शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
2
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
3
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
4
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

खासगी गट नंबरमधील उद्योगाला महावितरणचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:59 PM

महावितरणच्या सिडको उपकेंद्रातील रोहित्र जळाल्याने वडगाव कोल्हाटीमधील खाजगी गट नंबरमधील उद्योगाचा वीजपुरवठा तब्बल २४ तास खंडित होता. उत्पादन ठप्प पडल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप लघु उद्योजकांनी केला आहे.

ठळक मुद्देवडगाव : ट्रान्सफार्मर जळाल्याने २४ तास वीजपुरवठा खंडित, उत्पादन बंद पडल्याने मोठे नुकसान

वाळूज महानगर : महावितरणच्या सिडको उपकेंद्रातील रोहित्र जळाल्याने वडगाव कोल्हाटीमधील खाजगी गट नंबरमधील उद्योगाचा वीजपुरवठा तब्बल २४ तास खंडित होता. उत्पादन ठप्प पडल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप लघु उद्योजकांनी केला आहे.एमआयडीसीत भूखंड मिळत नसल्याने अनेक नवउद्योजकांनी वडगावच्या खाजगी गट नंबरमधील भूखंडावर छोटे-मोठे व्यवसाय थाटले आहेत. मोठ्या कारखान्यांकडून मिळणाऱ्या कामावर हे उद्योग चालतात. महावितरणच्या सिडको उपकेंद्रातील रोहित्राला रविवारी मध्यरात्री आग लागली. या आगीत रोहित्र पूर्ण जळाल्याने परिसरातील वीजपुरवठा बंद होता. याचा सर्वाधिक फटका वडगाव कोल्हाटी खाजगी गट नंबरमधील उद्योजकांना बसला. त्रस्त उद्योजकांनी महावितरण कार्यालय गाठून वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. लवकरच वीजपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी उद्योजकांना दिले. परंतु दुुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्यामुळे रविवारी दिवसभर या उद्योगाचा वीजपुरवठा बंदच होता.सोमवारी पहाटे वीजपुरवठा सुरू झाल्यावरही विजेची सतत ये-जा सुरू असल्याने यंत्र बंद पडून जॉब खराब झाले. पाटे तुटले. याचा आर्थिक भुर्दंडही उद्योजकांना सहन करावा लागला. महावितरणमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप येथील माधव हादवे, श्रीकांत भांगे, महेंद्र आव्हाड, अभिजित भालेराव, रवींद्र देवरे, विठ्ठल गजरे, संदीप आग्रे, माणिक देशमुख, आश्विन राचतवार, सचिन देशमुख, राजाराम गडरी, शंकर देशमुख, दीपक डहाळे, शरद देशमुख, श्याम सोमवंशी आदी उद्योजकांनी केला आहे.महावितरणचे उपअभियंता प्रशांत तोडकर यांंनी सांगितले की, सिडको उपकेंद्रातील ५ एमव्हीएचा ट्रान्सफार्मर जळाला. नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी वेळ लागल्याने उद्योगाचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी २४ तास लागले.उद्योग क्षेत्रासाठी स्वतंत्र वीज द्यावी....वडगावातील गट नंबर ६७ व ७० मध्ये आॅटोमोबाईल्स, पॅकेजिंग, टूल रूम, मॅन्युफॅक्चरिंग, वेल्डिंग, प्रेस शॉप, फोजर््िांग आदी जवळपास ३५० ते ४०० छोटे-मोठे उद्योग आहेत. या उद्योगांना महावितरणच्या उपकेंद्रातूनच वीजपुरवठा होतो. वापर अधिक असल्याने या भागातील वीजपुरवठा सतत खंडित होतो. याचा परिणाम उत्पादनांवर होतो. येथील त्रस्त उद्योजकांनी महावितरणकडे स्वतंत्र वीज जोडणीची मागणी केली आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊन उत्पादन बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उद्योग क्षेत्रासाठी स्वतंत्र वीज द्यावी, अशी मागणी उद्योजकांमधून केली जात आहे.काय म्हणतात उद्योजक....वर्कआॅर्डर रद्द होण्याची भीती....मोठ्या कारखान्यांवरच लघु उद्योग अवलंबून आहेत. मोठ्या कारखान्याची वेळेत आॅर्डर पूर्ण करणे गरजेचे असते. आम्ही तोडून काम घेतो. वेळेत आॅर्डर पूर्ण केली नाही तर काम भेटत नाही. वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने उत्पादनांवर परिणाम होत आहे. त्यामुळे वर्कआॅर्डर रद्द होण्याची भीती आहे.रवींद्र देवरे, लघु उद्योजक--------------उद्योग चालविणे अवघड....या भागात १५ ते २० विद्युत डीपी असून, त्यावर १ हजारांच्या जवळपास कनेक्शन आहेत. वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने तासन्तास कारखाने बंद ठेवावे लागत आहेत. त्यामुळे मोठ्या कारखान्यांच्या आॅर्डर वेळेत पूर्ण करणे अवघड झाले आहे. रविवारी उत्पादन बंद पडल्याने मिळालेली आॅर्डर गेली. हा प्रकार असाच सुरू राहिला तर लघु उद्योजकांना उद्योग चालविणे कठीण आहे.श्रीकांत भांगे, लघु उद्योजक------------उद्योजकांचे नुकसान....उद्योगाचा जवळपास २४ तास वीजपुरवठा बंद होता. कारखाने बंद ठेवावे लागल्याने उत्पादन घेता आले नाही. त्याचबरोबर कामगारही कंपनीत बसून राहिल्याने त्यांच्या वेतनाचा भुर्दंडही उद्योजकांना सोसावा लागला. अनेकांना कामाच्या वर्कआॅर्डर वेळेत पूर्ण करता आल्या नाहीत. केवळ वीज नसल्यामुळे या भागातील लघु उद्योजकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.माधव हादवे, लघु उद्योजक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरणMIDCएमआयडीसी