सकाळच्या सत्रात पारा फक्त ८ अंशावर !
By Admin | Updated: December 19, 2014 00:58 IST2014-12-19T00:37:25+5:302014-12-19T00:58:30+5:30
बीड : जिल्ह्यात थंडीचा कडावा वाढतच चालला असून गुरुवारची पहाट तर शहरवासीयांसाठी रक्त गोठवणारी ठरली. पहाटे पाच तर सकाळी नऊ या द

सकाळच्या सत्रात पारा फक्त ८ अंशावर !
बीड : जिल्ह्यात थंडीचा कडावा वाढतच चालला असून गुरुवारची पहाट तर शहरवासीयांसाठी रक्त गोठवणारी ठरली. पहाटे पाच तर सकाळी नऊ या दरम्यानच्या कालावधीत पारा चक्क ८.१ अंशावर जाऊन पोहोचला होता. दिवसा अखेर कमाल तापमान २६.८ तर किमान तापमान १६.०३ नोंदविले गेले.
मागील आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढतच चालला आहे. तालुका परिसरात तापमान १४ ते १२ अंशाच्या दरम्यान राहत असल्याने अनेकांना घराच्या बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. जिवघेण्या थंडीच्या बचावापासून नागरिक उबदार कपडे घालून घराच्या बाहेर पडत असल्याचे पहावयास मिळत आहे. गुरुवारी थंडी अधिक पडल्याने नागरिकांनी दिवसभर उबदार कपडे घातल्याचे दिसून आले. सकाळी हुडहुडी भरविणारी थंड हवा सुटली होती. त्यामुळे तर गारठ्यात आणखीनच भर पडली होती. सायंकाळी हीच परिस्थिती पहावयास मिळाली. लहान मुले, वृद्धांना अधिक त्रास
बीड शहरातील काही इंग्रजी, मराठी व उर्दु शाळा सकाळच्या सत्रात भरतात. विशेष म्हणजे, यात एलकेजी व युकेजी, बालवाडीचा समावेश आहे. या शाळांची वेळ सकाळी नऊ ते एक अशी आहे. सकाळची थंडी मोठ्या व्यक्तींनाही सहन होत नाही मग अशा मुलांना ही थंडी कशी सोसवेल. गुरुवारी सकाळच्या सत्रात पारा ८ अंशावर होता. त्यामुळे बच्चे कंपनी हुडहुडत शाळेत गेले. ही थंडी अतिशय बोचरी असल्याने इंग्रजी शाळांनी किमान दोन महिने शाळांची वेळ बदलावी अशी मागणी पालकांतून होत आहे. थंडीचा कडाका वाढत चालला असल्याने बाजारपेठा लवकरच ओस पडत आहेत तर शहरासह ग्रामीण भागात थंडीच्या बचावासाठी रात्री व सकाळी शेकोट्या पेटत असल्याचे पहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)