शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने मराठवाड्यातील ८२ हजार हेक्टरवरील पिकांचा चिखल; ५.६१ टक्केच झाले पंचनामे

By विकास राऊत | Updated: March 21, 2023 12:43 IST

विभागातील सात जिल्ह्यांमध्ये नुकसान; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ६ ते ८ व १४ ते २० मार्च या काळात झालेल्या अवकाळी पावसाचा ८२ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. आठ जिल्ह्यांत या काळात १२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. १९ मार्चपर्यंतच्या अहवालानुसार जिरायत ४९ हजार हेक्टर, बागायत २६ हजार हेक्टर, तर साडेपाच हजार हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले. 

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. गहू, कांदा, हरभरा, फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार हेक्टर, जालना १५ हजार हेक्टर, परभणी ३२७५ हेक्टर, हिंगोली साडेपाच हजार, नांदेड २३ हजार ८०१ हेक्टर, बीड ११ हजार, लातूर जिल्ह्यात साडेअकरा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

१ लाख शेतकरी बाधित६ ते १९ मार्चपर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे विभागातील १ लाख ५ हजार २४८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात अद्याप धाराशिव जिल्ह्यातील आकडे समोर आले आहेत. मराठवाड्यातील ५४ हजार १७१ कर्मचारी संपावर होते. सोमवारी सायंकाळी संप मिटला आहे. ८२ हजार पैकी ४६०५ हेक्टर म्हणजेच ५.६१ टक्के पंचनामे एकूण नुकसानीच्या तुलनेत झाले आहेत.

२२ मार्चपर्यंत पंचनामे पूर्ण करामराठवाड्यात मागील २० दिवसांत झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे १ लाख ५ हजार २४८ शेतकऱ्यांचे ८२ हजार ३५.०८ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. हा प्राथमिक अंदाज असून येत्या २२ मार्चपर्यंत प्रत्यक्षात पंचनामे पूर्ण करून अंतिम अहवाल सादर करा, असे निर्देश सोमवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठही जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिले.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद