शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मराठवाड्यात पाऊस सरासरीपेक्षा जास्त होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 12:10 IST

यंदाच्या पावसाळ्यात आजवर ५२ जणांचा बळी गेला आहे, तर ९६० लहान-मोठ्या जनावरांचाही मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजवर ९० टक्के पाऊस झाला असून, आगामी काळात विभागात पाऊस यंदा सरासरीपेक्षा होण्याची शक्यता आहे. आजवरच्या पावसामुळे विभागातील ११ मोठ्या प्रकल्पांत ९१ टक्के जलसाठा आला आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत नियमित पावसाळा गृहीत धरण्यात येतो. जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत सरासरीच्या ११३ टक्के पाऊस झाला आहे. ५१३ मि.मी. पाऊस या तीन महिन्यांत होणे अपेक्षित होते. या तुलनेत ५८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

सप्टेंबर महिन्यांतील चार दिवसांत ३१ मि.मी. पाऊस झाला आहे. विभागाची वार्षिक सरासरी ६७९ मि.मी. असून, या तुलनेत ६११ मि.मी पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत हे ९० टक्के प्रमाण आहे. गणेशोत्सवापासून रोज सायंकाळी पाऊस दमदार हजेरी लावतो आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस बरसतो आहे.

तीन महिन्यांत २१८ मंडळात अतिवृष्टी---जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत ४५० पैकी २१८ मंडळांत अतिवृष्टी झाली. यात ११३ मंडळात एक वेळा, दोन वेळा ४८ मंडळांत, तीन वेळा ३७, चार वेळा १५ मंडळांत, तर पाच वेळा ३ मंडळांत अतिवृष्टी झाली. २ मंडळांत सहा वेळा अतिवृष्टी झाली. सर्व युनिटचा विचार करता ४०७ मंडळे अतिवृष्टीच्या रेट्यात आली.

काही प्रकल्प तुडुंब---विभागात मोठे, मध्यम व लघू प्रकल्पांची संख्या ८७३ आहे. यातील ११ मोठ्या प्रकल्पांत ९१ टक्के जलसाठा सध्या आहे. ७५ मध्यम प्रकल्पांत ७० टक्के, ६४६ लघू प्रकल्पांत ६१ टक्के जलसाठा सध्या आहे. यातील काही प्रकल्प तुडुंब होण्याच्या वाटेवर आहेत.

तीन महिन्यांत ५२ जणांचा बळी---यंदाच्या पावसाळ्यात आजवर ५२ जणांचा बळी गेला आहे, तर ९६० लहान-मोठ्या जनावरांचाही मृत्यू झाला आहे. ८ हजार २४६ मालमत्तांची पडझड या पावसाळ्यात झाली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसMarathwadaमराठवाडा