शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित मुलगी घर सोडून गेल्याने आईने जीवन संपवले; मृतदेहासह नातेवाईकांचा ठाण्यात ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:36 IST

पोलिस ठाण्यात मृतदेह ठेवून दोन तास ठिय्या : अखेर रात्री ११:१५ वाजता तरुणाच्या कुटुंबावर गुन्हा दाखल; मगच तणाव निवळला

छत्रपती संभाजीनगर : वीस वर्षांची विवाहित मुलगी परस्पर घर सोडून बुलढाणा जिल्ह्यातील एका मुलासोबत राहायला गेली. यात कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार करून मुलीला परत आणण्याची विनंती केली. मात्र, मुलीने स्वमर्जीने गेल्याचे सांगून परत येण्यास नकार दिला. पोलिसांनी वेळेत अपेक्षित मदत न केल्याने तणावाखाली जाऊन मुलीच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सायंकाळी ७ वाजता घडलेल्या या घटनेनंतर संतप्त कुटुंबाने मृतदेहासह उस्मानपुरा पोलिस ठाण्यात दोन तास ठिय्या दिला. अखेर रात्री ११:१५ वाजता तरुणासह त्याच्या कुटुंबावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेत पोलिस ठाणे सोडले व तणाव निवळला.

उस्मानपुरा परिसरात राहणारी २० वर्षीय विवाहित तरुणी ८ नोव्हेंबर रोजी कुटुंबाला काही न सांगता घर सोडून गेली. शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे तिच्या पतीने उस्मानपुरा पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तपासात मुलगी रमानगरमधील वैभव बोर्डे याच्यासोबत बुलढाण्याला गेल्याचे उघडकीस आले. त्यांनी उस्मानपुरा पोलिसांना मुलीला परत आणून देण्याची विनंती केली. ही बाब कळताच वैभव बोर्डे मुलीसह बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला. तेथे मुलीने पोलिसांसमोर ती स्वमर्जीने वैभवसोबत गेली असून कुटुंबाकडे परत न जाण्याचा जबाब लिहून दिला.

मुलीच्या काळजीने आईची आत्महत्याविवाहित मुलगी घर सोडून निघून गेली. तिचे बोर्डे कुटुंबाकडून बरेवाईट होण्याच्या भीतीने तिची आई चिंतित होती. मुलगी परत येत नसल्याचे कळाल्याने ती अधिक तणावाखाली गेली. गुरुवारी मुलीच्या ५० वर्षीय आईने राहत्या घरात गळफास घेतला. नेमका तेव्हा याच प्रकरणात मदतीची मागणी करण्यासाठी भाऊ पोलिस आयुक्तालयात गेला होता. आईने आत्महत्या केल्याचे कळतात त्याने घरी धाव घेतली.

उस्मानपुरा पोलिस ठाण्यात ठिय्या-या सर्व घटनाक्रमात मुलीचे कुटुंबीय सातत्याने उस्मानपुरा पोलिस ठाण्यात जाऊन मुलीला परत आणून देण्याची विनंती करत होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तपासिक अंमलदाराला कुटुंबासह बुलढाणाला जाऊन कारवाई करण्याची सूचना केली होती. मात्र त्यात दिरंगाई झाली.- कुटुंब पोलिसांसह बुलढाणा ग्रामीण पोलिसांकडे जाईपर्यंत सदर मुलगी वैभवसह जबाब नोंदवून निघून गेली होती. त्या तणावातूनच आईने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबाने केला.-त्या संतापातून कुटुंबाने रात्री आठ वाजता मृतदेह उस्मानपुरा पोलिस ठाण्यात नेऊन ठेवला. वैभव व त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करावा, वेळेत अपेक्षित कारवाई न केलेल्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली. ठाण्यातच मृतदेह आणून ठेवल्याने मोठा तणाव झाला. ठाण्याबाहेरही जमाव जमला. पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर, पोलिस निरीक्षक संभाजी पवार, गजानन कल्याणकर, कृष्णा शिंदे, सचिन कुंभार, अविनाश आघाव यांनी ठाण्यात धाव घेतली. दंगा काबू पथक बोलावण्यात आले.

रात्री ताब्यात घेतला मृतदेहवैभव बोर्डे व त्याच्या कुटुंबामुळेच आईने आत्महत्या केल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबाने केली. त्यानंतर पोलिसांनी वैभव, पार्वती, विशाल बोर्डे (रा. रमानगर), मनीषा पवार, नंदू पवार, राजेंद्र पवार (तिघेही रा. शास्त्रीनगर, बुलढाणा), गौरव बोर्डे, केसरबाई दगडू बोर्डे (रा. बदनापूर) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. शिवाय वेळेत अपेक्षित कारवाई न केलेल्या पोलिसांवर कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर मुलीच्या कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेत ठाणे सोडले. कुटुंबाने केलेल्या आरोपांमुळे व कारवाईतील दिरंगाईमुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

... तर माझी आई वाचली असतीया संपूर्ण घटनेनंतर मुलीच्या भावाने माध्यमांशी संवाद साधला. माझी बहीण वैभवसोबत बुलढाण्याला गेली, ही बाब मी पोलिसांना कळवली होती. आम्ही त्यांना केवळ आमच्यासोबत येऊन मुलीशी बोलणे करून द्या, अशी विनंती केली होती. मात्र, पोलिसांनी ती गांभीर्याने घेतली नाही. मी पोलिस ठाण्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे मदत मागितली. मात्र, कोणीही मदत केली नाही. पोलिसांनी वेळीच मदत केली असती तर माझी आई आज वाचली असती, असा आरोप मुलीच्या भावाने केला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी