शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

जळगाव रस्त्याचा कंत्राटदार बदलण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 20:33 IST

कंत्राटदाराला दिलेले ६० कोटी बँकेने घेतले वळती करून

- विकास राऊत 

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाणारा औरंगाबाद ते अजिंठा ते जळगाव या रस्त्याच्या कंत्राटदाराला राज्य महामार्ग प्राधिकरणाने दिलेले ६० कोटी रुपये बँकेने वळती करून घेतल्यामुळे कंत्राटदाराला त्या कामासाठी पैसे कुठून उभे करावेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे, तर कमी भावाने काम देऊन फसगत झाल्याची भावना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमध्ये झाली आहे. १० टक्क्यांपेक्षा कमी भावाने काम करणाऱ्या कंत्राटदाराला काम न देण्याबाबत शासनाने मध्यंतरी एक अध्यादेश काढला होता; परंतु तो अध्यादेश या कामासमोर फिका पडला आहे. परिणामी चिखल, खड्डेमय झालेला तो रस्ता सध्या अपघात मार्ग म्हणून पुढे आला आहे. 

आंध्र प्रदेशातील ऋत्विक एजन्सीला त्या रस्त्याचे काम देण्यात आले आहे. १ हजार कोटींच्या आसपास त्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन सव्वा ते दीड वर्षाचा काळ लोटला आहे. यातील ५० टक्के रक्कम कंत्राटदाराला देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी बँक गॅरंटी मिळावी, यासाठी कंत्राटदार प्रयत्न करीत होता. महामार्ग प्राधिकरणानेदेखील ६० कोटी रुपयांचा धनादेश कंत्राटदाराला दिला. कंत्राटदाराने धनादेश बँकेत टाकला आणि बँकेने ती रक्कम इतर देण्यांच्या तडजोडीत वळती करून घेतली.

कंत्राटदार आणि महामार्ग प्राधिकरणाची यामुळे कोंडी झाली आहे. असे सूत्रांनी सांगितले. आम्ही ६० कोटींचे बिल दिले होते, बँकेत जमा करताच ते बँकेने काढून घेतले. कंत्राटदारावर किती कर्ज आहे हे माहिती नाही. भटनागर म्हणून कंत्राटदाराकडे हे काम देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने काढणे म्हणजे त्या कामाला प्रचंड उशीर लागेल. त्यामुळे थर्ड पार्टीकडून काम करण्याबाबत विचार सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादJalgaonजळगाव