शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

जळगाव रस्त्याचा कंत्राटदार बदलण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 20:33 IST

कंत्राटदाराला दिलेले ६० कोटी बँकेने घेतले वळती करून

- विकास राऊत 

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाणारा औरंगाबाद ते अजिंठा ते जळगाव या रस्त्याच्या कंत्राटदाराला राज्य महामार्ग प्राधिकरणाने दिलेले ६० कोटी रुपये बँकेने वळती करून घेतल्यामुळे कंत्राटदाराला त्या कामासाठी पैसे कुठून उभे करावेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे, तर कमी भावाने काम देऊन फसगत झाल्याची भावना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमध्ये झाली आहे. १० टक्क्यांपेक्षा कमी भावाने काम करणाऱ्या कंत्राटदाराला काम न देण्याबाबत शासनाने मध्यंतरी एक अध्यादेश काढला होता; परंतु तो अध्यादेश या कामासमोर फिका पडला आहे. परिणामी चिखल, खड्डेमय झालेला तो रस्ता सध्या अपघात मार्ग म्हणून पुढे आला आहे. 

आंध्र प्रदेशातील ऋत्विक एजन्सीला त्या रस्त्याचे काम देण्यात आले आहे. १ हजार कोटींच्या आसपास त्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन सव्वा ते दीड वर्षाचा काळ लोटला आहे. यातील ५० टक्के रक्कम कंत्राटदाराला देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी बँक गॅरंटी मिळावी, यासाठी कंत्राटदार प्रयत्न करीत होता. महामार्ग प्राधिकरणानेदेखील ६० कोटी रुपयांचा धनादेश कंत्राटदाराला दिला. कंत्राटदाराने धनादेश बँकेत टाकला आणि बँकेने ती रक्कम इतर देण्यांच्या तडजोडीत वळती करून घेतली.

कंत्राटदार आणि महामार्ग प्राधिकरणाची यामुळे कोंडी झाली आहे. असे सूत्रांनी सांगितले. आम्ही ६० कोटींचे बिल दिले होते, बँकेत जमा करताच ते बँकेने काढून घेतले. कंत्राटदारावर किती कर्ज आहे हे माहिती नाही. भटनागर म्हणून कंत्राटदाराकडे हे काम देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने काढणे म्हणजे त्या कामाला प्रचंड उशीर लागेल. त्यामुळे थर्ड पार्टीकडून काम करण्याबाबत विचार सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादJalgaonजळगाव