मार्गांवर ताशी १३० किलोमीटर वेगाने रेल्वे चालविण्यास मार्च महिन्याच्या प्रारंभी मंजुरी देण्यात आली. या ५३ मार्गांमध्ये जालना-मनमाड या मार्गाचा समावेश आहे. सध्या या मार्गावर ताशी १०० किलोमीटर वेगाने रेल्वे धावतात. हा वेग लवकरच १३० कि.मी. पर्यंत वाढेल, असे सांगितले जात होते. परंतु या मार्गावरील रेल्वे प्रवास ‘स्लो ट्रॅक’वरच आहे. ‘हाय स्पीड’साठी प्रवाशांना आणखी काही महिने वाट पाहावी लागेल.

वेग वाढीत कोणत्या अडचणी?दक्षिण मध्य रेल्वेकडून गेल्या काही महिन्यांत रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासह रुळ, पाॅइंट्स आदींच्या मजबुतीकरणावर भर देण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये रेल्वे रुळ बदलण्यात आले. रेल्वे रुळावर अचानक पाळीव जनावरे येण्याची समस्या मोठी आहे. ठिकठिकाणी रेल्वेगेटही आहेत. रेल्वेचा वेग वाढीत या गोष्टी अडचणीच्या ठरतात. त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वेग वाढल्यानंतर किती वेळ वाचणार?सध्या डिझेल इंजिनद्वारे ताशी १०० किलोमीटरच्या वेगाने रेल्वे धावतात. आजघडीला छत्रपती संभाजीनगर ते मुंबई रेल्वे प्रवासासाठी ७ ते ७.४५ तास लागतात. परंतु रेल्वेचा वेग प्रतितास १३० किलोमीटरपर्यंत वाढल्यानंतर मुंबईच्या प्रवासात वेळेचीही बचत होणार आहे. किमान एक ते दीड तास वाचू शकतो, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

‘डीआरएम’ म्हणाल्या...दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार म्हणाल्या, १३० कि.मी. वेगाने रेल्वे धावण्यासाठी ‘सेफ्टी फिनिशिंग’ करावी लागेल. हे ग्रेडेड काम आहे. कामाला वेळ द्यावा लागेल. एकदम १३० कि.मी.चा वेग होणार नाही. मात्र, लवकरच या वेगाने रेल्वे धावेल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेtourismपर्यटन