शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

औरंगाबाद जिल्ह्यात तालुकानिहाय ‘लॅण्ड बँक’ अपडेट करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 16:43 IST

या भूसंपादन कार्यवाहीमुळे शासकीय जमिनी किती आहेत, खाजगी जमिनींची काय स्थिती आहे. याची माहिती अद्ययावत करण्यासाठी तालुकानिहाय ‘लॅण्ड बँक’ अपडेट करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासन पातळीवर सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देशासकीय प्रकल्पांसाठी मागील आठ वर्षांत मोठ्या प्रमाणात भूसंपादनाची कार्यवाही महसूल प्रशासनाकडून सुरू आहे.जिल्ह्यातील गायरान जमिनी अतिक्रमणाच्या विळख्यात येऊ लागल्यामुळे ‘लॅण्ड बँक’ अद्ययावत करणे गरजेचे आहे.

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रियल कॉरिडॉर, नॅशनल हायवे क्रमांक २११, समृद्धी महामार्ग या तीन महत्त्वाच्या शासकीय प्रकल्पांसाठी मागील आठ वर्षांत मोठ्या प्रमाणात भूसंपादनाची कार्यवाही महसूल प्रशासनाकडून सुरू आहे. या भूसंपादन कार्यवाहीमुळे शासकीय जमिनी किती आहेत, खाजगी जमिनींची काय स्थिती आहे. याची माहिती अद्ययावत करण्यासाठी तालुकानिहाय ‘लॅण्ड बँक’ अपडेट करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासन पातळीवर सुरू झाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पैठण तालुक्यातील ४३ गावांच्या जमिनीच्या मालकीसंदर्भात तहसीलदारांनी तलाठ्यांना पत्र दिले आहे. सरकारी जमिनी व इमारतींची माहिती तलाठ्यांकडून मागविली आहे. गाव नमुना नं. (ब), ८ अ चे उतारे तहसीलदारांनी अद्ययावत करण्यासाठी तलाठ्यांना स्मरणपत्र दिले आहे. महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील जमिनींची माहिती संकलित होत असून, या धर्तीवर सर्व जिल्ह्यांतील लॅण्ड बँक अद्ययावत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

भूसंपादनाच्या प्रक्रिया आणि खर्च राज्य आणि केंद्र शासनाने मागील वर्षी केलेल्या घोषणांपैकी काही टप्प्यातील अनुदान वर्ष २०१८ मध्ये मिळण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गासाठी १३६ गावांत १२०० हेक्टरचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. १५०० कोटी रुपये सरकार या भूसंपादन प्रक्रियेतून शेतकऱ्यांना देणार आहे. आजवर ४०० कोटी रुपये समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी देण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र.२१७ साठी १०२ कोटी रुपये भूसंपादनापोटी देण्यात येणार असून, औरंगाबाद ते धुळे असा १०० कि़मी. अंतरातील भूसंपादन प्रक्रिया संपली आहे. दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रियल कॉरिडॉर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी दोन टप्प्यांत सुमारे २२०० कोटींचे नियोजन आहे. १० हजार एकर जमीन डीएमआयसीसाठी संपादित करण्यात आली आहे. विमानतळ विस्तारीकरणासाठी १८२ एकर भूसंपादन करण्याची प्रक्रि या अजून सुरू होणे बाकी आहे. त्यासाठी सक्षमतेने निर्णय झाला तर ६०० कोटी रुपये भूसंपादनासाठी लागतील. 

१० हजार हेक्टरवर अतिक्रमणजिल्ह्यातील गायरान जमिनी अतिक्रमणाच्या विळख्यात येऊ लागल्यामुळे ‘लॅण्ड बँक’ अद्ययावत करणे गरजेचे आहे. १० हजार ४१८.८ हेक्टरहून अधिक सरकारी जमीन अतिक्रमित झाली आहे. एकेक करीत मोक्याच्या सरकारी जमिनी भू-माफियांच्या घशात जात आहेत. १३ हजार ५१० लोकांकडून सरकारी जमिनींवर अतिक्रमण केल्याची माहिती समोर आली आहे. तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार या पातळीवर सरकारी जमिनींची माहिती असते, ही यंत्रणा मागील काही वर्षांपासून सुस्तावल्यामुळे गायरान भूमाफियांच्या तावडीत जाऊ लागले आहे. १९८८, १९९१ आणि २००१ सालच्या शासन आदेशानुसार गायरान वर्गीकरणासाठी ‘लॅण्ड बँक’ अद्ययावत करण्यात येणार आहे.  

टॅग्स :Aurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गDistrict Collector Aurangabadजिल्हाधिकारी औरंगाबाद