शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

मराठवाड्यातील बहुतांश धरणे तळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:30 IST

मराठवाड्यातील बहुतांश लहान, मध्यम व मोठे प्रकल्प तळाला गेले आहेत. मे/वैशाख महिन्यांत उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. विभागातील सर्व प्रकल्पांत १९ टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला आहे.

ठळक मुद्दे१९ % पाणी शिल्लक : वैशाखात पारा चढल्यामुळे नागरिकांची वणवण

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील बहुतांश लहान, मध्यम व मोठे प्रकल्प तळाला गेले आहेत. मे/वैशाख महिन्यांत उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. विभागातील सर्व प्रकल्पांत १९ टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप महिनाभराचा अवधी आहे. त्यामुळे हा महिना मराठवाड्यासाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.टँकरचा आकडा ७०० पर्यंत गेला असून, आजवरच्या उन्हाळ्यात सर्वाधिक टँकरची संख्या कमी असली तरी विभागातील चार जिल्ह्यांमध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते आहे. १० लाख नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. या आठवड्याच्या अखेरीस ११ मोठ्या प्रकल्पांत उपयुक्त २१.६३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचा अहवाल पाटबंधारे खात्याने दिला आहे.७५ मध्यम प्रकल्पांत १८.४६ टक्के, ७४६ लघु प्रकल्पांत १०.५३ टक्के पाणीसाठा आहे. गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यांमध्ये २४.५३ टक्के, तर तेरणा, मांजरा, पूर्णा नदीवरील २४ प्रकल्पांत २२.६४ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. सद्य:स्थितीत विभागातील ८६७ प्रकल्पांत १९ टक्के पाणीसाठाआहे.मध्यम प्रकल्प १० टक्क्यांनी आटलेविभागातील ७५ मध्यम प्रकल्पांत मागील वर्षी याच तारखेपर्यंत २९ टक्के पाणीसाठा होता. आजघडीला १९ टक्के पाणीसाठा आहे. १० टक्क्यांनी मध्यम प्रकल्प आटले आहेत. १० टक्के पाणी त्या प्रकल्पात असते, तर नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली नसती. मोठ्या प्रकल्पांत गतवर्षी ७० टक्के पाणीसाठा होता. यावर्षी ते प्रमाण २१ टक्क्यांवर आले आहे. यावर्षी ३९ टक्के मोठ्या प्रकल्पांत पाणी नाही. त्यामुळे विभागात विदारक असे चित्र आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाwater shortageपाणीकपातDamधरण