जिल्हाभरात किसान सभेचे आंदोलन

By Admin | Updated: May 17, 2016 00:09 IST2016-05-17T00:07:53+5:302016-05-17T00:09:53+5:30

परभणी : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १६ मे पासून गाव पातळीवर उपोषण आंदोलन सुरू केले असून सोमवारी जिल्ह्यातील २० गावांत शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

Movement of Kisan Sabha rally across the district | जिल्हाभरात किसान सभेचे आंदोलन

जिल्हाभरात किसान सभेचे आंदोलन

परभणी : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १६ मे पासून गाव पातळीवर उपोषण आंदोलन सुरू केले असून सोमवारी जिल्ह्यातील २० गावांत शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
तीन वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकरी नैसर्गिक संकटात सापडले असून, त्यांना प्रशासनाने मदत करण्याऐवजी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने संपूर्ण कर्ज माफ करा, शेती व्यवसायासाठी बिनव्याजी एकरी ५० हजार रुपये भांडवल द्या, ज्या खाजगी बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत, ती गावे राष्ट्रीयकृत बँकांना दत्तक द्या, शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पेरणीसाठी मोफत बी बियाणे, खत, औषधी द्या, पीक विम्याची रक्कम तत्काळ अदा करा आदी मागण्यांसाठी १६ मेपासून शेतकऱ्यांचे जिल्ह्यातील प्रत्येक गावात उपोषण सुरू करण्यात आले आहे.
सोमवारी परभणी तालुक्यातील सिंगणापूर येथे कॉ. विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली मुंजाभाऊ कदम, सुदाम कदम, मधुकर कदम, उत्तमराव खिल्लारे, तुकाराम खिल्लारे, माणिक सुरवसे, साहेबराव वाघे या शेतकऱ्यांनी गावात आंदोलन केले, बोरवंड बु. येथे दिनेश खवले, मंचक यादव, कचरुबा बिंडे, रोहिदास यादव, परसराम खवले, बाबासाहेब खवले, गिन्यादेव लोखंडे, रुस्तुम खवले, राजाभाऊ खवले, सुरपिंपरी- येथे राजेभाऊ राठोड, भगवान पौळ, वसंत पवार, अंकुश धुमाळ, नाना बाबर, पिंपळगाव ठोंबरे- उद्धव ढगे, ज्ञानोबा ढगे, नारायण चेअरमन, लक्ष्मण ठोंबरे, उजळंबा- अशोक कांबळे, सखाराम धोत्रे, शिवाजी आगरकर, बाळासाहेब कांबळे, गंगाधर साखरे, ताडपांगरी- रामेश्वर वैरागड, सुदाम वैरागड, कैलासवाडी- रामराव कोळेकर, सोपान जोरवर, दत्तराव घुन्नर, विलास कोळेकर, इंदेवाडी- सुरेश कच्छवे, गणेश कच्छवे यांच्यासह २० गावांतील शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात उपोषण आंदोलन केले.
चौकशीसाठी उपोषण
परभणी : तालुक्यातील टाकळी बोबडे गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली आहे. परंतु, गावात एकही जलयुक्तचे काम पूर्ण करण्यात आले नाही. गावाजवळ एकही बंधारा बांधण्यात आला नाही. त्यामुळे पाणीपातळी खालावली आहे. जलसंपदा विभागाकडून एक मशीन देण्यात आली आहे. मात्र चार महिन्यांत केवळ २०० मीटर काम करण्यात आले आहे. निधी उपलब्ध करून द्यावा तसेच कामे वेळेत का पूर्ण झाली नाही, याची चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांच्या वतीने उपोषण करण्यात आले. नामदेव बोबडे, उद्धव बोबडे, लक्ष्मण बोबडे, बापूराव बोबडे, त्र्यंबक बोबडे, शिवाजी बोबडे, संजय दीपके, मधुकर बोबडे, रामभाऊ गाडे, विठ्ठल दिपके आदींनी सहभाग नोंदविला.

Web Title: Movement of Kisan Sabha rally across the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.