शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुंबईचा रेल्वे प्रवास वेगवान होईल; ताशी १३० कि.मी. वेगाला मंजुरी,अंमलबजावणीत मात्र अडचणी

By संतोष हिरेमठ | Updated: August 2, 2023 13:51 IST

‘हाय स्पीड’साठी प्रवाशांना आणखी काही महिने वाट पाहावी लागेल.

छत्रपती संभाजीनगर : जालना ते मनमाड या १७४ किलोमीटरच्या मार्गावर रेल्वेगाड्यांची गती ताशी १३० किलोमीटरपर्यंत वाढविण्यास मार्चमध्ये मंजुरी मिळाली. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेंचा वेग वाढून प्रवाशांचा वेळ वाचण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, चार महिन्यांनंतरही हा वेग फक्त कागदावरच आहे. त्यामुळे मुंबईचा प्रवास वेगवान होण्यासाठी प्रवाशांना थोडी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

देशातील ५३ रेल्वे मार्गांवर ताशी १३० किलोमीटर वेगाने रेल्वे चालविण्यास मार्च महिन्याच्या प्रारंभी मंजुरी देण्यात आली. या ५३ मार्गांमध्ये जालना-मनमाड या मार्गाचा समावेश आहे. सध्या या मार्गावर ताशी १०० किलोमीटर वेगाने रेल्वे धावतात. हा वेग लवकरच १३० कि.मी. पर्यंत वाढेल, असे सांगितले जात होते. परंतु या मार्गावरील रेल्वे प्रवास ‘स्लो ट्रॅक’वरच आहे. ‘हाय स्पीड’साठी प्रवाशांना आणखी काही महिने वाट पाहावी लागेल.

वेग वाढीत कोणत्या अडचणी?दक्षिण मध्य रेल्वेकडून गेल्या काही महिन्यांत रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासह रुळ, पाॅइंट्स आदींच्या मजबुतीकरणावर भर देण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये रेल्वे रुळ बदलण्यात आले. रेल्वे रुळावर अचानक पाळीव जनावरे येण्याची समस्या मोठी आहे. ठिकठिकाणी रेल्वेगेटही आहेत. रेल्वेचा वेग वाढीत या गोष्टी अडचणीच्या ठरतात. त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वेग वाढल्यानंतर किती वेळ वाचणार?सध्या डिझेल इंजिनद्वारे ताशी १०० किलोमीटरच्या वेगाने रेल्वे धावतात. आजघडीला छत्रपती संभाजीनगर ते मुंबई रेल्वे प्रवासासाठी ७ ते ७.४५ तास लागतात. परंतु रेल्वेचा वेग प्रतितास १३० किलोमीटरपर्यंत वाढल्यानंतर मुंबईच्या प्रवासात वेळेचीही बचत होणार आहे. किमान एक ते दीड तास वाचू शकतो, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

‘डीआरएम’ म्हणाल्या...दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार म्हणाल्या, १३० कि.मी. वेगाने रेल्वे धावण्यासाठी ‘सेफ्टी फिनिशिंग’ करावी लागेल. हे ग्रेडेड काम आहे. कामाला वेळ द्यावा लागेल. एकदम १३० कि.मी.चा वेग होणार नाही. मात्र, लवकरच या वेगाने रेल्वे धावेल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेtourismपर्यटन